बुधवार, १५ जून, २०११

कदाचित.. .आता प्रवाहच उल्टा झालाय...
मी समजत होतो..
की सगळे येतील माझ्यासोबत..
चांगल्या गोष्टींसाठी मिळेल चांगली नौबत..
पण असे काहीच झाले नाही..
कारण मी प्रवाहाच्या विरुद्ध जाउ पहात होतो..
कोणालाच नकोय इथे शिवरायांच्या गोष्टी..
कोणालाच नकोय शंभू-शाहूशी दोस्ती..
हवाय फक्त प्रत्येकाला वेळ..
घालवण्यासाठी...
नकोय कोणालाच तो..
काही करून दाखवण्यासाठी..
कारण, प्रत्येकाचे आयुष्य
बिज़ी होत चाललाय..
प्रत्येकाचे मन
विरंगुळ्यासाठी क्रेझी झालेय..
सांगितले कुणा जर आठव तुझा इतिहास..
तर उत्तर मिळते..
वेळ नाहीए... बंद कर बकवास..
पण इतके करूनही
प्रत्येकाला शिवबाची ओळख हवी..
का ते माहीत नाही..
असे का होतेय काहीच कळत नाही..
रनरनते उन दिसते कसे...
पहिले नाही मी कधीच..
पण त्याचे चटके मात्र सोसलेत..
आयुष्यभर..

पहिल्या पावसाने भिजलेली माती..
किती सुंदर ते नाही माहीत मला..
पण, तिचा सुगंध मात्र भरलाय
माझ्या मनभर..

भरून आलेले आभाळ आणि वीज
पहिलेच नाही मी कधी..
पण त्यांच्या कडकडाटाने
मिळते मला चाहूल त्यांच्या येण्याची..

इंद्रधनू म्हणे सात रंग घेऊन येते..
कसे दिसते ते मात्र माहीत नाही..
पण किती आनंद देते हे कळते
सर्वांच्या आवाजावरून..

हे सर्व मी जाणून आहे तरीही..
एकदा मला हे जरा वेगळे अनुभवायाचे आहे..
ते उन.. तो पाउस.. भरलेले आभाळ..
इंद्रधनूचे रंग.. सारे सारे मला..
माझ्या डोळ्याने पहायचय....

फक्त एकदा दिसू देवा मला हे सारे कसे दिसते..
साठवून ठेवीन मनात सारे..
बंद करेन पुन्हा डोळे.. कायमचे..
खरंच देवा.. तुझी शपथ..
आठवतंय का राणी..
मी तुला म्हटलो ही होतो..
जन्म घे यायला...
आणि मी वाट बघत होतो..
पण तू आलीच नाहीस कधी
बघायलाही..
की उभा आहे की नाही..
नंतर म्हटलीस की
मी तुला बोलवलेच नाही.
ती.. निघून गेली आणि त्याच्या मनाने त्याला काही सांगितले..

बघ.. सांगितले होते ना तुला..
त्रास देऊ नको तिला...
गेली बघ ती रागावुन...
आता बस आठवण करत तिची ... .
म्हणत बस्स... मी असा का वागलो...
ती पुन्हा भेटली की राग काढेन तिचा..
तिला छान गिफ्ट देईन.. वगैरे वगैरे..
पण आत्तातरि ती निघूनच गेली ना..
आता इतका विचार करून काही होणार नाहीए..
उत.. ती जास्त लांब गेली नसेल..
तिला गाठ आणि आत्ताच तिची
समजूत काढ..
हो.. नाहीतर उगीच नंतर सगळे तानत जाते..
आणि कधी तर नाते तुतायला ही येते..
इतक्या लांबवर जाण्याआधीच तिला सांग..
तुझे तिच्यावर किती प्रेम आहे..
अरे वेड्या तिलाही हेच हवे असेल.. पण
ती काय तुला तसे सांगून जाईल?
जा बघू... लौकर..

आणि मी कविता लिहायला घेतो..

बाप रे..... .......
म्हणजे खूप चिडलेली आहे ही..
ह्म... म्हणजे काहीतरी खास करावे लागणार...
काय करावे रे मना.. तिला मनवण्यासाठी?
तारे आणायचे तोडून?..... तारे...
काहीतरीच.. जुने झाले रे .. चंद्र तारे ...
मग.. गुलाब किंवा फुलांचा गुच्छ...???
ह्म... पण तो एका दिवसात कोमेजून जाणार...
त्यात तिला आवडत नाही गुलाब...
आता बोल.. काय करायचे?...
काहीतरी अगदी खास करावे लागेल..
चाल.. एक छानसे गिफ्ट आणू तिच्यासाठी..
पण.. खूप वेळ लागेल..
त्यापेक्षा.. एक झक्कास आयडिया आहे..
एक कविताच करूयात दोघे मिळून
तिच्यासाठी..
चालेल... कविताच करूयात...
अरे पण तिला तर कविता आवडत नाही ना..
आवडेल रे.. नक्की आवडेल.. मनापासून लिहितोय ना आपण..
मग नक्कीच आवडेल..
चाल.. कविताच करू.. ..
(आणि मी कविता लिहायला घेतो.. )

माझ्या शब्दांच्या खातर..

मित्रांनो...
शब्द काही नाचत नाही मी म्हणेल तसे..
इतकेच की.. कधी कधी..
माझ्या विनंतीवरुन ..
माझी मदत करायला येतात ते..
अगदी गरज पडेल तेव्हा..
कोणाला हसवायला.. कोणाला रडवायला...
कोणी रूसल्यावर त्याला फुलवायला ...
माझी अशी मदत लागताच नाही त्यांना..
तेच करून जातात त्यांना हवे ते..
ते सांगून जातात ...
जे मला म्हणायचे ते..
पण लोक मात्र उगीचच मला श्रेय देतात..
पण.. माझ्या शब्दांच्या खातर..
त्यांच्या माझ्या मैत्रिखातर..
मी झालेले कौतुक स्वीकारत राहतो..
आणि माझ्या मित्रांना..
शब्दांना घेऊन..
नेहमीच सगळ्यांच्या भेटीला येत राहतो..
तू कोण? मी कोण?
का भेटलो? माहीत नाही...
तरीसुद्धा तुझ्यासाठी
करू पाहतोय सारंकाही.

ग्रहण..

काल रात्री ग्रहण लागले.. चंद्राला..
पौर्णिमेचा चंद्र अचानक...
अंधाराने खाउन टाकला..
ग्रहण काही साधे नाही खग्रास ग्रहण..
अंधार झाला...
अगदी भयाण अंधार..
खूप दिवसात असा अंधार पहिला नव्हता...

चंद्र तसा रोजचाच
पण त्याला एक वेगळे तेज आले होते..
दिसामजी चंद्र अगदी शुभ्र होत जात होता..
कधीही नव्हता इतका ...
शुभ्र...
प्रेमात पडलेल्यांच्या पवित्र नात्यांनीच जणू
त्याला नवे तेज दिले होते..
पण कालची रात्रच काही और होती..
त्या प्रेमभावनेवरच कोणी घातला होता घाला..
आणि त्याच वेळी अचानक...
हळू हळू..
चंद्र लहान लहान होत गेला..
अंधार...
काळाकुट्ट अंधार..
कदाचित ग्रहण सुटेलही..
पण..
चंद्राला त्याचे ते शुभ्र तेज...
पुन्हा मिळेल??

(मनाने माझ्याशी घातलेला वाद... )

नकोच होते तू असे वागायला..
नकोच होतेस जीव लावायला..
काय होईल म्हणे जास्तीत जास्त .. पुन्हा तेच लागेल..
अरे पण ती तेच मला लागते..
त्याचे काय?
तुला काय रे.. हवा त्याला जीव लाव..
जसे वाटेल तसे वाग तू..
पण मला सांग उगीच इतकी निर्मल,
निरव्याज माया लावतोस तू..
अगदी सगळ्यांशीच चांगला वागतोस..
सगळ्यांशीच जवळीक साधतोस..
पण नंतर काय होते?
नेमेची येतो मग पावसाळा...
तुझे हे नेहमीचेच झालेय रे..
पण मी तरी किती जखमा झेलायच्या?
बास झाले आता तुझे हे नाटक..
बंद कर आता तुझ्या या सवयी...
किती दिवस चालणार तुझे हे असे?
आणि असेच वागायचे तर सांग तरी...
नाही.. दगडाचे काही गुण आलेत माझ्यात..
सारखीच ठेच लागून... आता अगदी पाषाणच होईन म्हणतो..
मग तू काहीही कर..
मी काहीही बोलणार नाही...

आम्हीच राजे राहणार...

आम्ही मराठे.. मरहट्टे
राजे होतो.. राजे आहोत... या महाराष्ट्राचे...
अन्.. आम्हीच राजे राहणार...
स्वराज्यासाठी लढणार..
पण ते घडवण्यासाठी
थोडेही नाही वाकणार..
कारण आम्ही राजे
होतो आणि राहणार...
कष्ट कशाला करावे??
आहे तसेच राहावे...
जर कोणी दुसरा करू पाहील आमचे काम
तर त्याला शिव्या मात्र देणार..
कारण आम्ही राजे..
होतो.. आहोत.. आणि राहणार..
माय मराठीसाठीच झगडणार...
अगदी रक्त ही सांडणार...
पण त्या माय साठी आम्ही
घाम नाही गळणार..
कारण.. आम्ही राजे..
होतो, आहोत आणि
आम्हीच राजे राहणार...

मी कविता केली...

कविता मी केली होती...
ती येण्याआधी.. ती आली तेव्हा..
ती होती तेव्हा.. अन् ती गेली तेव्हा..

कविता मी केली होती..
मी आनंदी असताना.. काही स्वप्न पाहताना..
काही स्वप्न मोडताना.. अन् त्यामुळेच निराश होताना..

कविता मी केली होती..
पावसात भिजताना... उन्हात होर्पलताना..
थंडीत कूड्कडताना अन् वारा शोंबतना..

कविता केली होती मी
तेव्हाही, जेव्हा चंद्र रात्रभर हसला..
तेव्हाही जेव्हा.. सूर्य ढगांमधे हरवला..
अं जेव्हा... हे दोघेही नव्हते तेव्हा..

कविता केली मी..
अगदी निराश झालेल्या एका युवावर..
शब्दांवर राज्य करणार्‍या कविवर...
प्रेमात पडलेल्या युवतीवर ही...


पण कविता, शब्द, यमक...
यांनीच दिली मला साथ..
त्यातून मांडले मी विषय जे...
त्यातून उलगडले विश्व जायांचे..
त्यांची साथ कधी मिळालीच नाही...

तेव्हा मी कविता केली...
माझ्यावरच... ती होती... मौनाची....

ती आली होती इथे..

ती आली होती इथे..
मी तिच्याच विचारात गुंग असताना...
तिची स्वप्ने पहात..
स्वप्नात तिच्याशीच गप्पा मारताना...
तिच्यासाठी मी कोण..
माझ्यासाठी ती काय ?
मग अगदी महत्वाच्या विषयांपासून ते..
नको असलेल्या गोष्टींबद्दल...
मागच्या जन्मीचे नाते..
पुढच्या जन्मीचे बंध..
अश्या अगदी जन्मभरच्या गप्पा मारुन
ती पुन्हा निघून गेली..
तेव्हा कळले
ही झोप नव्हती, स्वप्नही नव्हते..
ती तर खरेच मला आत्ताच भेटून गेली..
पाउस का नाही पडत ?
मीच किती पाणी गाळायचे?.. रडत?
अगदी सुकून गेलेत तेही..
पाणी नाहीए.. डोळ्यातही..
पण हे देवाला कसे नाही कळत?

पाउस का नाही पडत ?

अंतर...

कणाकणातही असते अंतर...
क्षणाक्षणातही असते अंतर..
तनातनातही असते अंतर...
मनामनातही असते अंतर..
जीवन म्हणजे तरी काय हो??
जन्म अन् मृत्युतले अंतर..
अंतर कापायचे की..जीवन जगायचे
ज्याचे त्याने ठरवायचे असते..
कारण, या जगात येणार्‍या प्रत्येकालाच..
एके दिवशी परतायचे असते..
बघ देवा.... वार झाली इथवर आलो तरी पाउस काही येईना..
लावलेल्या पिकाचं काय झालं आसलं?
या विचारानच बघ पाय हितनं हालंना...
विटठला का रे राज्या कोपलास असा...
का आखदलास तुझा पसा?
पंढारीनता.. एवढ्यावर्षी दया कर आणि
काळी माय भिजू दे..
पाउस पडून हिरवाईनं सजु दे...
एवढा कर माझ्यासाठी
तुझं नाव सारखं घेईन..
जास्ती नाही करू शकत पण..
पुन्हा वारीला नक्की येइन..

ती... गेली... तेव्हा....

ती.. गेली... तेव्हा..
ना पाउस.. रिमझिम..
ना सूर्य... किरणंशी खेळणारा..
चंद्रही नव्हता हसता...
फक्त दिसला... एक तारा निखलणारा...

ती... गेली... तेव्हा..
घरट्याच्या वाटेवर पक्षी..
पण अगदी शांत, उदास...
घरातेही डोलीमधले.. उध्वस्त...
चटका लावून गेले मनास..


ती... गेली... तेव्हा...
जलधारा डोळ्यांमधल्या...
सुकून.. आटून गेलेल्या..
मनातल्या सार्‍या संवेदना...
थकून.. मरून गेलेल्या..


ती... गेली... तेव्हा....
पाउस... आत्ता कुठे पडू लागलाय...
अजुन तरी फक्त माती भिजलिये...
आत्ता कुठे झरा वाहू लागलाय...
आत्ता कुठे फुटू लागलेत अंकुर...
हळूहळू सारे अंकुर आकार घेऊ लागतील..
हळूहळू त्यांना थोडा रांग चढत जाईल..
झरेहि होतील मोठे, अन् वाढेल खळखळात..
डोंगर दर्यांतून वाहताना होतील त्यांचे धबधबे..
तेव्हा कुठे म्हणता येईल...
पाउस... झाला बरं का..
नाहीतर काय...
अंगणात पाण्याचा सडा....
थोडासा मातीला सुगंध... आणि...
थोड्यावेळाने... धरेला.. पुन्हा.. तडा...

मी परत आलोय...

संध्याकाळ...
सूर्य... दिवसभर फिरून थकलेला
अगदी लालबुंद झालेला.
हळू हळू मावळू लागतो..
आणि.. अचानकच अंधाराला
नवा उन्माद चढू लागतो..
पुन्हा एकदा अंधाराचे साम्राज्य येते...
आणि अंधार आपला तो उन्माद,
माज सार्‍या जगतावर पसरवून टाकतो...
सार्‍या जगावर आपले सावट पसरवत..
अगदी निर्लज्जपणे त्याच्याच रंगाप्रमाणे..
किंबहुना त्याहूनही कृष्णवर्णीय कृत्ये करू लागतो...
आणि त्याला असे वाटू लागते...
बस्स... आता राहणार तो फक्त मीच...
कोण अडवणार मला?
कोण वाचवणार या जगास माझ्यापासून?
माझ्याच कवेत तर राहणार सगळे...
पण तेवढ्यात कुठून तरी
एक प्रकाश किरण येतो...
आणि त्या मागो माग...
अंधरावर मात करत...
पुन्हा.. सूर्य येतो...
अन् म्हणतो..
"या जगाचा उद्धार करायला...
मी आलोय....
होय... मी परत आलोय..."

विश्वास

आजकाल...
ती मला पाहतही नाही...
इतकेच काय...
ओळखही दाखवत नाही..
आलीच सामोरी
तर बोलतही नाही...
पण, तरीही...
मी तिला नेहमी पत्रे लिहितो..
तिची आठवण आली
की एखादा मिस्ड कॉल ही करतो..
कारण मला माहितीये..
जरी ती नाही बोलली..
नाही ऐकले माझे काही..
तरी.. माझी पत्रं
ती नक्कीच वाचत असेल..
मिस्ड कॉल पाहून
रिप्लाय करायची इच्छाही तिला होत असेल..
पण नेमके हेच तिला जमत नाही...
पण म्हणून तिला माझ्याबद्दल
काहीच वाटत नाही..असे मला वाटत नाही..
कारण तिच्या प्रत्येक श्वासात
माझाही एक श्वास आहे..
आणि म्हणूनच ती अजूनही 'आहे'...
यावर माझा विश्वास आहे..

मी...

मी...
गडगडनारा मेघ मी...
कडाडनारी वीज मी..
पानावरला थेंब मी... अंकुरणारे बीज मी...
उधाणलेला वारा मी...
टपटपणार्‍या गारा मी...
खळखलणारा झराही मी... अन्... जलप्रपाती धारा मी...
सुगंधलेली धरती मी...
समुद्राची भरती मी....
गढुळलेला पूर मी... अन्... घाबरलेला उरही मी...
दुथडी वाहति नदिहि मी...
हिरवीगार वादी मी..
बळीराजाचा आनंद मी... अन्... गिरीवेड्यांचा छन्दमी...

निसर्गाचा उद्घोष मी.... सह्याद्रीतला पाउस मी...

चाहूल

चाहूल कोणाची येता...
कोणी होते कावरे बावरे...
येता सामोरी असे कोणी...
मन वेडे.. होते घाबरे...

कधी येता चाहूल कोणाची..
भरतो मनी अतीराग...
येता सामोरी कोणी असे..
मस्तकी.... तळपायाची आग...

चाहूल असे ती एकचि...
प्रतिसाद मात्र निराळे..
प्रत्येक वेळी येती..
मनी तरंग वेगवेगळे.

इथेच थांबेन बहुदा...

कधीपासून वाट पाहतोय...
पण ती अजुन नाही आली..
कितीवेळा साद दिली..
पण प्रतिसादच येत नाही...

वाटेवर दिसतात फक्त
तिच्या पाउलखुणा... जातानाच्या...
सादेला प्रतिसाद येतात फक्त
प्रतिध्वनिन्चे, कुशीतून.... डोंगराच्या...

इथेच तर भेटलो होतो तिला..
अगदी पहिल्यांदा...
इथूनच तर गेली होती ती..
अगदी शेवटची...


जाता जाता म्हटली नाही ती..
परत येइन म्हणून...
पण तरीही वाट पाहतोय तिची...
पाहावीशी वाटते म्हणून..

भीती वाटत राहते..
मी निघताच तिने इथे पोहोचायची...
मी का थांबलो नाही
म्हणून, तिच्या परत मागे फिरायची...

इथेच थांबेन बहुदा...
याच वळणावर...
कदाचित ती पोहोचेलही...
माझ्या.. चीतेच्या जळणावर...
असेच होते..
कोणी काही बोलते आणि
मला... ती आठवते...
मग माझ्या मनातली कविता
हळूच कागदावर उतरते..
ती कोण म्हणून विचारता
मला काहीच सांगता येत नाही...
ती कुठे कशी कोण
मलाही ठाऊक नाही..
शब्द आटत जातात, भावना गोठत जातात..
तेव्हा असेच काहीसे होते..
सारखे वाटत राहते...
जे शब्द वापरले, ज्या भावना अनुभावल्या..
ते खरच गरजेचे होते??

कधीतरी भेटल्यावर

कधीतरी भेटल्यावर ती माझ्यावर रागवते..
तू मला भेटतच नाही वगैरे मला ऐकवते...
तेव्हा तिला सांगतो मी...
सखे,
एकमेकांची संगत लाभायला
भेटायलाच हवे, असे नाही...
तुला माझ्या, मला तुझ्या,
भावना समजायला, शब्दांचीही गरज नाही..
मग मात्र ती हळूच माझ्या मिठीत शिरते..
तिची माझी प्रीत पुन्हा..
एकमेकांत विरघळते..

स्त्री म्हणजे

स्त्री म्हणजे आई
ममता अन् माया...
आई म्हणजे वटवृक्ष
घनदाट तिची छाया....

स्त्री म्हणजे प्रेयसी
प्रेम आणि विश्वास..
प्रेयसी म्हणजे स्वप्न
सत्य किंवा भास...

स्त्री म्हणजे भक्ति
देवजीची आस..
भक्ति एक भाव..
जिला पुर्णवताचा ध्यास...

स्त्री म्हणजे शक्ति
तरवारीची धार...
शक्ति म्हणजे सामर्थ्य
आत्मसाक्षात्कार....

दोन भारत...

आजच्या भारतात दोन भारत...

एक आकाशात झेपावतोय,
दुसरा गाळात रुतत जातोय...

एक सतत पुढेच जातोय,
दुसरा तसाच मागे राहतोय...

एका भारतात संस्कृती ही श्रीमंती,
दुसर्‍या भारतात श्रीमंती हीच संस्कृती..

एकाला सार्‍या जगाची भीती,
दुसर्‍याची सार्‍या जगाला धास्ती..

एकापुढे अमेरिकही छोटी,
दुसर्‍यापुढे मुंबईही मोठी...

एका भारतात सारे एकत्र,
दुसर्‍या भारतात दंगलींचे सत्र...

एका भारतात होतोय विकास,
दुसरा भारत दिसतोय भकास...

एका भारतात आदर नि प्रेम,
दुसर्‍या भारतात खुन्नस नि गेम...

एका भारतात रामराज्य,
दुसर्‍या भारतात सारेच त्याज्य...

माझा भारत चांगला व्हावा म्हणून कोणी तडफडतोय..
चांगला भारत माझा व्हावा म्हणून कोणी चडफडतोय...

नशीब माझे

"नशीब माझे , ती भेटली तरी...
वाटले पुन्हा जन्म घ्यावा लागेल...
पण आता नाही घ्यावा लागणार...
याच दिवसाची तर वाट पाहत होतो मी..
चला सुटलो एकदाचा मोक्ष तरी लाभेल आता...
देवा कसे मानू आभार तुझे?"

एवढे सारे मनात चालू असतानाच ती म्हणाली...

"तू पुढच्या जन्मीही भेटसील का रे??
तेव्हाही माझाच होशील ना रे?"

मनातच म्हटले..

"सखे, तुझी वाट पाहता पाहता..
निदान कोटभर जन्म तरी नक्कीच झाले..
आता आणखी एक जन्म.... तसे भले.. "

त्यांना वेळ नाही...

आता... वय झालंय माझं...
नाही आता जमत पूर्वीसारखे कष्ट करणं...
होत नाही आता काहीच हातून...
नशिबी उरलय ते फक्त क्षण क्षण मरणं..

एक काळ असा होता जेव्हा
मी अगदी पडेल ते काम केलं...
माझ्या मुलांचे भविष्य घडवायला
जे जे गरजेचं ते केलं...

लेकरानं मागितलं
ते ते आणून दिलं..
लेकरला आवडलं..
ते सारं करू दिलं..

आज माझी लेकरं
खूप मोठी झालीयेत..
संसार थाटलाय त्यांनी
त्यांनाही लेकरं झालीयेत..

पण त्यांच्या सार्‍या व्यापात
त्यांचा कशाशीच मेळ नाही..
आजवर मोठं केलेल्या
आई-बापासठीही त्यांना वेळ नाही...

येतो जेव्हा काळ

जे जे आले जगी या...
जायचेच कधी ना कधी...
कोणासाही नसे कल्पना
आपली वेळ येणार कधी??

प्रत्येक गोष्ट अनिश्चित
तरीही एक मात्र पक्की आहे..
या जगतावर येणार्‍याची
गच्छन्ति नक्की आहे...

तोवर मिळालेल्या संधीचे
सोने करणे जरूरी आहे...
पण मी नाही भीत, कोण मारतो मला...
ही निव्वळ मग्रुरी आहे...

येतो जेव्हा काळ
तेव्हा विचारात नाही कोणासही
नेतो जेव्हा कोणा...
तेव्हा... सांगत नाही कोणासही...
दिशा चुकली की
आयुष्य भरकटते...
पण... मग,
दिशाहीन आयुष्य असूच कसे शकते??
चुकीची का होईना
दिशा तर मिळालीच ना...
निदान या वळणावर
मला माझी चुक कळलीच ना...
यापुढे काळजी घ्यायची...
निर्धार करायचा..
दिशा.. पुन्हा नाही चुकायची...
समोर येणारी प्रत्येक परिस्थिती
विचार करूनच संभाळायची..
मग काय... दिशा बदलली...
मार्ग बदलला.... पुढे जाउन धेय्यास मिळाला...
इस 'काश'नेही तो हमे
अब तक रोक रखा था|
कोई आएगा जरूर
इस उम्मिद को जगाए रखा था|
न जाने कब उनसे मुलाकात होगी
शायद ये मिलना
अगले जनममें लिखा था|
फरियाद न जाने ये
कौन कर गया था
खुदा भी हमे यहाँ
फिर छोड गया था...
तब से हम बैठे हैं
इस उम्मिद में...
के आयेगा वो
जो हमे याद कर गया था|
राज तो खुले थें
सारे दिल के हमारे...
मगर देर हो भी चुकी थी...
वो आए तो थे
हमसे मिलने मगर..
तब तक हमारी
कबर खुद चुकी थी...
बेवफा तो हो गये
खुद से मगर...
उनसे तो हमेशा
वफ़ा ही तो की थी....
ना जाने हमने ऐसी
क्या खता की थी..
के बदले में हमे
बेवफाइ मिली थी...
उन्हे तो कम से कम
जुदाई तो मिल पाई...
न जाने हमसे ऐसी
क्या भूल हो गई
के... जुदाईमें रहके भी
जुदाईही खफा थी...
दिल ने तो चाहा उन्हे
न जाने कितने जनम से...
मगर कह न पाए कभी ये सनम से...
हमेशा दिल को ये डर लग रहा था...
कहीं वो रुठ न जाए हमसे...
यहीं इक वजह थी
के दिल चूप रहा था...
मगर सच हैं...
के हम जी न पाए उनके सिवा...
कसमसे..

५० कविता

ती म्हणे माझ्यावर ५० कविता कर....
आणि मस्तपैकी त्या सजवून मला भेट कर...
कवितेचा विषय काहीही असो,
मी त्याच्यात दिसायला हवी....
प्रत्येक कवितेत मात्र
उपमा मिळावी अगदी नवी..
एवढे सगळे ऐकल्यावर
मला काहीच सुचेना..
कविता सोडा....
साधी चारोळीही जुळेना..
अहो, का म्हणून काय विचारता...
तीही खूप सुंदर आहे....
शब्दही तसे खूप आहेत...
पण तिचे पुरेपूर वर्णन करायला
सगळे मिळूनही अक्षम आहेत...
यु शबनमी एह्सास था उनके आने से....
के हर साँस महक उठी....
हवाओने फिर कहा जरा रूको...
तुम्हारे सांसो में मिलने से पहले जरा...
मुझेभी मदहोश होने दो इन एहसासोमें
कसूर तो हुआ हमसे मगर..
शर्मिन्दा भी तो हैं उसके लिये...

मुआफ भी करदे ए दोस्त,
वरना बता हम कैसे जिये?

स्मरते मज कविता...

प्रेरणा मिळते मला
कवितेची तिच्या रुपातुनि
प्रेमात बुडता तिच्या मी
होती कविता प्रत्येक क्षणी...

होते कविता हास्याची तिच्या
होते कधी तिच्या रुसन्यातुनी
दिसते कविता तिच्या नेत्रातुन
कधी सापडते तिच्या पाउलखुणातुनी...

तिच्या अश्रूंच्या धारांतूनही
पाझरते कविता
ती नसता तिच्या आठवणीताही
स्मरते मज कविता...
वो आए थे हमसे मिलने, मगर...
आए और चल दीए..
शायद दिलही लेने आए थे हमारा,
लिया और चल दीए..
जख्म तो उन्से मिले हैं
इश्क़ जबसे उनसे हुआ हैं|
हर बार हमने बस आशिकी दी उनको..
उन्हो भी बस जख्म दिया हैं|
वो कहते तो हैं के हम भूले नहीं कभी, मगर...
याद भी उन्हे आती कहाँ हैं, हमारी??

जाणते हैं वो, जी भी ना पाएंगे उनके बगैर,
पर उन्हे कहा फिकर हैं हमारी?

कई साल गुजर गये..

वो आए तो थे मोहल्ले में हमारें..
ना जाने क्यों हमारें घर नहीं आए...
पता नहीं उन्हे याद भी आती हैं के नहीं...
हमें देखे मुस्काराये थे वो..
शायद कई साल गुजर गये..

दिल नजर करें तो कैसे?

हम तो कब से बैठे हैं दिल हथेलि पे लिये,
के वो आयें और हम उन्हे नजर करें..
पर वो हैं के नजर मिलाते ही नहीं,
तो बताओ दिल नजर करें तो कैसे?

स्वभावच तो...

मी काय करतो,
मुळात मलाच समजत नाही.. जेव्हा
समजून घ्यायचे तेव्हा जगही समजून घेत नाही..
नंतर मात्र म्हणतात सगळे..
काय करतोस?, असा का वागतोस..?
तेच समजत नाही..
पण काय करू..
स्वभावच तो... काही केल्या...
बदलतच नाही..
ना जाने क्या कशिश हैं उनकी आँखों में
के हर बार हम उनमें खो जाते हैं|
नशा तो यु हैं उनकी इश्क़ में,
के बस उनके खयालसे ही
हम दीवाने हो जातें हैं|
कोई अंजान एक दस्तक देके गया
लगा कोई अपनासा था... मगर,
ना जाने उसके बाद वो कहा चला गया
लगा, बस .. एक सपनासा था...

फिर भी...

उनके सिवा किसीका
जुबाँ पे नाम नहीं आता
सांसे रूकती हैं,
थम जाता हैं समां,
जब उनका पैगाम नहीं आता..
फिर भी वो कहते हैं,
के हमे इश्क़ नहीं आता..

हवी आहेत माणसे.

हवी आहेत माणसे...
मन असलेली...
गर्दीच्या नि गडबडीच्या या दुनियेत...
दर्दि असलेली....
हवीयेत माणसे ज्यांना समजते
समोरच्याच्या मनातली भाषा...
ज्यांना कळते दुख नि दिसते
प्रत्येक क्षणात नवी आशा...
हवी आहेत माणसे...
ज्यांना केवळ यांत्रीक जगणे जमत नाही..
ज्यांना हवे असते काहीतरी नवे...
ज्यांना एका जागी गुंतून राहणे कधीच पटत नाही..
अशी माणसे.. मिळतील का कुठे?
असतील तर सांगा पत्ता....
आपल्या मनाचा...
तिथे बोलावून त्यांना अगदी जपून ठेवा...
कारण, अशी माणसे जेव्हा भेटतात...
तेव्हा.... जीवन खर्या अर्थाने सुरू होते...

मिठीत त्याच्या...

विचार करीता त्याचा
मज सुचेनासे होते..
त्याच्याच विचारात कुठेशी
मग हरवूनि मी जाते..

येते भान मला मग..
वाटते जग विहरूनी मी आले..
त्याच्या आठवस्पर्शांनी
मन चिंब चिंब झाले..

केवळ मग गुंतून जाते..
आठवणीत त्याच्या..
तो येता सामोरा मी जाते..
सामावूनि मिठीत त्याच्या...
अब तो बस कयामत का इंतजार हैं,
ख्वाइशे तो सारी पूरी हो गयी हैं,
कयामत से बचे तो कुछ नया मिल जाए,
अब तो ये दुनिया.. पुरानी हो गयी हैं...
नवी उमेद घेऊन जेव्हा 'मी'
नव्या प्रवासा निघतो...
खर्या अर्थाने तेव्हा 'मी'
सारे जग जिंकाया बघतो....

पावसाची रुपे

सगळेच कवी म्हणे
पावसावर कविता करतात...
बिचारे काय करणार?
तेवढे शब्दच त्यांना सुचतात...

पाउस असतोच असा...
कधी रिमझिमता... कधी कोसळता...
कधी अगदी सरळ तर कधी... आडवा तिडवा...

कधी पाउस त्या दोघांना भेटतो..
प्रेमाचे निमित्त बनून..
कधी दोघांना झुरवतो..
त्यांच्या भेटीत अडथळा बनून...

कधी पाउस ओढ देतो...
शेतकरयाच्या कौलाला
कधी पाउस उधाणतो...
बळीराजाला काळजी देऊन...

कधी तो जणू रुसूनच बसतो...
येतच नाही भेटीला...
कधी इतका बरसतो..
किती बसतो सार्यांची भीती होऊन...

पावसाची रुपेच इतकी..
की शब्द तरी किती शोधणार?
पाउस तर आहे... म्हणून
कवी स्वतःला... कसा थांबवणार?

पाउस कसा हा आज..

नुसतं भरून आलंय अंधारतंय
कोसळत काही नाही..
हा पाउस असा का वागतोय?
तेच कळत नाही..

वाटते जणू आता बरसेल..
होईल ही माती ओली..
मातीच्या त्या सुगंधाने..
भरेल मी मनझोकाळी...

वारा सुटतो.. गारवा भरतो..
आसमन्तात सार्‍या...
वाटते जणू आता पडतील
आकाशातुन गारा...

का जाणे पण बरसात नाही..
पाउस कसा हा आज..
फुलवून धरतीवरला निसर्ग..
का चढवीत नाही साज... ?

गोष्टी... नाव असलेल्या... नसलेल्या...

कधी कधी नाही सुचत..
कवितेसाठी नाव..
पण, म्हणून कमी होत नाही
कवितेमधला भाव..

प्रत्येक गोष्टीस नाव हवे..
म्हणजे ती ओळखता येते...
परंतु, म्हणून काही निनावी गोष्ट...
केवळ अनोळखी होते?

निणाविच खरी..
पण सौंदर्य तर तेच असते...
नाव नसल्याचा फायदा असा...
की ती प्रत्यक्ष अनुभवावी लागते..

कारण, नाव असलेल्या गोष्टी....
सांगता येतात दुसर्‍यांना..
नाव नसलेल्या मात्र..
अनुभवावयाच लागतात स्वतःला...

तो ही 'तिची'च वाट पाहत होता..

मेघांनी जणू उच्छाद मांडला होता,
वीजांनी एकच गोंधळ उडवला होता..
इतके सारे होऊनही
पाउस काही पडत नव्हता..

ती आली..
अन् पाउस धो धो कोसळला..
जणू माझ्यासोबत,
तो ही 'तिची'च वाट पाहत होता.

मी तुला पाहताना..

मी तुला पाहताना असा स्तब्ध होतो...
म्हणायची असते कविता..
पण केवळ शब्दच ओठी येतो...

कधी नयनात तुझ्या हरवतो..
कधी केस तुझे मी निरखतो..
कधी हास्य तुझे न्याहळतो..
कधी.. ना जाणे का...
शून्यात मी विरतो...

मी तुला पाहताना.. असा स्तब्ध होतो...

हेची मागने तत्पर

येता तिथी आषाढाची
लागे ओढ पालखीची
निघे वारी भक्तजणांची
घेण्या भेट विठ्ठलाची||१||

त्याचे मस्तकी चंदन
त्याचे कटीवर कर
रंग सावळा देवाचा
त्याने ल्याले पीतांबर||२||

रूप असे गोजिरे त्याचे
घेण्या भरूनीया डोळा
गावागावातून निघून
वारकरी येथे आला||३||

अश्या विठ्ठलाची व्हावी
कृपा अवघ्या जगतावर
सुखे नान्दो सर्वजण
हेची मागने तत्पर ||४||

ध्यास...

ध्यास...
दिगंतापर्यंत चालत जाण्याचा...
चालता चालता क्षितिज गाठण्याचा...
क्षितिजावरून झेप घेण्याचा...
झेप घेताच उंच उंच उडत जाण्याचा...
उंच आकाशातून
धरतीकडे पाहण्याचा...
उंचावरून पाहताना
भूतकाळ आठवण्याचा...
आणि त्याच भूतकाळाशी तुलना करण्याचा..
तुलना करून आनंदित होण्याचा...
उंचावर पोहोचून...
पुन्हा धरतीवर परतण्याचा...
ध्यास...

शनिवार, ११ जून, २०११

आँखों में आपके हमने देखा हैं
एक प्यार का नया जहाँ|
कोशिश जो की हम ने
उस जहाँ से निकलने की
समझ ही न पाए के जाए कहाँ|
इश्क़ तो करते हैं उनसे
मगर जता नहीं पाते|
हमारे दिल की बात उन्हे
हम बता नहीं पाते|

ख़यालों में यूँ बसे हैं
आँखें भी बंद करते हैं
तो वोही नज़र आते हैं
के हम उन्हे हटा नहीं पाते|

अब यूँ डूब चुके हैं
उनकी चाह में हम
के एक लम्हा भी उनके सिवा
हम बिता नहीं पाते|

खोए खोए से

खोए खोए से हम थें
खोए खोए से वो भी|
खोया खोया सा समाँ
खोया था ये जहाँ भी|
खोए खोए ही हमने
उनसे वादा कर लिया|
खो देंगे कायनात को
पर खोएंगे ना उन्हे कभी|

गुरुवार, ९ जून, २०११

भेट शेवटची.. अजुन बाकी आहे...

तुझं ठाऊक नव्हते, होणार नाही
मी तुझ्याचसाठी झुरले...
प्रत्येक क्षणी, हरएक दिनी
मी तुझ्या विचारात गुंतले..

सारे विश्व विसरूनी केवळ..
मी तुझ्याचसाठी जगले..
तूच असा गेलास सोडूनि
मज जगण्यास कारण नुरले..

तरीही केवळ एकाच आशेवर
मी अजुन जिवंत आहे
तुझी नि माझी भेट शेवटची..
अजुन बाकी आहे...

मंगळवार, ३१ मे, २०११

पाउस.. माझ्या मनातला

मला नाही माहीत..
माझ्या मनातला पाउस..
नेमका कसा दिसतो...

इतकं मात्र खरं आहे..
की तो वर्षभर पडतच असतो..

कधी रिमझिमता
कधी धो धो बरसत असतो..

कधी सुकल्यासारखा होतो..
अन् मग अचानकच येतो..

प्रत्येकवेळी तो मला
पुरता भिजवून जातो...

खरंच मला माहीत नाही..
माझ्या मनातला पाउस
नेमका कसा दिसतो...

सारे पुन्हा... तेच तेच...

तोच क्षण... तीच जागा...
तोच पाउस... अन् तीच तू...
त्याच ओढीने पुन्हा...
तोच भिजलेला ऋतू..

तोच खळाळणारा निर्झर
अन् आकाशी तेच इंद्रधनू..
तुझ्या माझ्या भेटीस सारे
निसर्गानेच घडवले जणू..

त्याच माळरानी पुन्हा
तेच विहरते पाखरू...
त्याच तुझ्या या पापण्या
जणू उडणारे फुलपाखरू...

तोच वारा झोंबणारा
मेघ नभी लागले दाटू..
तोच विजेचा कडकडाट
अन् तीच पुन्हा मिठीत तू..

जादू.... तुझ्याच अस्तित्वाची...

पाउस, साजणी येतो
तुझ्या निखळ हास्याप्रमाणे..
ओसंडून वाहते नदी
तुझ्या मुखीच्या आनंदाप्रमाणे..

चंद्र मग लपतो जाउनी
त्या नभाच्या आडोशाला
दृष्ट न लागावी म्हणूनी
तुझ्या अलौकिक सौंदर्याला

वीज कडाडून जाते कधी
जणू चमक तुझ्या नयनांची
निसर्ग हिरवा होतो ही...
जादू तुझ्याच अस्तित्वाची...

शुक्रवार, २० मे, २०११

भेट अनोळख्या मैत्रीची...

"चल रे... मी निघतो... ३ ची ट्रेन पकडायचीये मला... "
"अरे.. पण घाई काय आहे? थांब जरा.. जाशील आरामशीर.. एकच का ट्रेन आहे?"
भाउ म्हटला... पण मला मात्र कोणत्याही परिस्थितीत तीच ट्रेन पकडायची होती.. त्याला कारणही खास होते म्हणा..
बर्‍याच दिवसांनी मला "ती" भेटणार होती... बर्‍याच दिवसांनी म्हणजे खरे तर पहिल्यांदाच प्रत्यक्षात भेटणार होती..
आमची ओळख काही कामानिमित्त झालेली.. पण ती केवळ तितकीच ना राहता मैत्रीत बदललेली... पण प्रत्यक्षात भेट नाहीच.
कधी फोनवर बोलून तर कधी एसएमएसवरुन... कधी नेटवरून असे आमचे बोलणे चालायचे.. अगदी नियमितपणे.. पण दोघे वेगवेगळ्या ठिकाणी... त्यामुळे भेटण्याचा योग कधी नाही आला.. पण म्हणून आम्हाला काही वाईट वाटत नव्हते आणि काही अडतही नव्हते... संपर्कासाठी इतकी साधने होतीच ना...

असेच काही दिवस गेले आणि मग मात्र वाटू लागले... एकदा तरी भेटावं.. ज्या व्यक्तीशी आपण इतके बोलतो.. खूपकाही शेअर करतो, त्या व्यक्तीला एकदा तरी भेटावं असं वाटायला लागलं.. आणि योग जुळून आला.. असे क्वचितच होत असावे.. आपल्याला काही हवयां अन् लगेच योग जुळून यावा आणि आपल्याला हवे ते मिळावे... तसंच झालं...

ती येणार होती माझ्याच शहरात... काही कामानिमित्त... मग ठरवले.. तिला भेटायचे... पाहायचे.. मस्त गप्पा मारायच्या.. तिला मला माहीत असलेल्या गोष्टी बोलायच्या... धमाल करायची.. पण काही केल्या ते जमेल असं वाटत नव्हतं.. कारण, ती जास्त वेळ थांबणार नव्हती... आता काय? ती येणार.. काम करणार आणि लगेच परतणार... यात भेट कशी जमवायची?

मग एक उपाय शोधून काढला... प्रवासातच तिला भेटलो तर? कल्पना उत्तम.. पण खूप घाई करावी लागेल.. ट्रेनचे तिकीट.. नेमकी तीच ट्रेन.. परतीचा प्रवास. सगळ्या गोष्टी जमवव्या लागणार होत्या.. पण आता ठरवलंच आहे भेटायंच तर एवढं करायला हवंच ना... विचार पक्का केला.. पण "तिला" सांगू? की ना सांगताच जाउ भेटायला?.. सरळ सांगून टाकुयात... पण नको थोडी गंमत करू.. सांगायलाच नको.. थेट जाउन भेटू...

तिला साधारण विचारले कधी येणार आहेस, किती वेळ आहेस, नेमकी कशी येणार जाणार वगैरे... आणि तसेच बुकिंग केले गाडीचे.. वाटेतच माझे गाव होते.. म्हणून मग ठरवले, तिच्यासोबत जायचे आणि तसेच गावी उतरून मग घरी यायचे.
*
भावाच्या घरातून निघालो... स्टेशनला जाईपर्यंत मनात अनेक विचार येत होते.. अक्षरशः विचारांचे वादळ उठलेले मनात... ती कशी दिसत असेल... मला ओळखेल का?... बोलेल का माझ्याशी? तिची पहिली प्रतिक्रिया काय असेल? कशीही असो.. एकदा भेट तर नक्कीच व्हावी.. हे सगळा चालू असतानाच अचानक फोनची रिंग वाजली... तिचाच होता कॉल... उचलला...
ती म्हटली, "काय रे?, आज ऑफीसला आला नाहीस तो? सुट्टी घेतलीस? सांगितलं नाहीस ते..."
मी "अगं हो.. किती बोलशील? किती प्रश्न विचारशील?"
ती "मग तू बोल ना... "
मी "काही नाही ग, असंच एक काम होतं म्हणून सुट्टी घेतलीये... अचानक घेतलेली सुट्टी, म्हणून गडबडीत सांगायचं राहिलं..."
ती, "अरे, पण निदान साधा मेसेज पाठवायचा होता.. उगाच काळजी वाटत राहते म्हणून विचारलं आपलं.."
मी, "बरं, ते राहू दे, तू आहेस कुठे? निघालीस की नाही कामावरून?"
ती, "हो, सकाळीच निघाले.. आता आहे अर्ध्या वाटेत.. नेटवर्क नव्हता मध्ये.. म्हणून आता कॉल केला.. तुझ्या शहरात येतेय नं.. म्हणून म्हटलं, कॉल करून बघावं, तुला वेळ आहे किंवा कसे..."
मी, "अगं पण तू तर लगेच निघणारेस ना परत.."
ती, "हो रे, ते ही आहेच.. खूप घाईत असणार आहे.. तरीही जर कुठे थोडासा वेळ मिळाला तर बघू.. भेटूयात.. "
मी, "नक्की... "
ती, "चल, आता ठेवते फोन, बॅटरी टिकवायचीये ना मला... मेसेज करते नंतर.."
मी, "ठीक आहे... बोलूयात मेसेजवर.. बाय"
फोन ठेवला आणि कामाला लागलो... स्टेशनला पोहोचायला वेळ लागणार होता.. कारण, मध्ये काही कामं होतीच.. म्हणून घाई केली..
दरम्यान आमचं बोलणं चालूच होतं मेसेजवर... तिचं काम झालं होतं.. आता, ती निघणार होती परतीच्या प्रवासाला.. अन् मी पोहोचत होतो.. स्टेशनवर.. तिला भेटायला..

*


स्टेशनवर पोचतानाच एक विचार आला.. काहीतरी घ्यावं तिच्यासाठी.. काय घ्यावं? विचार चालू असतानाच गाडीची पहिली सूचना आली... गाडी प्लॅटफॉर्मला लागत होती... थोडा अवधी होता म्हणून मी स्टेशन परिसरात काही मिळेल का ते पाहत होतो... पण, काहीच सुचेना.. आणि मिळेनाही.... शेवटी, तो विचार सोडला आणि स्टेशनवर आलो... गाडी प्लॅटफॉर्मवर उभी होतीच... मग पटकन जाऊन आधी आरक्षण तक्ता पाहिला...  माझी सीट माहीत होतीच... पण, मी तिचं नाव शोधत होतो.. .

तेवढ्यात तिचा कॉल आला...
"कुठेस रे?"
"अगं इथेच आहे, स्टेशनजवळ.. थोडा कामात आहे... ते झालं की मग तू निघताना भेटायला येतो... "
अचानक कॉल कट झाला... पुन्हा लावला पण नेटवर्क नव्हतं मिळत.. मग पुन्हा तो रिज़र्वेशन चार्ट बघताना तिचा मेसेज आला..
"अरे, मी गाडीत बसलीये आत्ता... निघेल थोड्यावेळात गाडी..."
मी उत्तर पाठवलं.."अगं पण तू थांबणार होतीस ना थोडा वेळ.. मी थोड्याच वेळात येणार होतो तिकडे... माझं काम झालं की..."

तोवर मला तिच्या बोगीचा नंबर, सीट नंबर मिळाला होता... आणि तो नेमका माझ्याच बोगीतला होता.. आता याला कोणता योग म्हणावा हेच मला सुचत नव्हतं... तेवढ्यात तिचा मेसेज आला...

"अरे... काम जरा लौकरच उरकलं... आणि तसेही या गाडिचेच बुकिंग केले होते... मिळाली गाडी म्हणून निघतीये... सॉरी"

मी पुन्हा रिप्लाय केला... "अगं पण... असो.. गाडी कितीला सुटणार आहे?"

तिचा रिप्लाय... 'आहेत आणखी १५-२० मिनिटे... बघ जमल्यास येऊन जा...'

मी पुढचा मेसेज टाइप करतच होतो आणि तिचा कॉल आला....

"ऐक ना... जमणारे का तुला यायला? म्हणजे गाडी सुटेल आता थोड्याच वेळात..."
मी, "माझं काम उरकलंय आता... मला १० मिनिटे लागतील... पोचतोच मी तिथे..."
ती... "बघ.. लौकर ये.. तेवढीच धावती का होईना भेट होईल..."
"हो... धावतच निघतोय मी... आलोच... "

एवढं बोलून मी कॉल कट केला... आणि बोगीकडे चालू लागलो..

*

मंगळवार, १९ एप्रिल, २०११

नुकताच होळीचा सण होऊन गेलेला... उन्हाची तीव्रता वाढलेली.. जणू सूर्य सारी धरणी जाळण्यास निघालेला.. वेळ तशी संध्याकाळची... म्हणजे साधारण चार वाजलेले.. तरीही ऊन मात्र बर्‍यापैकी.. अशा उन्हात "तो" तळ्याच्या काठावर शांत पाण्याच्या लाटांचा आवाज ऐकत बसून होता.. रोजच्या सारखा.. आता त्याला सवयच झाली होती या सर्वांची.. त्यालाच काय कदाचित त्या सूर्याला.. उन्हाला.. तळे अन् त्याच्या लाटांनाही त्याची सवय झाली असावी... गेले कित्येक दिवस तो असाच रोज येऊन शांत तळ्याकाठी बसून असायचा... शून्यात नजर.. मनात असंख्य विचारांनी काहूर माजलेलं.. वार्‍याची झूळुक आली की जणू कोणाची तरी चाहूल लागावी असा अस्वस्थ होऊन तो सगळीकडे पाहायचा... अन् कोणीच दिसत नाही कळल्यावर पुन्हा शून्यात हरवायचा..
याच तळ्याच्या काठावर "ती" त्याला भेटलेली... पहिल्याच भेटीत त्याच्या मनात भरलेली.. इथेच दोघांची गट्टी जमलेली... कितीतरी भेटी घडल्या त्या इथेच.. अगदी याच ठिकाणी... त्यावेळी झाड असायचा इथे... चाफ्याचं.. त्या चाफ्याच्या फुलांची माळ करून रोज तो तिला भेट द्यायचा, तीही आवडीने तो चाफा माळायची... सुंदर दिसायाची... एखादी परिच जणू..
होतीच ती तशी... नाजूक.. गोरिपान... टपोरया घार्‍या डोळ्यांची... नेहमीच आनंदी राहणारी.. स्वतःच्याच स्वप्नांच्या दुनियेत रमणारी.. नेहमी म्हणायची... "तू अगदी माझ्या स्वप्नातल्या राजकुमारासारखा आहेस.. मला हवा होतास तसाच..."
तोही विचारायचा... "म्हणजे... नक्की कसा?"...
"ते नाही सांगता येत मला... पण आहेस तू तसा.. एवढं मला माहीत आहे..."
"अगं, पण काहीतरी सांगशील की नाही..."
"नाही सांगता येत मला... पण एक मात्र आहे.. मी स्वप्नात पाहिलंय तुला.. कितीतरी वेळा.. तू भेटायच्या आधीपासून..."
"खरंच.. की उगाच आपलं मला चांगलं वाटावं म्हणून बोलतीयेस..?"
"अगदी खरं... तुझी शपथ.."

अन् मग तो मोहरुन जायचा... तिच्या त्या निरागस.. टपोरया डोळ्यांत हरवून जायचा... कितीतरी वेळ दोघे एकमेकांच्या नजरेत नजर मिळवून बसून असायचे... काहीही ना बोलता...

या सार्‍या आठवणींत बुडालेला असताना कोणीतरी मागून हाक मरायचं... "काय रे माधव... झाली का समाधी लावून... सूर्य गेला कंटाळून आता... चल बघू घरी..."
तो तसाच विचारांमध्ये... तिच्या आठवणींमध्ये रमत तिथून उठायचा... अन् घरची वाट धरायचा... रोज.. अगदी रोज हे असंच घडायचं...

(To Be Continued... )

ती..........

तिच्या केवळ चाहूलीनेच
त्याच्या अंगावर शहारा यायचा...
ती समोर आली की जणू
ग्रीष्मातही शरदाचा भास व्हायचा..

तिच्या नजरेतून जणू
चांदण्याची झलक मिळायची..
तिच्या कोमल आवाजाने
सारी सृष्टी मोहून जायची..

तिच्या येण्या जाण्यानेच
इतके सारे व्हायचे..
की जणू... सार्‍या जीवनाचे..
सार्थक होऊ पाहायचे...

ती आली होती..
खूप काही घेऊन..
अन् गेली तेव्हा...
सारे घेऊन गेली..

मंगळवार, २९ मार्च, २०११

तू नसलीस..

मेघ नसतात,
आभाळ अगदी निरभ्र असतं...
पण माझ्या डोळ्यांना मात्र
ते भरून आलेलं दिसतं..
लख्ख सूर्यप्रकाश असतानाही..
अंधारुन आल्यासारखं वाटतं...
कधी, रात्रीचा चंद्र छान खुलून हसतो..
मला मात्र तो उदास भासतो..
तारकांनी भरलेलं असतं आभाळ
मला मात्र अगदीच रिकामं वाटतं असतं...
तू नसलीस..
की हे असं काहीसं होत असतं..

शुक्रवार, २८ जानेवारी, २०११

कुंपण...

प्रत्येक मनाला
एक काटेरी कुंपण असतं...
ते कधी ओलांडता येत नाही ...
मन कुठेही गेलं
तरी कुंपण त्याला सोडत नाही..
मनाला ते सांगत राहतं..
मर्यादा त्याची दाखवत राहतं..
पण, मन मात्र ऐकत नाही..
कुंपणाकडे पहात नाही..
कुंपण मग ईरेला पेटतं..
मनाला उडूच देत नाही..
कधी मन, कुंपण तोडतं... उंच उडतं....
मग त्याला वाटू लागतं..
की, कुंपणाशिवाय जगता येतं..
पण, त्याहून शहाणं असतं...
हळूच मनाच्या नकळत..
मनाला नव्यानं मिठीत घेतं...

मंगळवार, २५ जानेवारी, २०११

प्रेमास भरती येते...

ती कुशीत शिरली
की तो खुलतो..
त्याने मिठी घट्ट केली
की ती आनंदून जाते...

तिच्या एका नजरेत
तो घायाळ होतो..
त्याच्या स्पर्शाने
ती मोहरून जाते..

तिच्या चुंबनाने
तो शहारुन उठतो..
त्याच्या सहवासात
ती हरवलीशी होते..

रातराणी सुगंधते
रात मोहमयी करते..
चंद्र पूर्णत्वा येतो
प्रेमास भरती येते...

मोठं ध्येय गाठण्यासाठी...

फुलपाखरू...
किती सुंदर, किती नाजूक...
अगदी अलगद हळूवार उडणारे..
कितीतरी इतर पाखरांसोबत..
स्वछन्दी आयुष्य जगणारे...
पण तरीही सतत
एकाच मर्यादेत राहणारे..
तीच साथ, तोच परिसर...
जीवनसुद्धा अगदी...
काही दिसभर...
म्हणूनच कदाचित..
आपल्याला फुलपाखरू व्हावंसं वाटतं...
मनाप्रमाणे उडत राहून..
केवळ आनंदी राहावं वाटतं...
पण, त्या नादात विसरतो आपण..
उंच उडायला फुलपाखरू नव्हे..
तर, गरूड व्हावं लागतं..
मोठं ध्येय गाठण्यासाठी...
पंखांमध्ये मोठं बळ असावं लागतं..

कधीवर चालायचे???

पौर्णिमेचा चंद्र पाहुनि केवळ..
कधीवर मी झुरायचे?

गोजिर्‍या मुखड्यास कधीवर...
चंद्रबिंबात शोधायचे?

अमावस्येच्या रात्रीपरि
अंधारास मी पाहायचे...

चांदण्यांच्या वाकुल्यांना
शांततेने सहायचे..

सखे, हे असे सारे, सांग मजला...
कधीवर गं चालायचे???

तिरंगाच आहे...

रंग मनाचा माझ्या
भगवाच आहे...
किंवा तुझ्या मनाचा हिरवाच आहे...
कोण्या एकाचा तो निळाच राहावा...
आणखी कोणा एकाचा पांढराच आहे....
प्रचार आणि प्रसार सध्या
असाच आहे..
प्रश्न नसे असा की.
कोण करे हा प्रसार
अन् कोण करे विरोध त्याला..
प्रश्न असा की नक्की
खरा कोण आहे..
विचार करता परंतु,
येते ध्यानी..
या सार्‍याहूनही...
रंग आपुला वेगळाच आहे..
मनास विचारिता समजते...
नसे हा रंग अजिबात निराळा...
रंग हा तिरंगाच आहे...

शनिवार, ४ डिसेंबर, २०१०

एक ....

एक घाव...
मनावरचा..
एक धार...
रक्ताची... लाल रंगाची..
एक शब्द...
शेवटचा...
एक आरोळी...
मनातली.. मनाची
एक क्षण..
शेवटचा..
एक प्रश्न...
आयुष्याचा.. मरणाचा..

गुरुवार, १४ ऑक्टोबर, २०१०

मध्यरात्रीच्या वेळी...

मध्यरात्रीच्या वेळी अचानक
सख्यास जाग आली...
पाहिले सखिला तेव्हा सखी
झोपेतच, हसताना दिसली...
निरखून पाहता जाणवले...
कोण्या स्वप्नात गुंग होती...
तसाच होता तिला न्याहाळत तो...
जेव्हा जाग सखीसही आली...
पाहिले तिने सख्यास जेव्हा..
पुन्हा लाजुनी डोळे मिटुनी...
सखी मग, मिठीत सख्याच्या शिरली...

मंगळवार, १२ ऑक्टोबर, २०१०

निर्णय

चुकीच्या म्हटलेल्या गोष्टी
नेहमीच चुकीच्या असतात?
योग्य म्हटलेल्या गोष्टी
कधीच का चुकीच्या नसतात?

परिस्थितीच्या गरजेनुसार
प्रत्येकजण वागत असतो
त्या क्षणी, त्या परिस्थितीत
प्रत्येकजण बरोबर असतो..

मग मागाहून त्या गोष्टी
चुकीच्या म्हणण्यात काय अर्थ?
असंच जर म्हणायचं असेल
तर सारं जीवनच होईल व्यर्थ

म्हणूनच घेतलेल्या निर्णयावर
ठाम राहता यायला हवं..
पुढं येणार्‍या प्रत्येक प्रश्नाचं
उत्तर देता यायला हवं

नाहीतर जगाच्या संगण्यानुसार
आपण प्रत्येक गोष्ट करतो
आयुष्याच्या शेवतो मात्र
आपणच मूर्ख ठरतो...

शुक्रवार, ८ ऑक्टोबर, २०१०

कसूर

हम कहते गये जो ना कहना था…
वो हर लब्जपे हमारें बस रोते गये..
कसूर तो हमारा ही था..
जो ना देखा उनकी आँखों में..
बस खुद के जख्म दिखातें रहे..
हक़िक़त तो ये थी की
पुरा दिल कुरेडा था हमने..
पर उन्होने उफ्फ भी ना किया…
और हम और घाव बनातें गये..
जब पता चला के हम ही गलत थे…
देखा सनम का हाल…
उसके बाद से जिंदगी के आखरी साँस तक..
बस खुद ही से आंखें चुराते रहे..

बुधवार, ६ ऑक्टोबर, २०१०

तुझ्यासाठीच केवळ...

सखे.. तुझ्यासाठी मेळवेन
मी अवकाश धुलीला.
तुझ्यासाठी नमवेन
मी या सार्‍या जगाला..
सांगशील तू तर सूर्यास विझवेन...
तुझी उशी बनवण्या चंद्रासही आणेन...
तुझ्या हाकेवर केवळ मी
उभा जन्म वाहीन...
तुझ्यासाठीच केवळ...
पुन्हा पुन्हा जन्म घेईन...

ओढ कशाची असे मनाला...

सामोरी येता तू सखे
हरवतो डोळ्यात तुझ्या...
नसशी समोर जेव्हा तू..
आठवतो नजरेस तुझ्या...
सांग मला मग कधी बोलावे...
काय माझ्या मनात असे अन्..
कसे सांगावे सखे तुला...
नित्याचेच झाले हरवणे..
आठवणे.. केवळ तुला...
सांग सखे मी राहू कसा..
जर दिसली नाहीस तू... कधी मला...
मला ना ठावे काय असे हे..
का हे घडावे, माझ्यासवे...
ओढ कशाची असे मनाला...
प्रेम का जडले.. तुझ्यासवे?

शनिवार, २ ऑक्टोबर, २०१०

कोई इतना इश्क़ हमसे करता..
तो हम जान भी लूटा देते..
कोई प्यार से माँग लेता
तो पूरा जहाँ नज़र करते...
वो ना जाने क्यूँ दिल में लिए बैठे हैं
के हम उन्हे भूल जाएँगे...
और हम पता नही कब से
उन्ही के नाम की साँसे ले रहे हैं...

उन्हे जाने क्यूँ लगता हैं
के हम बेवफा हैं
और हम हैं के उनकी खातिर
खुदा से भी बेवफ़ाई कर लेते हैं

त्या दोघांची... चंदेरी भेट

पावसाळा नुकताच संपलेला...
संध्याकाळची वेळ....
नदीचा तीर... खळखलणारे पाणी..
आकाशी चाललेला रंगांचा खेळ...

पश्चिमेने उधळलेल्या रंगछटा
अश्याच काहीश्या सखीच्या केशलता...
तिचे मावळतीच्या खेळात मग्न होणे...
त्याचे मात्र तिच्याकडे पहाणे...

मधूनच एखादी वार्याची झुळुक..
अंगावर आणते शहारा हळूच..
कातरवेळी त्याचा तिला स्पर्श..
शृंगाराचीच जणू देई चुणूक...

मावळतीला अंधार दाटत जातो...
पूर्वेहून मग चंद्रकला उगवते..
त्या दोघांची भेट तेव्हा पूर्ण होते...
जेव्हा... चंद्राने रात्र चंदेरी होते...

गुरुवार, ९ सप्टेंबर, २०१०

श्रेय नसे माझे कसले..

"नेहमीच कसे तुझं
सांग समजते.. मनातले माझ्या..
भावना कधी मी
व्यक्त न करता..
पोहोचति कश्या मनी तुझ्या...
सांग सख्या मज...
कसे समजते...
काय हवे असे मजला..
कसे जमवसि शब्द कुठूनसे..
रचावया गझला.."
"सखे, जरी तुझं वाटे कठीण हे..
किंचितही.. नाही तसे..
शब्द शोधण्या... कुठे न जाता..
मिळती मजला...
सौंदर्यच तुझे असे...
श्रेय नसे माझे कसले..
केवळ तुला मी वर्णिले..

ती रूसते...

ती रूसते...
अन् तो तिला मनवतो...
कधी तिच्यावर कविता करतो..
तर कधी तिच्यासाठी गाणे गातो..
कधी लाडीक रागाने बोलतो..
कधी तोही रुसून बसतो...
प्रत्येकवेळी... रुसवा काढायला..
बोलावेच लागते असे नाही..
कधी एका नजरेत ती हसते...
कधी.. केवळ एक 'स्पर्श'च पुरतो...

देवाजीचे देणे...

देवाजीचे देणे...
त्यास.. आपण काय करावे?
त्याने दिले ते घ्यावे...
सर्व जगताला वाटावे...
सारे वाटून पुन्हा रिक्त व्हावे...
त्याच्या नव्या देण्यासाठी...
असेच घेऊन.. वाटत राहून...
पुन्हा पुन्हा रिक्त व्हावे...
समस्त जगाच्या भल्यासाठी..

छोटीशी.. छानशी.. कविता

छोटीशी? छानशी?
कविता तुला..
ऐकवुच कशी मी?
मनी जे दाटे.. मला जे वाटे..
भावना तुझ्यासाठीची...
मोजक्याच शब्दात...
मांडू कशी मी?
रूप तुझे जे आरसपाणी...
पाहता तुला होते
धुंद ही अवनी...
सांग तूच सखे...
इवल्याश्या काव्यात
वर्णू कशी मी.. ?
छोटीशी.. छानशी..
कविता तुला...
ऐकवुच कशी मी?

शुक्रवार, ३ सप्टेंबर, २०१०

अमावस्या?

अमावस्या असली..
तरी तिला मात्र चंद्रच हवा असायचा..
तारे कितीही लुकलुकले..
कितीही सुंदर दिसले..
अगदी संपूर्ण अवकाश जरी त्यांनी व्यापले..
तिला ते आवडले तरी म्हणायची..
"चंद्र असता तर आणखी मजा आली असती नाही?"
किंवा कधी म्हणायची..
"चंद्रप्रकाशातले जग काही निराळेच"
झाले.. छान गप्पा चालू असताना..
ते दोघे प्रेमात दंग असताना,
ती अशी काहीसे म्हणायची..
एक दिवस ना राहवून
तो तिला म्हटला..
"सखे, चंद्र हवा असतो तुला..
त्याची उणीव भासते तुला..
पण, मला नाही भासत कधी त्याची उणीव..
अन् त्या तारयांनाही नसेल वाटत असे काही..
कारण, माझ्यासाठी, त्यांच्यासाठी..
अमावस्या कधी होतच नाही..
चंद्र नसेल उगवत कदाचित त्या रात्री..
पण तुझ्या रूपाने असतोच ना तो समोर.."
सखी काय म्हणणार..
कौतुकाने पाहत राहते..
त्याला.. अन् तारयांना...

मंगळवार, ३१ ऑगस्ट, २०१०

पौर्णिमेच्या चांदण्यात

पौर्णिमेच्या चांदण्यात
ती भेटीला येते...
जणू, स्वर्गीची कोणी अप्सराच
माझ्या सामोरी येते...
सौंदर्यकडांवरून तिच्या
जेव्हा चांदणे फिरते...
अप्सरेची कल्पनाही मग..
केवळ खूजी वाटते..
ओठांवरुनी थरथरणार्‍या
माझा स्पर्श जेव्हा फिरतो...
सौंदर्य तिचे जणू मग..
परिपूर्ण वाटते...
प्रणयात तिच्या मी.
मग चांदण्यात त्या
असा धुंध होतो...
चंद्रास्त होतो, रात्रही संपते...
तरीही केवळ तिच्या
स्वप्नात मी रमतो...

शृंगार... तिचा अन् माझा

तिच्या माझ्यातले अंतर ..
जेव्हा कमी होते..
जणू, शृंगारालाही तेव्हा..
भरभरून येते..

तारुण्य तिचे नि माझे..
जेव्हा.. एकरूप होते..
चंद्रकिरणासही मधून शिरण्या...
जागा न उरते..

श्वासांतून वाहू लागता
श्वास तिचा माझा..
प्रलयालाही स्पर्धा करण्या
ताकद ना मिळते...

प्रेमास तिच्या अन् माझ्या
जेव्हा उधाण येते...
प्रेमदेवतेलाही मग
काही सुचेनासे होते...

भूतकाळ येतो... आणि ...

एक दिवस अचानक समोर येतो...
भूतकाळ..
असा भूतकाळ, ज्याने आपल्याला
वेड लावलेले होते..
ज्याच्याशिवाय.. कधीकाळी..
जगनेही मुश्कील झालेले होते..
असा भूतकाळ.. जो कधी वर्तमान होता...
भविष्य होता..
पण.. पण अचानक..
काळाच्याच कोण्या खेळाने..
आपल्यापासून दुरावला होता..
भूतकाळ... आपले प्रचंड प्रेम असलेला..
आपल्याला प्रचंड त्रास दिलेला..
आपल्या संपूर्ण भविष्यावर ज्याचे सावट कायमचे पसरले गेले...
असा एक भूतकाळ...
तो सामोरा आला की आपण भले म्हणतो..
"जा, नाही काही अडत माझे तुझ्याविना...
जा.. काडीमात्रही किंमत नाहीए आता तुझी मला... "
पण खोलवर मनात मात्र...
पुन्हा सार्‍या जुन्या जखमा
ताज्या झालेल्या असतात...
पुन्हा सार्‍या भावनांनी
एकच उच्छाद मांडलेला असतो...
केवळ त्या भूतकालाच्या झलकेनेच...
सारा सारा आयुष्याचा ताळमेळ
बिघडलेला असतो...
असा भूतकाळ येतो... आणि
शून्यातून सुरूवात करून निर्माण केलेल्या नव्या आयुष्यलाही...
पुन्हा एकदा शून्यावर नेऊन ठेवतो...

सोमवार, ३० ऑगस्ट, २०१०

मी.. प्रेमात बुडालेला..

तू काळी मोगर्‍याची
वा झुळुक वार्‍याची
मी सुगंध वाहणारा....

तू वीज कडाडनारी..
वा कृष्णमेघांची दाटी....
मी कोसळत्या धारा...

तू परी स्वप्नातली..
वा राणी सत्यातली..
मी.. स्वप्न पाहणारा..

तू व्याख्या प्रेमाची
वा जाणीव अस्तित्वाची..
मी.. प्रेमात बुडालेला..

शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०१०

...याच कारणे...

एकदा... भेटता विचारले तिने..
"सांग नवे काय माझ्या दिसले, आज तुला?"
सांगितले मी तिला..
"प्रिये, तशी तर रोजच भासतेस तू नवी..
खास असे काय सांगू मी तुला?"
म्हणाली.. "असे उत्तर चालायचे नाही..
नवे काय ते ओळखल्याशिवाय
माझ्याशी बोलायचे नाही.."
मग मात्र मी म्हटलो तिला..
"सखे, तू येताच समजले होते मला..
तू माळलीस मोगरी गजरा..
चाहूल तुझी लागली मज..
जेव्हा नवपैंजण तुझा वाजला.."
ऐकताच सखी मग पुन्हा बिलगली..
पुन्हा एकदा मिठीत शिरली..
काही न बोलता बोलून गेली..
"सख्या, याच कारणे प्रीत तुझ्यावर जडली..."

लिहायचो मी..

असेच काहीसे लिहायचो मी..
वर्णन तिचे कधी करायचो मी...
कधी सौंदर्याचे तिच्या...
तर कधी प्रेमावर तिच्या लिहायचो मी..

भेटायची मला जेव्हा ती..
केवळ पहात राहायचो मी..
एकाच तिच्या नजरेने नेहमी..
पुरता घायाळ व्हायचो मी..

आताही लिहितोच आहे..
वर्णन तिचे करतोच आहे...
पण, आता आहे सोबतीस ती माझ्या..
पुर्वी... स्वप्नातच केवळ पहायचो मी..

गुरुवार, २६ ऑगस्ट, २०१०

विचारांचा पाउस...

विचारच करत होतो...
की विचार काय करावा?
अन् विचार करून
त्याचा उपयोग काय करावा?

आणि तेवढ्यात अचानक
एक विचार मनी आला..
विचार.. कधी, कुठे, कसा...
विचार.. करावाच कशाला?

विचारच करायचा तर..
विचारच करायला हवा..
इतक्या सगळ्या प्रश्नाचा
विचार का असावा?

विचाराच्या इतक्या विचाराने
डोक्यात विचारांचा ढग होतो
विचार करत असतानाच अचानक..
आणखी विचारांचा पाउस पडतो...

रविवार, १५ ऑगस्ट, २०१०

गाव मात्र एकटं झालंय...

रस्त्यावरून दिसणारं एक गाव..
पावसात भिजून चिंब झालंय..
पावसाच्या प्रत्येक थेंबानं..
गावाचं सौंदर्य खुलू लागलंय..

गावात शिरताच दिसून येतं
गावात समस्यांचच रान माजलंय
गावात माणसं असूनसुद्धा
गाव आतून एकटं झालंय..

मागल्या सालिही पडला पाउस..
धरणात भरून वाहिलं खूप
पाणी मात्र नंतर सारं
शहरासाठी वाहून गेलंय..

पाउस गेला उन पडलं..
गावातलं सारं आटून गेलंय
गावात धरण असूनही
गावातलं ढोर तहानेन मेलंय

या सारयचा कंटाळा येऊन..
पोटा-पाण्याचा प्रश्न घेऊन
प्रत्येक पोर आता शहरात गेलंय
गाव मात्र एकटं झालंय...

मंगळवार, ३ ऑगस्ट, २०१०

तिची तक्रार.. त्याचे उत्तर...

तिची तक्रार..

तू मला साधा फोन करत नाहीस..
माझी तुला कधी आठवणच येत नाही..

आलीच असती..
तर निदान एखादा मेसेज केला असतास...
नव्हताच इतका वेळ..
तर मिस्ड कॉल तरी दिला असतास...
पण यातले काही झालेच नाही..
कारण.. तुला माझी आठवनच येत नाही...

कधी माझा वाढदिवस विसरतोस..
कधी आपण भेटल्याची तारीख..
आपण एकत्र फिरायला गेलो..
ती पहिली जागाही तुझ्या लक्षात नाही..
कारण... तुला माझी आठवण येत नाही..

त्याचे उत्तर...

मेसेज करायला किती वेळ लागतो ग..
पण तो करतानाही कधी कधी
कविता मला सुचत नाही..
आणि साधा एखादा मेसेज करणे..
खरेच बरे वाटत नाही..

साधा मिस्ड कॉल द्यावा म्हटले
तरी.. बरे वाटत नाही..
तुला फक्त मिस करणे..
माझ्या मनाला तरी पटत नाही..

आठवण आली.. कॉल केला
की गप्पा मारत राहतो मी..
माझे सारे काम विसरून..
तुझ्यात गुंतत जातो मी..


म्हणूनच सखे.. आठवण येऊनही..
तसे कधी मी दाखवत नाही..
पण.. असे केल्याने तुझ्यावरचे..
माझे प्रेम कधीच कमी होत नाही..