मी काय करतो,
मुळात मलाच समजत नाही.. जेव्हा
समजून घ्यायचे तेव्हा जगही समजून घेत नाही..
नंतर मात्र म्हणतात सगळे..
काय करतोस?, असा का वागतोस..?
तेच समजत नाही..
पण काय करू..
स्वभावच तो... काही केल्या...
बदलतच नाही..
बुधवार, १५ जून, २०११
फिर भी...
उनके सिवा किसीका
जुबाँ पे नाम नहीं आता
सांसे रूकती हैं,
थम जाता हैं समां,
जब उनका पैगाम नहीं आता..
फिर भी वो कहते हैं,
के हमे इश्क़ नहीं आता..
जुबाँ पे नाम नहीं आता
सांसे रूकती हैं,
थम जाता हैं समां,
जब उनका पैगाम नहीं आता..
फिर भी वो कहते हैं,
के हमे इश्क़ नहीं आता..
हवी आहेत माणसे.
हवी आहेत माणसे...
मन असलेली...
गर्दीच्या नि गडबडीच्या या दुनियेत...
दर्दि असलेली....
हवीयेत माणसे ज्यांना समजते
समोरच्याच्या मनातली भाषा...
ज्यांना कळते दुख नि दिसते
प्रत्येक क्षणात नवी आशा...
हवी आहेत माणसे...
ज्यांना केवळ यांत्रीक जगणे जमत नाही..
ज्यांना हवे असते काहीतरी नवे...
ज्यांना एका जागी गुंतून राहणे कधीच पटत नाही..
अशी माणसे.. मिळतील का कुठे?
असतील तर सांगा पत्ता....
आपल्या मनाचा...
तिथे बोलावून त्यांना अगदी जपून ठेवा...
कारण, अशी माणसे जेव्हा भेटतात...
तेव्हा.... जीवन खर्या अर्थाने सुरू होते...
मन असलेली...
गर्दीच्या नि गडबडीच्या या दुनियेत...
दर्दि असलेली....
हवीयेत माणसे ज्यांना समजते
समोरच्याच्या मनातली भाषा...
ज्यांना कळते दुख नि दिसते
प्रत्येक क्षणात नवी आशा...
हवी आहेत माणसे...
ज्यांना केवळ यांत्रीक जगणे जमत नाही..
ज्यांना हवे असते काहीतरी नवे...
ज्यांना एका जागी गुंतून राहणे कधीच पटत नाही..
अशी माणसे.. मिळतील का कुठे?
असतील तर सांगा पत्ता....
आपल्या मनाचा...
तिथे बोलावून त्यांना अगदी जपून ठेवा...
कारण, अशी माणसे जेव्हा भेटतात...
तेव्हा.... जीवन खर्या अर्थाने सुरू होते...
मिठीत त्याच्या...
विचार करीता त्याचा
मज सुचेनासे होते..
त्याच्याच विचारात कुठेशी
मग हरवूनि मी जाते..
येते भान मला मग..
वाटते जग विहरूनी मी आले..
त्याच्या आठवस्पर्शांनी
मन चिंब चिंब झाले..
केवळ मग गुंतून जाते..
आठवणीत त्याच्या..
तो येता सामोरा मी जाते..
सामावूनि मिठीत त्याच्या...
मज सुचेनासे होते..
त्याच्याच विचारात कुठेशी
मग हरवूनि मी जाते..
येते भान मला मग..
वाटते जग विहरूनी मी आले..
त्याच्या आठवस्पर्शांनी
मन चिंब चिंब झाले..
केवळ मग गुंतून जाते..
आठवणीत त्याच्या..
तो येता सामोरा मी जाते..
सामावूनि मिठीत त्याच्या...
पावसाची रुपे
सगळेच कवी म्हणे
पावसावर कविता करतात...
बिचारे काय करणार?
तेवढे शब्दच त्यांना सुचतात...
पाउस असतोच असा...
कधी रिमझिमता... कधी कोसळता...
कधी अगदी सरळ तर कधी... आडवा तिडवा...
कधी पाउस त्या दोघांना भेटतो..
प्रेमाचे निमित्त बनून..
कधी दोघांना झुरवतो..
त्यांच्या भेटीत अडथळा बनून...
कधी पाउस ओढ देतो...
शेतकरयाच्या कौलाला
कधी पाउस उधाणतो...
बळीराजाला काळजी देऊन...
कधी तो जणू रुसूनच बसतो...
येतच नाही भेटीला...
कधी इतका बरसतो..
किती बसतो सार्यांची भीती होऊन...
पावसाची रुपेच इतकी..
की शब्द तरी किती शोधणार?
पाउस तर आहे... म्हणून
कवी स्वतःला... कसा थांबवणार?
पावसावर कविता करतात...
बिचारे काय करणार?
तेवढे शब्दच त्यांना सुचतात...
पाउस असतोच असा...
कधी रिमझिमता... कधी कोसळता...
कधी अगदी सरळ तर कधी... आडवा तिडवा...
कधी पाउस त्या दोघांना भेटतो..
प्रेमाचे निमित्त बनून..
कधी दोघांना झुरवतो..
त्यांच्या भेटीत अडथळा बनून...
कधी पाउस ओढ देतो...
शेतकरयाच्या कौलाला
कधी पाउस उधाणतो...
बळीराजाला काळजी देऊन...
कधी तो जणू रुसूनच बसतो...
येतच नाही भेटीला...
कधी इतका बरसतो..
किती बसतो सार्यांची भीती होऊन...
पावसाची रुपेच इतकी..
की शब्द तरी किती शोधणार?
पाउस तर आहे... म्हणून
कवी स्वतःला... कसा थांबवणार?
पाउस कसा हा आज..
नुसतं भरून आलंय अंधारतंय
कोसळत काही नाही..
हा पाउस असा का वागतोय?
तेच कळत नाही..
वाटते जणू आता बरसेल..
होईल ही माती ओली..
मातीच्या त्या सुगंधाने..
भरेल मी मनझोकाळी...
वारा सुटतो.. गारवा भरतो..
आसमन्तात सार्या...
वाटते जणू आता पडतील
आकाशातुन गारा...
का जाणे पण बरसात नाही..
पाउस कसा हा आज..
फुलवून धरतीवरला निसर्ग..
का चढवीत नाही साज... ?
कोसळत काही नाही..
हा पाउस असा का वागतोय?
तेच कळत नाही..
वाटते जणू आता बरसेल..
होईल ही माती ओली..
मातीच्या त्या सुगंधाने..
भरेल मी मनझोकाळी...
वारा सुटतो.. गारवा भरतो..
आसमन्तात सार्या...
वाटते जणू आता पडतील
आकाशातुन गारा...
का जाणे पण बरसात नाही..
पाउस कसा हा आज..
फुलवून धरतीवरला निसर्ग..
का चढवीत नाही साज... ?
गोष्टी... नाव असलेल्या... नसलेल्या...
कधी कधी नाही सुचत..
कवितेसाठी नाव..
पण, म्हणून कमी होत नाही
कवितेमधला भाव..
प्रत्येक गोष्टीस नाव हवे..
म्हणजे ती ओळखता येते...
परंतु, म्हणून काही निनावी गोष्ट...
केवळ अनोळखी होते?
निणाविच खरी..
पण सौंदर्य तर तेच असते...
नाव नसल्याचा फायदा असा...
की ती प्रत्यक्ष अनुभवावी लागते..
कारण, नाव असलेल्या गोष्टी....
सांगता येतात दुसर्यांना..
नाव नसलेल्या मात्र..
अनुभवावयाच लागतात स्वतःला...
कवितेसाठी नाव..
पण, म्हणून कमी होत नाही
कवितेमधला भाव..
प्रत्येक गोष्टीस नाव हवे..
म्हणजे ती ओळखता येते...
परंतु, म्हणून काही निनावी गोष्ट...
केवळ अनोळखी होते?
निणाविच खरी..
पण सौंदर्य तर तेच असते...
नाव नसल्याचा फायदा असा...
की ती प्रत्यक्ष अनुभवावी लागते..
कारण, नाव असलेल्या गोष्टी....
सांगता येतात दुसर्यांना..
नाव नसलेल्या मात्र..
अनुभवावयाच लागतात स्वतःला...
लेबल:
कविता... कवितेवरची....,
सामाजिक
तो ही 'तिची'च वाट पाहत होता..
मेघांनी जणू उच्छाद मांडला होता,
वीजांनी एकच गोंधळ उडवला होता..
इतके सारे होऊनही
पाउस काही पडत नव्हता..
ती आली..
अन् पाउस धो धो कोसळला..
जणू माझ्यासोबत,
तो ही 'तिची'च वाट पाहत होता.
वीजांनी एकच गोंधळ उडवला होता..
इतके सारे होऊनही
पाउस काही पडत नव्हता..
ती आली..
अन् पाउस धो धो कोसळला..
जणू माझ्यासोबत,
तो ही 'तिची'च वाट पाहत होता.
लेबल:
निसर्ग...,
प्रेमकविता
मी तुला पाहताना..
मी तुला पाहताना असा स्तब्ध होतो...
म्हणायची असते कविता..
पण केवळ शब्दच ओठी येतो...
कधी नयनात तुझ्या हरवतो..
कधी केस तुझे मी निरखतो..
कधी हास्य तुझे न्याहळतो..
कधी.. ना जाणे का...
शून्यात मी विरतो...
मी तुला पाहताना.. असा स्तब्ध होतो...
म्हणायची असते कविता..
पण केवळ शब्दच ओठी येतो...
कधी नयनात तुझ्या हरवतो..
कधी केस तुझे मी निरखतो..
कधी हास्य तुझे न्याहळतो..
कधी.. ना जाणे का...
शून्यात मी विरतो...
मी तुला पाहताना.. असा स्तब्ध होतो...
हेची मागने तत्पर
येता तिथी आषाढाची
लागे ओढ पालखीची
निघे वारी भक्तजणांची
घेण्या भेट विठ्ठलाची||१||
त्याचे मस्तकी चंदन
त्याचे कटीवर कर
रंग सावळा देवाचा
त्याने ल्याले पीतांबर||२||
रूप असे गोजिरे त्याचे
घेण्या भरूनीया डोळा
गावागावातून निघून
वारकरी येथे आला||३||
अश्या विठ्ठलाची व्हावी
कृपा अवघ्या जगतावर
सुखे नान्दो सर्वजण
हेची मागने तत्पर ||४||
लागे ओढ पालखीची
निघे वारी भक्तजणांची
घेण्या भेट विठ्ठलाची||१||
त्याचे मस्तकी चंदन
त्याचे कटीवर कर
रंग सावळा देवाचा
त्याने ल्याले पीतांबर||२||
रूप असे गोजिरे त्याचे
घेण्या भरूनीया डोळा
गावागावातून निघून
वारकरी येथे आला||३||
अश्या विठ्ठलाची व्हावी
कृपा अवघ्या जगतावर
सुखे नान्दो सर्वजण
हेची मागने तत्पर ||४||
ध्यास...
ध्यास...
दिगंतापर्यंत चालत जाण्याचा...
चालता चालता क्षितिज गाठण्याचा...
क्षितिजावरून झेप घेण्याचा...
झेप घेताच उंच उंच उडत जाण्याचा...
उंच आकाशातून
धरतीकडे पाहण्याचा...
उंचावरून पाहताना
भूतकाळ आठवण्याचा...
आणि त्याच भूतकाळाशी तुलना करण्याचा..
तुलना करून आनंदित होण्याचा...
उंचावर पोहोचून...
पुन्हा धरतीवर परतण्याचा...
ध्यास...
दिगंतापर्यंत चालत जाण्याचा...
चालता चालता क्षितिज गाठण्याचा...
क्षितिजावरून झेप घेण्याचा...
झेप घेताच उंच उंच उडत जाण्याचा...
उंच आकाशातून
धरतीकडे पाहण्याचा...
उंचावरून पाहताना
भूतकाळ आठवण्याचा...
आणि त्याच भूतकाळाशी तुलना करण्याचा..
तुलना करून आनंदित होण्याचा...
उंचावर पोहोचून...
पुन्हा धरतीवर परतण्याचा...
ध्यास...
शनिवार, ११ जून, २०११
खोए खोए से
खोए खोए से हम थें
खोए खोए से वो भी|
खोया खोया सा समाँ
खोया था ये जहाँ भी|
खोए खोए ही हमने
उनसे वादा कर लिया|
खो देंगे कायनात को
पर खोएंगे ना उन्हे कभी|
खोए खोए से वो भी|
खोया खोया सा समाँ
खोया था ये जहाँ भी|
खोए खोए ही हमने
उनसे वादा कर लिया|
खो देंगे कायनात को
पर खोएंगे ना उन्हे कभी|
गुरुवार, ९ जून, २०११
भेट शेवटची.. अजुन बाकी आहे...
तुझं ठाऊक नव्हते, होणार नाही
मी तुझ्याचसाठी झुरले...
प्रत्येक क्षणी, हरएक दिनी
मी तुझ्या विचारात गुंतले..
सारे विश्व विसरूनी केवळ..
मी तुझ्याचसाठी जगले..
तूच असा गेलास सोडूनि
मज जगण्यास कारण नुरले..
तरीही केवळ एकाच आशेवर
मी अजुन जिवंत आहे
तुझी नि माझी भेट शेवटची..
अजुन बाकी आहे...
मी तुझ्याचसाठी झुरले...
प्रत्येक क्षणी, हरएक दिनी
मी तुझ्या विचारात गुंतले..
सारे विश्व विसरूनी केवळ..
मी तुझ्याचसाठी जगले..
तूच असा गेलास सोडूनि
मज जगण्यास कारण नुरले..
तरीही केवळ एकाच आशेवर
मी अजुन जिवंत आहे
तुझी नि माझी भेट शेवटची..
अजुन बाकी आहे...
मंगळवार, ३१ मे, २०११
पाउस.. माझ्या मनातला
मला नाही माहीत..
माझ्या मनातला पाउस..
नेमका कसा दिसतो...
इतकं मात्र खरं आहे..
की तो वर्षभर पडतच असतो..
कधी रिमझिमता
कधी धो धो बरसत असतो..
कधी सुकल्यासारखा होतो..
अन् मग अचानकच येतो..
प्रत्येकवेळी तो मला
पुरता भिजवून जातो...
खरंच मला माहीत नाही..
माझ्या मनातला पाउस
नेमका कसा दिसतो...
माझ्या मनातला पाउस..
नेमका कसा दिसतो...
इतकं मात्र खरं आहे..
की तो वर्षभर पडतच असतो..
कधी रिमझिमता
कधी धो धो बरसत असतो..
कधी सुकल्यासारखा होतो..
अन् मग अचानकच येतो..
प्रत्येकवेळी तो मला
पुरता भिजवून जातो...
खरंच मला माहीत नाही..
माझ्या मनातला पाउस
नेमका कसा दिसतो...
सारे पुन्हा... तेच तेच...
तोच क्षण... तीच जागा...
तोच पाउस... अन् तीच तू...
त्याच ओढीने पुन्हा...
तोच भिजलेला ऋतू..
तोच खळाळणारा निर्झर
अन् आकाशी तेच इंद्रधनू..
तुझ्या माझ्या भेटीस सारे
निसर्गानेच घडवले जणू..
त्याच माळरानी पुन्हा
तेच विहरते पाखरू...
त्याच तुझ्या या पापण्या
जणू उडणारे फुलपाखरू...
तोच वारा झोंबणारा
मेघ नभी लागले दाटू..
तोच विजेचा कडकडाट
अन् तीच पुन्हा मिठीत तू..
तोच पाउस... अन् तीच तू...
त्याच ओढीने पुन्हा...
तोच भिजलेला ऋतू..
तोच खळाळणारा निर्झर
अन् आकाशी तेच इंद्रधनू..
तुझ्या माझ्या भेटीस सारे
निसर्गानेच घडवले जणू..
त्याच माळरानी पुन्हा
तेच विहरते पाखरू...
त्याच तुझ्या या पापण्या
जणू उडणारे फुलपाखरू...
तोच वारा झोंबणारा
मेघ नभी लागले दाटू..
तोच विजेचा कडकडाट
अन् तीच पुन्हा मिठीत तू..
जादू.... तुझ्याच अस्तित्वाची...
पाउस, साजणी येतो
तुझ्या निखळ हास्याप्रमाणे..
ओसंडून वाहते नदी
तुझ्या मुखीच्या आनंदाप्रमाणे..
चंद्र मग लपतो जाउनी
त्या नभाच्या आडोशाला
दृष्ट न लागावी म्हणूनी
तुझ्या अलौकिक सौंदर्याला
वीज कडाडून जाते कधी
जणू चमक तुझ्या नयनांची
निसर्ग हिरवा होतो ही...
जादू तुझ्याच अस्तित्वाची...
तुझ्या निखळ हास्याप्रमाणे..
ओसंडून वाहते नदी
तुझ्या मुखीच्या आनंदाप्रमाणे..
चंद्र मग लपतो जाउनी
त्या नभाच्या आडोशाला
दृष्ट न लागावी म्हणूनी
तुझ्या अलौकिक सौंदर्याला
वीज कडाडून जाते कधी
जणू चमक तुझ्या नयनांची
निसर्ग हिरवा होतो ही...
जादू तुझ्याच अस्तित्वाची...
शुक्रवार, २० मे, २०११
भेट अनोळख्या मैत्रीची...
"चल रे... मी निघतो... ३ ची ट्रेन पकडायचीये मला... "
"अरे.. पण घाई काय आहे? थांब जरा.. जाशील आरामशीर.. एकच का ट्रेन आहे?"
भाउ म्हटला... पण मला मात्र कोणत्याही परिस्थितीत तीच ट्रेन पकडायची होती.. त्याला कारणही खास होते म्हणा..
बर्याच दिवसांनी मला "ती" भेटणार होती... बर्याच दिवसांनी म्हणजे खरे तर पहिल्यांदाच प्रत्यक्षात भेटणार होती..
आमची ओळख काही कामानिमित्त झालेली.. पण ती केवळ तितकीच ना राहता मैत्रीत बदललेली... पण प्रत्यक्षात भेट नाहीच.
कधी फोनवर बोलून तर कधी एसएमएसवरुन... कधी नेटवरून असे आमचे बोलणे चालायचे.. अगदी नियमितपणे.. पण दोघे वेगवेगळ्या ठिकाणी... त्यामुळे भेटण्याचा योग कधी नाही आला.. पण म्हणून आम्हाला काही वाईट वाटत नव्हते आणि काही अडतही नव्हते... संपर्कासाठी इतकी साधने होतीच ना...
असेच काही दिवस गेले आणि मग मात्र वाटू लागले... एकदा तरी भेटावं.. ज्या व्यक्तीशी आपण इतके बोलतो.. खूपकाही शेअर करतो, त्या व्यक्तीला एकदा तरी भेटावं असं वाटायला लागलं.. आणि योग जुळून आला.. असे क्वचितच होत असावे.. आपल्याला काही हवयां अन् लगेच योग जुळून यावा आणि आपल्याला हवे ते मिळावे... तसंच झालं...
ती येणार होती माझ्याच शहरात... काही कामानिमित्त... मग ठरवले.. तिला भेटायचे... पाहायचे.. मस्त गप्पा मारायच्या.. तिला मला माहीत असलेल्या गोष्टी बोलायच्या... धमाल करायची.. पण काही केल्या ते जमेल असं वाटत नव्हतं.. कारण, ती जास्त वेळ थांबणार नव्हती... आता काय? ती येणार.. काम करणार आणि लगेच परतणार... यात भेट कशी जमवायची?
मग एक उपाय शोधून काढला... प्रवासातच तिला भेटलो तर? कल्पना उत्तम.. पण खूप घाई करावी लागेल.. ट्रेनचे तिकीट.. नेमकी तीच ट्रेन.. परतीचा प्रवास. सगळ्या गोष्टी जमवव्या लागणार होत्या.. पण आता ठरवलंच आहे भेटायंच तर एवढं करायला हवंच ना... विचार पक्का केला.. पण "तिला" सांगू? की ना सांगताच जाउ भेटायला?.. सरळ सांगून टाकुयात... पण नको थोडी गंमत करू.. सांगायलाच नको.. थेट जाउन भेटू...
तिला साधारण विचारले कधी येणार आहेस, किती वेळ आहेस, नेमकी कशी येणार जाणार वगैरे... आणि तसेच बुकिंग केले गाडीचे.. वाटेतच माझे गाव होते.. म्हणून मग ठरवले, तिच्यासोबत जायचे आणि तसेच गावी उतरून मग घरी यायचे.
*
भावाच्या घरातून निघालो... स्टेशनला जाईपर्यंत मनात अनेक विचार येत होते.. अक्षरशः विचारांचे वादळ उठलेले मनात... ती कशी दिसत असेल... मला ओळखेल का?... बोलेल का माझ्याशी? तिची पहिली प्रतिक्रिया काय असेल? कशीही असो.. एकदा भेट तर नक्कीच व्हावी.. हे सगळा चालू असतानाच अचानक फोनची रिंग वाजली... तिचाच होता कॉल... उचलला...
ती म्हटली, "काय रे?, आज ऑफीसला आला नाहीस तो? सुट्टी घेतलीस? सांगितलं नाहीस ते..."
मी "अगं हो.. किती बोलशील? किती प्रश्न विचारशील?"
ती "मग तू बोल ना... "
मी "काही नाही ग, असंच एक काम होतं म्हणून सुट्टी घेतलीये... अचानक घेतलेली सुट्टी, म्हणून गडबडीत सांगायचं राहिलं..."
ती, "अरे, पण निदान साधा मेसेज पाठवायचा होता.. उगाच काळजी वाटत राहते म्हणून विचारलं आपलं.."
मी, "बरं, ते राहू दे, तू आहेस कुठे? निघालीस की नाही कामावरून?"
ती, "हो, सकाळीच निघाले.. आता आहे अर्ध्या वाटेत.. नेटवर्क नव्हता मध्ये.. म्हणून आता कॉल केला.. तुझ्या शहरात येतेय नं.. म्हणून म्हटलं, कॉल करून बघावं, तुला वेळ आहे किंवा कसे..."
मी, "अगं पण तू तर लगेच निघणारेस ना परत.."
ती, "हो रे, ते ही आहेच.. खूप घाईत असणार आहे.. तरीही जर कुठे थोडासा वेळ मिळाला तर बघू.. भेटूयात.. "
मी, "नक्की... "
ती, "चल, आता ठेवते फोन, बॅटरी टिकवायचीये ना मला... मेसेज करते नंतर.."
मी, "ठीक आहे... बोलूयात मेसेजवर.. बाय"
फोन ठेवला आणि कामाला लागलो... स्टेशनला पोहोचायला वेळ लागणार होता.. कारण, मध्ये काही कामं होतीच.. म्हणून घाई केली..
दरम्यान आमचं बोलणं चालूच होतं मेसेजवर... तिचं काम झालं होतं.. आता, ती निघणार होती परतीच्या प्रवासाला.. अन् मी पोहोचत होतो.. स्टेशनवर.. तिला भेटायला..
*
स्टेशनवर पोचतानाच एक विचार आला.. काहीतरी घ्यावं तिच्यासाठी.. काय घ्यावं? विचार चालू असतानाच गाडीची पहिली सूचना आली... गाडी प्लॅटफॉर्मला लागत होती... थोडा अवधी होता म्हणून मी स्टेशन परिसरात काही मिळेल का ते पाहत होतो... पण, काहीच सुचेना.. आणि मिळेनाही.... शेवटी, तो विचार सोडला आणि स्टेशनवर आलो... गाडी प्लॅटफॉर्मवर उभी होतीच... मग पटकन जाऊन आधी आरक्षण तक्ता पाहिला... माझी सीट माहीत होतीच... पण, मी तिचं नाव शोधत होतो.. .
तेवढ्यात तिचा कॉल आला...
"कुठेस रे?"
"अगं इथेच आहे, स्टेशनजवळ.. थोडा कामात आहे... ते झालं की मग तू निघताना भेटायला येतो... "
अचानक कॉल कट झाला... पुन्हा लावला पण नेटवर्क नव्हतं मिळत.. मग पुन्हा तो रिज़र्वेशन चार्ट बघताना तिचा मेसेज आला..
"अरे, मी गाडीत बसलीये आत्ता... निघेल थोड्यावेळात गाडी..."
मी उत्तर पाठवलं.."अगं पण तू थांबणार होतीस ना थोडा वेळ.. मी थोड्याच वेळात येणार होतो तिकडे... माझं काम झालं की..."
तोवर मला तिच्या बोगीचा नंबर, सीट नंबर मिळाला होता... आणि तो नेमका माझ्याच बोगीतला होता.. आता याला कोणता योग म्हणावा हेच मला सुचत नव्हतं... तेवढ्यात तिचा मेसेज आला...
"अरे... काम जरा लौकरच उरकलं... आणि तसेही या गाडिचेच बुकिंग केले होते... मिळाली गाडी म्हणून निघतीये... सॉरी"
मी पुन्हा रिप्लाय केला... "अगं पण... असो.. गाडी कितीला सुटणार आहे?"
तिचा रिप्लाय... 'आहेत आणखी १५-२० मिनिटे... बघ जमल्यास येऊन जा...'
मी पुढचा मेसेज टाइप करतच होतो आणि तिचा कॉल आला....
"ऐक ना... जमणारे का तुला यायला? म्हणजे गाडी सुटेल आता थोड्याच वेळात..."
मी, "माझं काम उरकलंय आता... मला १० मिनिटे लागतील... पोचतोच मी तिथे..."
ती... "बघ.. लौकर ये.. तेवढीच धावती का होईना भेट होईल..."
"हो... धावतच निघतोय मी... आलोच... "
एवढं बोलून मी कॉल कट केला... आणि बोगीकडे चालू लागलो..
*
"अरे.. पण घाई काय आहे? थांब जरा.. जाशील आरामशीर.. एकच का ट्रेन आहे?"
भाउ म्हटला... पण मला मात्र कोणत्याही परिस्थितीत तीच ट्रेन पकडायची होती.. त्याला कारणही खास होते म्हणा..
बर्याच दिवसांनी मला "ती" भेटणार होती... बर्याच दिवसांनी म्हणजे खरे तर पहिल्यांदाच प्रत्यक्षात भेटणार होती..
आमची ओळख काही कामानिमित्त झालेली.. पण ती केवळ तितकीच ना राहता मैत्रीत बदललेली... पण प्रत्यक्षात भेट नाहीच.
कधी फोनवर बोलून तर कधी एसएमएसवरुन... कधी नेटवरून असे आमचे बोलणे चालायचे.. अगदी नियमितपणे.. पण दोघे वेगवेगळ्या ठिकाणी... त्यामुळे भेटण्याचा योग कधी नाही आला.. पण म्हणून आम्हाला काही वाईट वाटत नव्हते आणि काही अडतही नव्हते... संपर्कासाठी इतकी साधने होतीच ना...
असेच काही दिवस गेले आणि मग मात्र वाटू लागले... एकदा तरी भेटावं.. ज्या व्यक्तीशी आपण इतके बोलतो.. खूपकाही शेअर करतो, त्या व्यक्तीला एकदा तरी भेटावं असं वाटायला लागलं.. आणि योग जुळून आला.. असे क्वचितच होत असावे.. आपल्याला काही हवयां अन् लगेच योग जुळून यावा आणि आपल्याला हवे ते मिळावे... तसंच झालं...
ती येणार होती माझ्याच शहरात... काही कामानिमित्त... मग ठरवले.. तिला भेटायचे... पाहायचे.. मस्त गप्पा मारायच्या.. तिला मला माहीत असलेल्या गोष्टी बोलायच्या... धमाल करायची.. पण काही केल्या ते जमेल असं वाटत नव्हतं.. कारण, ती जास्त वेळ थांबणार नव्हती... आता काय? ती येणार.. काम करणार आणि लगेच परतणार... यात भेट कशी जमवायची?
मग एक उपाय शोधून काढला... प्रवासातच तिला भेटलो तर? कल्पना उत्तम.. पण खूप घाई करावी लागेल.. ट्रेनचे तिकीट.. नेमकी तीच ट्रेन.. परतीचा प्रवास. सगळ्या गोष्टी जमवव्या लागणार होत्या.. पण आता ठरवलंच आहे भेटायंच तर एवढं करायला हवंच ना... विचार पक्का केला.. पण "तिला" सांगू? की ना सांगताच जाउ भेटायला?.. सरळ सांगून टाकुयात... पण नको थोडी गंमत करू.. सांगायलाच नको.. थेट जाउन भेटू...
तिला साधारण विचारले कधी येणार आहेस, किती वेळ आहेस, नेमकी कशी येणार जाणार वगैरे... आणि तसेच बुकिंग केले गाडीचे.. वाटेतच माझे गाव होते.. म्हणून मग ठरवले, तिच्यासोबत जायचे आणि तसेच गावी उतरून मग घरी यायचे.
*
भावाच्या घरातून निघालो... स्टेशनला जाईपर्यंत मनात अनेक विचार येत होते.. अक्षरशः विचारांचे वादळ उठलेले मनात... ती कशी दिसत असेल... मला ओळखेल का?... बोलेल का माझ्याशी? तिची पहिली प्रतिक्रिया काय असेल? कशीही असो.. एकदा भेट तर नक्कीच व्हावी.. हे सगळा चालू असतानाच अचानक फोनची रिंग वाजली... तिचाच होता कॉल... उचलला...
ती म्हटली, "काय रे?, आज ऑफीसला आला नाहीस तो? सुट्टी घेतलीस? सांगितलं नाहीस ते..."
मी "अगं हो.. किती बोलशील? किती प्रश्न विचारशील?"
ती "मग तू बोल ना... "
मी "काही नाही ग, असंच एक काम होतं म्हणून सुट्टी घेतलीये... अचानक घेतलेली सुट्टी, म्हणून गडबडीत सांगायचं राहिलं..."
ती, "अरे, पण निदान साधा मेसेज पाठवायचा होता.. उगाच काळजी वाटत राहते म्हणून विचारलं आपलं.."
मी, "बरं, ते राहू दे, तू आहेस कुठे? निघालीस की नाही कामावरून?"
ती, "हो, सकाळीच निघाले.. आता आहे अर्ध्या वाटेत.. नेटवर्क नव्हता मध्ये.. म्हणून आता कॉल केला.. तुझ्या शहरात येतेय नं.. म्हणून म्हटलं, कॉल करून बघावं, तुला वेळ आहे किंवा कसे..."
मी, "अगं पण तू तर लगेच निघणारेस ना परत.."
ती, "हो रे, ते ही आहेच.. खूप घाईत असणार आहे.. तरीही जर कुठे थोडासा वेळ मिळाला तर बघू.. भेटूयात.. "
मी, "नक्की... "
ती, "चल, आता ठेवते फोन, बॅटरी टिकवायचीये ना मला... मेसेज करते नंतर.."
मी, "ठीक आहे... बोलूयात मेसेजवर.. बाय"
फोन ठेवला आणि कामाला लागलो... स्टेशनला पोहोचायला वेळ लागणार होता.. कारण, मध्ये काही कामं होतीच.. म्हणून घाई केली..
दरम्यान आमचं बोलणं चालूच होतं मेसेजवर... तिचं काम झालं होतं.. आता, ती निघणार होती परतीच्या प्रवासाला.. अन् मी पोहोचत होतो.. स्टेशनवर.. तिला भेटायला..
*
स्टेशनवर पोचतानाच एक विचार आला.. काहीतरी घ्यावं तिच्यासाठी.. काय घ्यावं? विचार चालू असतानाच गाडीची पहिली सूचना आली... गाडी प्लॅटफॉर्मला लागत होती... थोडा अवधी होता म्हणून मी स्टेशन परिसरात काही मिळेल का ते पाहत होतो... पण, काहीच सुचेना.. आणि मिळेनाही.... शेवटी, तो विचार सोडला आणि स्टेशनवर आलो... गाडी प्लॅटफॉर्मवर उभी होतीच... मग पटकन जाऊन आधी आरक्षण तक्ता पाहिला... माझी सीट माहीत होतीच... पण, मी तिचं नाव शोधत होतो.. .
तेवढ्यात तिचा कॉल आला...
"कुठेस रे?"
"अगं इथेच आहे, स्टेशनजवळ.. थोडा कामात आहे... ते झालं की मग तू निघताना भेटायला येतो... "
अचानक कॉल कट झाला... पुन्हा लावला पण नेटवर्क नव्हतं मिळत.. मग पुन्हा तो रिज़र्वेशन चार्ट बघताना तिचा मेसेज आला..
"अरे, मी गाडीत बसलीये आत्ता... निघेल थोड्यावेळात गाडी..."
मी उत्तर पाठवलं.."अगं पण तू थांबणार होतीस ना थोडा वेळ.. मी थोड्याच वेळात येणार होतो तिकडे... माझं काम झालं की..."
तोवर मला तिच्या बोगीचा नंबर, सीट नंबर मिळाला होता... आणि तो नेमका माझ्याच बोगीतला होता.. आता याला कोणता योग म्हणावा हेच मला सुचत नव्हतं... तेवढ्यात तिचा मेसेज आला...
"अरे... काम जरा लौकरच उरकलं... आणि तसेही या गाडिचेच बुकिंग केले होते... मिळाली गाडी म्हणून निघतीये... सॉरी"
मी पुन्हा रिप्लाय केला... "अगं पण... असो.. गाडी कितीला सुटणार आहे?"
तिचा रिप्लाय... 'आहेत आणखी १५-२० मिनिटे... बघ जमल्यास येऊन जा...'
मी पुढचा मेसेज टाइप करतच होतो आणि तिचा कॉल आला....
"ऐक ना... जमणारे का तुला यायला? म्हणजे गाडी सुटेल आता थोड्याच वेळात..."
मी, "माझं काम उरकलंय आता... मला १० मिनिटे लागतील... पोचतोच मी तिथे..."
ती... "बघ.. लौकर ये.. तेवढीच धावती का होईना भेट होईल..."
"हो... धावतच निघतोय मी... आलोच... "
एवढं बोलून मी कॉल कट केला... आणि बोगीकडे चालू लागलो..
*
मंगळवार, १९ एप्रिल, २०११
नुकताच होळीचा सण होऊन गेलेला... उन्हाची तीव्रता वाढलेली.. जणू सूर्य सारी धरणी जाळण्यास निघालेला.. वेळ तशी संध्याकाळची... म्हणजे साधारण चार वाजलेले.. तरीही ऊन मात्र बर्यापैकी.. अशा उन्हात "तो" तळ्याच्या काठावर शांत पाण्याच्या लाटांचा आवाज ऐकत बसून होता.. रोजच्या सारखा.. आता त्याला सवयच झाली होती या सर्वांची.. त्यालाच काय कदाचित त्या सूर्याला.. उन्हाला.. तळे अन् त्याच्या लाटांनाही त्याची सवय झाली असावी... गेले कित्येक दिवस तो असाच रोज येऊन शांत तळ्याकाठी बसून असायचा... शून्यात नजर.. मनात असंख्य विचारांनी काहूर माजलेलं.. वार्याची झूळुक आली की जणू कोणाची तरी चाहूल लागावी असा अस्वस्थ होऊन तो सगळीकडे पाहायचा... अन् कोणीच दिसत नाही कळल्यावर पुन्हा शून्यात हरवायचा..
याच तळ्याच्या काठावर "ती" त्याला भेटलेली... पहिल्याच भेटीत त्याच्या मनात भरलेली.. इथेच दोघांची गट्टी जमलेली... कितीतरी भेटी घडल्या त्या इथेच.. अगदी याच ठिकाणी... त्यावेळी झाड असायचा इथे... चाफ्याचं.. त्या चाफ्याच्या फुलांची माळ करून रोज तो तिला भेट द्यायचा, तीही आवडीने तो चाफा माळायची... सुंदर दिसायाची... एखादी परिच जणू..
होतीच ती तशी... नाजूक.. गोरिपान... टपोरया घार्या डोळ्यांची... नेहमीच आनंदी राहणारी.. स्वतःच्याच स्वप्नांच्या दुनियेत रमणारी.. नेहमी म्हणायची... "तू अगदी माझ्या स्वप्नातल्या राजकुमारासारखा आहेस.. मला हवा होतास तसाच..."
तोही विचारायचा... "म्हणजे... नक्की कसा?"...
"ते नाही सांगता येत मला... पण आहेस तू तसा.. एवढं मला माहीत आहे..."
"अगं, पण काहीतरी सांगशील की नाही..."
"नाही सांगता येत मला... पण एक मात्र आहे.. मी स्वप्नात पाहिलंय तुला.. कितीतरी वेळा.. तू भेटायच्या आधीपासून..."
"खरंच.. की उगाच आपलं मला चांगलं वाटावं म्हणून बोलतीयेस..?"
"अगदी खरं... तुझी शपथ.."
अन् मग तो मोहरुन जायचा... तिच्या त्या निरागस.. टपोरया डोळ्यांत हरवून जायचा... कितीतरी वेळ दोघे एकमेकांच्या नजरेत नजर मिळवून बसून असायचे... काहीही ना बोलता...
या सार्या आठवणींत बुडालेला असताना कोणीतरी मागून हाक मरायचं... "काय रे माधव... झाली का समाधी लावून... सूर्य गेला कंटाळून आता... चल बघू घरी..."
तो तसाच विचारांमध्ये... तिच्या आठवणींमध्ये रमत तिथून उठायचा... अन् घरची वाट धरायचा... रोज.. अगदी रोज हे असंच घडायचं...
(To Be Continued... )
याच तळ्याच्या काठावर "ती" त्याला भेटलेली... पहिल्याच भेटीत त्याच्या मनात भरलेली.. इथेच दोघांची गट्टी जमलेली... कितीतरी भेटी घडल्या त्या इथेच.. अगदी याच ठिकाणी... त्यावेळी झाड असायचा इथे... चाफ्याचं.. त्या चाफ्याच्या फुलांची माळ करून रोज तो तिला भेट द्यायचा, तीही आवडीने तो चाफा माळायची... सुंदर दिसायाची... एखादी परिच जणू..
होतीच ती तशी... नाजूक.. गोरिपान... टपोरया घार्या डोळ्यांची... नेहमीच आनंदी राहणारी.. स्वतःच्याच स्वप्नांच्या दुनियेत रमणारी.. नेहमी म्हणायची... "तू अगदी माझ्या स्वप्नातल्या राजकुमारासारखा आहेस.. मला हवा होतास तसाच..."
तोही विचारायचा... "म्हणजे... नक्की कसा?"...
"ते नाही सांगता येत मला... पण आहेस तू तसा.. एवढं मला माहीत आहे..."
"अगं, पण काहीतरी सांगशील की नाही..."
"नाही सांगता येत मला... पण एक मात्र आहे.. मी स्वप्नात पाहिलंय तुला.. कितीतरी वेळा.. तू भेटायच्या आधीपासून..."
"खरंच.. की उगाच आपलं मला चांगलं वाटावं म्हणून बोलतीयेस..?"
"अगदी खरं... तुझी शपथ.."
अन् मग तो मोहरुन जायचा... तिच्या त्या निरागस.. टपोरया डोळ्यांत हरवून जायचा... कितीतरी वेळ दोघे एकमेकांच्या नजरेत नजर मिळवून बसून असायचे... काहीही ना बोलता...
या सार्या आठवणींत बुडालेला असताना कोणीतरी मागून हाक मरायचं... "काय रे माधव... झाली का समाधी लावून... सूर्य गेला कंटाळून आता... चल बघू घरी..."
तो तसाच विचारांमध्ये... तिच्या आठवणींमध्ये रमत तिथून उठायचा... अन् घरची वाट धरायचा... रोज.. अगदी रोज हे असंच घडायचं...
(To Be Continued... )
ती..........
तिच्या केवळ चाहूलीनेच
त्याच्या अंगावर शहारा यायचा...
ती समोर आली की जणू
ग्रीष्मातही शरदाचा भास व्हायचा..
तिच्या नजरेतून जणू
चांदण्याची झलक मिळायची..
तिच्या कोमल आवाजाने
सारी सृष्टी मोहून जायची..
तिच्या येण्या जाण्यानेच
इतके सारे व्हायचे..
की जणू... सार्या जीवनाचे..
सार्थक होऊ पाहायचे...
ती आली होती..
खूप काही घेऊन..
अन् गेली तेव्हा...
सारे घेऊन गेली..
त्याच्या अंगावर शहारा यायचा...
ती समोर आली की जणू
ग्रीष्मातही शरदाचा भास व्हायचा..
तिच्या नजरेतून जणू
चांदण्याची झलक मिळायची..
तिच्या कोमल आवाजाने
सारी सृष्टी मोहून जायची..
तिच्या येण्या जाण्यानेच
इतके सारे व्हायचे..
की जणू... सार्या जीवनाचे..
सार्थक होऊ पाहायचे...
ती आली होती..
खूप काही घेऊन..
अन् गेली तेव्हा...
सारे घेऊन गेली..
मंगळवार, २९ मार्च, २०११
तू नसलीस..
मेघ नसतात,
आभाळ अगदी निरभ्र असतं...
पण माझ्या डोळ्यांना मात्र
ते भरून आलेलं दिसतं..
लख्ख सूर्यप्रकाश असतानाही..
अंधारुन आल्यासारखं वाटतं...
कधी, रात्रीचा चंद्र छान खुलून हसतो..
मला मात्र तो उदास भासतो..
तारकांनी भरलेलं असतं आभाळ
मला मात्र अगदीच रिकामं वाटतं असतं...
तू नसलीस..
की हे असं काहीसं होत असतं..
आभाळ अगदी निरभ्र असतं...
पण माझ्या डोळ्यांना मात्र
ते भरून आलेलं दिसतं..
लख्ख सूर्यप्रकाश असतानाही..
अंधारुन आल्यासारखं वाटतं...
कधी, रात्रीचा चंद्र छान खुलून हसतो..
मला मात्र तो उदास भासतो..
तारकांनी भरलेलं असतं आभाळ
मला मात्र अगदीच रिकामं वाटतं असतं...
तू नसलीस..
की हे असं काहीसं होत असतं..
शुक्रवार, २८ जानेवारी, २०११
कुंपण...
प्रत्येक मनाला
एक काटेरी कुंपण असतं...
ते कधी ओलांडता येत नाही ...
मन कुठेही गेलं
तरी कुंपण त्याला सोडत नाही..
मनाला ते सांगत राहतं..
मर्यादा त्याची दाखवत राहतं..
पण, मन मात्र ऐकत नाही..
कुंपणाकडे पहात नाही..
कुंपण मग ईरेला पेटतं..
मनाला उडूच देत नाही..
कधी मन, कुंपण तोडतं... उंच उडतं....
मग त्याला वाटू लागतं..
की, कुंपणाशिवाय जगता येतं..
पण, त्याहून शहाणं असतं...
हळूच मनाच्या नकळत..
मनाला नव्यानं मिठीत घेतं...
एक काटेरी कुंपण असतं...
ते कधी ओलांडता येत नाही ...
मन कुठेही गेलं
तरी कुंपण त्याला सोडत नाही..
मनाला ते सांगत राहतं..
मर्यादा त्याची दाखवत राहतं..
पण, मन मात्र ऐकत नाही..
कुंपणाकडे पहात नाही..
कुंपण मग ईरेला पेटतं..
मनाला उडूच देत नाही..
कधी मन, कुंपण तोडतं... उंच उडतं....
मग त्याला वाटू लागतं..
की, कुंपणाशिवाय जगता येतं..
पण, त्याहून शहाणं असतं...
हळूच मनाच्या नकळत..
मनाला नव्यानं मिठीत घेतं...
मंगळवार, २५ जानेवारी, २०११
प्रेमास भरती येते...
ती कुशीत शिरली
की तो खुलतो..
त्याने मिठी घट्ट केली
की ती आनंदून जाते...
तिच्या एका नजरेत
तो घायाळ होतो..
त्याच्या स्पर्शाने
ती मोहरून जाते..
तिच्या चुंबनाने
तो शहारुन उठतो..
त्याच्या सहवासात
ती हरवलीशी होते..
रातराणी सुगंधते
रात मोहमयी करते..
चंद्र पूर्णत्वा येतो
प्रेमास भरती येते...
की तो खुलतो..
त्याने मिठी घट्ट केली
की ती आनंदून जाते...
तिच्या एका नजरेत
तो घायाळ होतो..
त्याच्या स्पर्शाने
ती मोहरून जाते..
तिच्या चुंबनाने
तो शहारुन उठतो..
त्याच्या सहवासात
ती हरवलीशी होते..
रातराणी सुगंधते
रात मोहमयी करते..
चंद्र पूर्णत्वा येतो
प्रेमास भरती येते...
मोठं ध्येय गाठण्यासाठी...
फुलपाखरू...
किती सुंदर, किती नाजूक...
अगदी अलगद हळूवार उडणारे..
कितीतरी इतर पाखरांसोबत..
स्वछन्दी आयुष्य जगणारे...
पण तरीही सतत
एकाच मर्यादेत राहणारे..
तीच साथ, तोच परिसर...
जीवनसुद्धा अगदी...
काही दिसभर...
म्हणूनच कदाचित..
आपल्याला फुलपाखरू व्हावंसं वाटतं...
मनाप्रमाणे उडत राहून..
केवळ आनंदी राहावं वाटतं...
पण, त्या नादात विसरतो आपण..
उंच उडायला फुलपाखरू नव्हे..
तर, गरूड व्हावं लागतं..
मोठं ध्येय गाठण्यासाठी...
पंखांमध्ये मोठं बळ असावं लागतं..
किती सुंदर, किती नाजूक...
अगदी अलगद हळूवार उडणारे..
कितीतरी इतर पाखरांसोबत..
स्वछन्दी आयुष्य जगणारे...
पण तरीही सतत
एकाच मर्यादेत राहणारे..
तीच साथ, तोच परिसर...
जीवनसुद्धा अगदी...
काही दिसभर...
म्हणूनच कदाचित..
आपल्याला फुलपाखरू व्हावंसं वाटतं...
मनाप्रमाणे उडत राहून..
केवळ आनंदी राहावं वाटतं...
पण, त्या नादात विसरतो आपण..
उंच उडायला फुलपाखरू नव्हे..
तर, गरूड व्हावं लागतं..
मोठं ध्येय गाठण्यासाठी...
पंखांमध्ये मोठं बळ असावं लागतं..
लेबल:
असेच काहीतरी,
सामाजिक
कधीवर चालायचे???
पौर्णिमेचा चंद्र पाहुनि केवळ..
कधीवर मी झुरायचे?
गोजिर्या मुखड्यास कधीवर...
चंद्रबिंबात शोधायचे?
अमावस्येच्या रात्रीपरि
अंधारास मी पाहायचे...
चांदण्यांच्या वाकुल्यांना
शांततेने सहायचे..
सखे, हे असे सारे, सांग मजला...
कधीवर गं चालायचे???
कधीवर मी झुरायचे?
गोजिर्या मुखड्यास कधीवर...
चंद्रबिंबात शोधायचे?
अमावस्येच्या रात्रीपरि
अंधारास मी पाहायचे...
चांदण्यांच्या वाकुल्यांना
शांततेने सहायचे..
सखे, हे असे सारे, सांग मजला...
कधीवर गं चालायचे???
तिरंगाच आहे...
रंग मनाचा माझ्या
भगवाच आहे...
किंवा तुझ्या मनाचा हिरवाच आहे...
कोण्या एकाचा तो निळाच राहावा...
आणखी कोणा एकाचा पांढराच आहे....
प्रचार आणि प्रसार सध्या
असाच आहे..
प्रश्न नसे असा की.
कोण करे हा प्रसार
अन् कोण करे विरोध त्याला..
प्रश्न असा की नक्की
खरा कोण आहे..
विचार करता परंतु,
येते ध्यानी..
या सार्याहूनही...
रंग आपुला वेगळाच आहे..
मनास विचारिता समजते...
नसे हा रंग अजिबात निराळा...
रंग हा तिरंगाच आहे...
भगवाच आहे...
किंवा तुझ्या मनाचा हिरवाच आहे...
कोण्या एकाचा तो निळाच राहावा...
आणखी कोणा एकाचा पांढराच आहे....
प्रचार आणि प्रसार सध्या
असाच आहे..
प्रश्न नसे असा की.
कोण करे हा प्रसार
अन् कोण करे विरोध त्याला..
प्रश्न असा की नक्की
खरा कोण आहे..
विचार करता परंतु,
येते ध्यानी..
या सार्याहूनही...
रंग आपुला वेगळाच आहे..
मनास विचारिता समजते...
नसे हा रंग अजिबात निराळा...
रंग हा तिरंगाच आहे...
शनिवार, ४ डिसेंबर, २०१०
एक ....
एक घाव...
मनावरचा..
एक धार...
रक्ताची... लाल रंगाची..
एक शब्द...
शेवटचा...
एक आरोळी...
मनातली.. मनाची
एक क्षण..
शेवटचा..
एक प्रश्न...
आयुष्याचा.. मरणाचा..
मनावरचा..
एक धार...
रक्ताची... लाल रंगाची..
एक शब्द...
शेवटचा...
एक आरोळी...
मनातली.. मनाची
एक क्षण..
शेवटचा..
एक प्रश्न...
आयुष्याचा.. मरणाचा..
गुरुवार, १४ ऑक्टोबर, २०१०
मध्यरात्रीच्या वेळी...
मध्यरात्रीच्या वेळी अचानक
सख्यास जाग आली...
पाहिले सखिला तेव्हा सखी
झोपेतच, हसताना दिसली...
निरखून पाहता जाणवले...
कोण्या स्वप्नात गुंग होती...
तसाच होता तिला न्याहाळत तो...
जेव्हा जाग सखीसही आली...
पाहिले तिने सख्यास जेव्हा..
पुन्हा लाजुनी डोळे मिटुनी...
सखी मग, मिठीत सख्याच्या शिरली...
सख्यास जाग आली...
पाहिले सखिला तेव्हा सखी
झोपेतच, हसताना दिसली...
निरखून पाहता जाणवले...
कोण्या स्वप्नात गुंग होती...
तसाच होता तिला न्याहाळत तो...
जेव्हा जाग सखीसही आली...
पाहिले तिने सख्यास जेव्हा..
पुन्हा लाजुनी डोळे मिटुनी...
सखी मग, मिठीत सख्याच्या शिरली...
मंगळवार, १२ ऑक्टोबर, २०१०
निर्णय
चुकीच्या म्हटलेल्या गोष्टी
नेहमीच चुकीच्या असतात?
योग्य म्हटलेल्या गोष्टी
कधीच का चुकीच्या नसतात?
परिस्थितीच्या गरजेनुसार
प्रत्येकजण वागत असतो
त्या क्षणी, त्या परिस्थितीत
प्रत्येकजण बरोबर असतो..
मग मागाहून त्या गोष्टी
चुकीच्या म्हणण्यात काय अर्थ?
असंच जर म्हणायचं असेल
तर सारं जीवनच होईल व्यर्थ
म्हणूनच घेतलेल्या निर्णयावर
ठाम राहता यायला हवं..
पुढं येणार्या प्रत्येक प्रश्नाचं
उत्तर देता यायला हवं
नाहीतर जगाच्या संगण्यानुसार
आपण प्रत्येक गोष्ट करतो
आयुष्याच्या शेवतो मात्र
आपणच मूर्ख ठरतो...
नेहमीच चुकीच्या असतात?
योग्य म्हटलेल्या गोष्टी
कधीच का चुकीच्या नसतात?
परिस्थितीच्या गरजेनुसार
प्रत्येकजण वागत असतो
त्या क्षणी, त्या परिस्थितीत
प्रत्येकजण बरोबर असतो..
मग मागाहून त्या गोष्टी
चुकीच्या म्हणण्यात काय अर्थ?
असंच जर म्हणायचं असेल
तर सारं जीवनच होईल व्यर्थ
म्हणूनच घेतलेल्या निर्णयावर
ठाम राहता यायला हवं..
पुढं येणार्या प्रत्येक प्रश्नाचं
उत्तर देता यायला हवं
नाहीतर जगाच्या संगण्यानुसार
आपण प्रत्येक गोष्ट करतो
आयुष्याच्या शेवतो मात्र
आपणच मूर्ख ठरतो...
लेबल:
मैत्री / नाती,
सामाजिक
शुक्रवार, ८ ऑक्टोबर, २०१०
कसूर
हम कहते गये जो ना कहना था…
वो हर लब्जपे हमारें बस रोते गये..
कसूर तो हमारा ही था..
जो ना देखा उनकी आँखों में..
बस खुद के जख्म दिखातें रहे..
हक़िक़त तो ये थी की
पुरा दिल कुरेडा था हमने..
पर उन्होने उफ्फ भी ना किया…
और हम और घाव बनातें गये..
जब पता चला के हम ही गलत थे…
देखा सनम का हाल…
उसके बाद से जिंदगी के आखरी साँस तक..
बस खुद ही से आंखें चुराते रहे..
वो हर लब्जपे हमारें बस रोते गये..
कसूर तो हमारा ही था..
जो ना देखा उनकी आँखों में..
बस खुद के जख्म दिखातें रहे..
हक़िक़त तो ये थी की
पुरा दिल कुरेडा था हमने..
पर उन्होने उफ्फ भी ना किया…
और हम और घाव बनातें गये..
जब पता चला के हम ही गलत थे…
देखा सनम का हाल…
उसके बाद से जिंदगी के आखरी साँस तक..
बस खुद ही से आंखें चुराते रहे..
बुधवार, ६ ऑक्टोबर, २०१०
तुझ्यासाठीच केवळ...
सखे.. तुझ्यासाठी मेळवेन
मी अवकाश धुलीला.
तुझ्यासाठी नमवेन
मी या सार्या जगाला..
सांगशील तू तर सूर्यास विझवेन...
तुझी उशी बनवण्या चंद्रासही आणेन...
तुझ्या हाकेवर केवळ मी
उभा जन्म वाहीन...
तुझ्यासाठीच केवळ...
पुन्हा पुन्हा जन्म घेईन...
मी अवकाश धुलीला.
तुझ्यासाठी नमवेन
मी या सार्या जगाला..
सांगशील तू तर सूर्यास विझवेन...
तुझी उशी बनवण्या चंद्रासही आणेन...
तुझ्या हाकेवर केवळ मी
उभा जन्म वाहीन...
तुझ्यासाठीच केवळ...
पुन्हा पुन्हा जन्म घेईन...
ओढ कशाची असे मनाला...
सामोरी येता तू सखे
हरवतो डोळ्यात तुझ्या...
नसशी समोर जेव्हा तू..
आठवतो नजरेस तुझ्या...
सांग मला मग कधी बोलावे...
काय माझ्या मनात असे अन्..
कसे सांगावे सखे तुला...
नित्याचेच झाले हरवणे..
आठवणे.. केवळ तुला...
सांग सखे मी राहू कसा..
जर दिसली नाहीस तू... कधी मला...
मला ना ठावे काय असे हे..
का हे घडावे, माझ्यासवे...
ओढ कशाची असे मनाला...
प्रेम का जडले.. तुझ्यासवे?
हरवतो डोळ्यात तुझ्या...
नसशी समोर जेव्हा तू..
आठवतो नजरेस तुझ्या...
सांग मला मग कधी बोलावे...
काय माझ्या मनात असे अन्..
कसे सांगावे सखे तुला...
नित्याचेच झाले हरवणे..
आठवणे.. केवळ तुला...
सांग सखे मी राहू कसा..
जर दिसली नाहीस तू... कधी मला...
मला ना ठावे काय असे हे..
का हे घडावे, माझ्यासवे...
ओढ कशाची असे मनाला...
प्रेम का जडले.. तुझ्यासवे?
शनिवार, २ ऑक्टोबर, २०१०
त्या दोघांची... चंदेरी भेट
पावसाळा नुकताच संपलेला...
संध्याकाळची वेळ....
नदीचा तीर... खळखलणारे पाणी..
आकाशी चाललेला रंगांचा खेळ...
पश्चिमेने उधळलेल्या रंगछटा
अश्याच काहीश्या सखीच्या केशलता...
तिचे मावळतीच्या खेळात मग्न होणे...
त्याचे मात्र तिच्याकडे पहाणे...
मधूनच एखादी वार्याची झुळुक..
अंगावर आणते शहारा हळूच..
कातरवेळी त्याचा तिला स्पर्श..
शृंगाराचीच जणू देई चुणूक...
मावळतीला अंधार दाटत जातो...
पूर्वेहून मग चंद्रकला उगवते..
त्या दोघांची भेट तेव्हा पूर्ण होते...
जेव्हा... चंद्राने रात्र चंदेरी होते...
संध्याकाळची वेळ....
नदीचा तीर... खळखलणारे पाणी..
आकाशी चाललेला रंगांचा खेळ...
पश्चिमेने उधळलेल्या रंगछटा
अश्याच काहीश्या सखीच्या केशलता...
तिचे मावळतीच्या खेळात मग्न होणे...
त्याचे मात्र तिच्याकडे पहाणे...
मधूनच एखादी वार्याची झुळुक..
अंगावर आणते शहारा हळूच..
कातरवेळी त्याचा तिला स्पर्श..
शृंगाराचीच जणू देई चुणूक...
मावळतीला अंधार दाटत जातो...
पूर्वेहून मग चंद्रकला उगवते..
त्या दोघांची भेट तेव्हा पूर्ण होते...
जेव्हा... चंद्राने रात्र चंदेरी होते...
गुरुवार, ९ सप्टेंबर, २०१०
श्रेय नसे माझे कसले..
"नेहमीच कसे तुझं
सांग समजते.. मनातले माझ्या..
भावना कधी मी
व्यक्त न करता..
पोहोचति कश्या मनी तुझ्या...
सांग सख्या मज...
कसे समजते...
काय हवे असे मजला..
कसे जमवसि शब्द कुठूनसे..
रचावया गझला.."
"सखे, जरी तुझं वाटे कठीण हे..
किंचितही.. नाही तसे..
शब्द शोधण्या... कुठे न जाता..
मिळती मजला...
सौंदर्यच तुझे असे...
श्रेय नसे माझे कसले..
केवळ तुला मी वर्णिले..
सांग समजते.. मनातले माझ्या..
भावना कधी मी
व्यक्त न करता..
पोहोचति कश्या मनी तुझ्या...
सांग सख्या मज...
कसे समजते...
काय हवे असे मजला..
कसे जमवसि शब्द कुठूनसे..
रचावया गझला.."
"सखे, जरी तुझं वाटे कठीण हे..
किंचितही.. नाही तसे..
शब्द शोधण्या... कुठे न जाता..
मिळती मजला...
सौंदर्यच तुझे असे...
श्रेय नसे माझे कसले..
केवळ तुला मी वर्णिले..
ती रूसते...
ती रूसते...
अन् तो तिला मनवतो...
कधी तिच्यावर कविता करतो..
तर कधी तिच्यासाठी गाणे गातो..
कधी लाडीक रागाने बोलतो..
कधी तोही रुसून बसतो...
प्रत्येकवेळी... रुसवा काढायला..
बोलावेच लागते असे नाही..
कधी एका नजरेत ती हसते...
कधी.. केवळ एक 'स्पर्श'च पुरतो...
अन् तो तिला मनवतो...
कधी तिच्यावर कविता करतो..
तर कधी तिच्यासाठी गाणे गातो..
कधी लाडीक रागाने बोलतो..
कधी तोही रुसून बसतो...
प्रत्येकवेळी... रुसवा काढायला..
बोलावेच लागते असे नाही..
कधी एका नजरेत ती हसते...
कधी.. केवळ एक 'स्पर्श'च पुरतो...
देवाजीचे देणे...
देवाजीचे देणे...
त्यास.. आपण काय करावे?
त्याने दिले ते घ्यावे...
सर्व जगताला वाटावे...
सारे वाटून पुन्हा रिक्त व्हावे...
त्याच्या नव्या देण्यासाठी...
असेच घेऊन.. वाटत राहून...
पुन्हा पुन्हा रिक्त व्हावे...
समस्त जगाच्या भल्यासाठी..
त्यास.. आपण काय करावे?
त्याने दिले ते घ्यावे...
सर्व जगताला वाटावे...
सारे वाटून पुन्हा रिक्त व्हावे...
त्याच्या नव्या देण्यासाठी...
असेच घेऊन.. वाटत राहून...
पुन्हा पुन्हा रिक्त व्हावे...
समस्त जगाच्या भल्यासाठी..
छोटीशी.. छानशी.. कविता
छोटीशी? छानशी?
कविता तुला..
ऐकवुच कशी मी?
मनी जे दाटे.. मला जे वाटे..
भावना तुझ्यासाठीची...
मोजक्याच शब्दात...
मांडू कशी मी?
रूप तुझे जे आरसपाणी...
पाहता तुला होते
धुंद ही अवनी...
सांग तूच सखे...
इवल्याश्या काव्यात
वर्णू कशी मी.. ?
छोटीशी.. छानशी..
कविता तुला...
ऐकवुच कशी मी?
कविता तुला..
ऐकवुच कशी मी?
मनी जे दाटे.. मला जे वाटे..
भावना तुझ्यासाठीची...
मोजक्याच शब्दात...
मांडू कशी मी?
रूप तुझे जे आरसपाणी...
पाहता तुला होते
धुंद ही अवनी...
सांग तूच सखे...
इवल्याश्या काव्यात
वर्णू कशी मी.. ?
छोटीशी.. छानशी..
कविता तुला...
ऐकवुच कशी मी?
शुक्रवार, ३ सप्टेंबर, २०१०
अमावस्या?
अमावस्या असली..
तरी तिला मात्र चंद्रच हवा असायचा..
तारे कितीही लुकलुकले..
कितीही सुंदर दिसले..
अगदी संपूर्ण अवकाश जरी त्यांनी व्यापले..
तिला ते आवडले तरी म्हणायची..
"चंद्र असता तर आणखी मजा आली असती नाही?"
किंवा कधी म्हणायची..
"चंद्रप्रकाशातले जग काही निराळेच"
झाले.. छान गप्पा चालू असताना..
ते दोघे प्रेमात दंग असताना,
ती अशी काहीसे म्हणायची..
एक दिवस ना राहवून
तो तिला म्हटला..
"सखे, चंद्र हवा असतो तुला..
त्याची उणीव भासते तुला..
पण, मला नाही भासत कधी त्याची उणीव..
अन् त्या तारयांनाही नसेल वाटत असे काही..
कारण, माझ्यासाठी, त्यांच्यासाठी..
अमावस्या कधी होतच नाही..
चंद्र नसेल उगवत कदाचित त्या रात्री..
पण तुझ्या रूपाने असतोच ना तो समोर.."
सखी काय म्हणणार..
कौतुकाने पाहत राहते..
त्याला.. अन् तारयांना...
तरी तिला मात्र चंद्रच हवा असायचा..
तारे कितीही लुकलुकले..
कितीही सुंदर दिसले..
अगदी संपूर्ण अवकाश जरी त्यांनी व्यापले..
तिला ते आवडले तरी म्हणायची..
"चंद्र असता तर आणखी मजा आली असती नाही?"
किंवा कधी म्हणायची..
"चंद्रप्रकाशातले जग काही निराळेच"
झाले.. छान गप्पा चालू असताना..
ते दोघे प्रेमात दंग असताना,
ती अशी काहीसे म्हणायची..
एक दिवस ना राहवून
तो तिला म्हटला..
"सखे, चंद्र हवा असतो तुला..
त्याची उणीव भासते तुला..
पण, मला नाही भासत कधी त्याची उणीव..
अन् त्या तारयांनाही नसेल वाटत असे काही..
कारण, माझ्यासाठी, त्यांच्यासाठी..
अमावस्या कधी होतच नाही..
चंद्र नसेल उगवत कदाचित त्या रात्री..
पण तुझ्या रूपाने असतोच ना तो समोर.."
सखी काय म्हणणार..
कौतुकाने पाहत राहते..
त्याला.. अन् तारयांना...
मंगळवार, ३१ ऑगस्ट, २०१०
पौर्णिमेच्या चांदण्यात
पौर्णिमेच्या चांदण्यात
ती भेटीला येते...
जणू, स्वर्गीची कोणी अप्सराच
माझ्या सामोरी येते...
सौंदर्यकडांवरून तिच्या
जेव्हा चांदणे फिरते...
अप्सरेची कल्पनाही मग..
केवळ खूजी वाटते..
ओठांवरुनी थरथरणार्या
माझा स्पर्श जेव्हा फिरतो...
सौंदर्य तिचे जणू मग..
परिपूर्ण वाटते...
प्रणयात तिच्या मी.
मग चांदण्यात त्या
असा धुंध होतो...
चंद्रास्त होतो, रात्रही संपते...
तरीही केवळ तिच्या
स्वप्नात मी रमतो...
ती भेटीला येते...
जणू, स्वर्गीची कोणी अप्सराच
माझ्या सामोरी येते...
सौंदर्यकडांवरून तिच्या
जेव्हा चांदणे फिरते...
अप्सरेची कल्पनाही मग..
केवळ खूजी वाटते..
ओठांवरुनी थरथरणार्या
माझा स्पर्श जेव्हा फिरतो...
सौंदर्य तिचे जणू मग..
परिपूर्ण वाटते...
प्रणयात तिच्या मी.
मग चांदण्यात त्या
असा धुंध होतो...
चंद्रास्त होतो, रात्रही संपते...
तरीही केवळ तिच्या
स्वप्नात मी रमतो...
शृंगार... तिचा अन् माझा
तिच्या माझ्यातले अंतर ..
जेव्हा कमी होते..
जणू, शृंगारालाही तेव्हा..
भरभरून येते..
तारुण्य तिचे नि माझे..
जेव्हा.. एकरूप होते..
चंद्रकिरणासही मधून शिरण्या...
जागा न उरते..
श्वासांतून वाहू लागता
श्वास तिचा माझा..
प्रलयालाही स्पर्धा करण्या
ताकद ना मिळते...
प्रेमास तिच्या अन् माझ्या
जेव्हा उधाण येते...
प्रेमदेवतेलाही मग
काही सुचेनासे होते...
जेव्हा कमी होते..
जणू, शृंगारालाही तेव्हा..
भरभरून येते..
तारुण्य तिचे नि माझे..
जेव्हा.. एकरूप होते..
चंद्रकिरणासही मधून शिरण्या...
जागा न उरते..
श्वासांतून वाहू लागता
श्वास तिचा माझा..
प्रलयालाही स्पर्धा करण्या
ताकद ना मिळते...
प्रेमास तिच्या अन् माझ्या
जेव्हा उधाण येते...
प्रेमदेवतेलाही मग
काही सुचेनासे होते...
भूतकाळ येतो... आणि ...
एक दिवस अचानक समोर येतो...
भूतकाळ..
असा भूतकाळ, ज्याने आपल्याला
वेड लावलेले होते..
ज्याच्याशिवाय.. कधीकाळी..
जगनेही मुश्कील झालेले होते..
असा भूतकाळ.. जो कधी वर्तमान होता...
भविष्य होता..
पण.. पण अचानक..
काळाच्याच कोण्या खेळाने..
आपल्यापासून दुरावला होता..
भूतकाळ... आपले प्रचंड प्रेम असलेला..
आपल्याला प्रचंड त्रास दिलेला..
आपल्या संपूर्ण भविष्यावर ज्याचे सावट कायमचे पसरले गेले...
असा एक भूतकाळ...
तो सामोरा आला की आपण भले म्हणतो..
"जा, नाही काही अडत माझे तुझ्याविना...
जा.. काडीमात्रही किंमत नाहीए आता तुझी मला... "
पण खोलवर मनात मात्र...
पुन्हा सार्या जुन्या जखमा
ताज्या झालेल्या असतात...
पुन्हा सार्या भावनांनी
एकच उच्छाद मांडलेला असतो...
केवळ त्या भूतकालाच्या झलकेनेच...
सारा सारा आयुष्याचा ताळमेळ
बिघडलेला असतो...
असा भूतकाळ येतो... आणि
शून्यातून सुरूवात करून निर्माण केलेल्या नव्या आयुष्यलाही...
पुन्हा एकदा शून्यावर नेऊन ठेवतो...
भूतकाळ..
असा भूतकाळ, ज्याने आपल्याला
वेड लावलेले होते..
ज्याच्याशिवाय.. कधीकाळी..
जगनेही मुश्कील झालेले होते..
असा भूतकाळ.. जो कधी वर्तमान होता...
भविष्य होता..
पण.. पण अचानक..
काळाच्याच कोण्या खेळाने..
आपल्यापासून दुरावला होता..
भूतकाळ... आपले प्रचंड प्रेम असलेला..
आपल्याला प्रचंड त्रास दिलेला..
आपल्या संपूर्ण भविष्यावर ज्याचे सावट कायमचे पसरले गेले...
असा एक भूतकाळ...
तो सामोरा आला की आपण भले म्हणतो..
"जा, नाही काही अडत माझे तुझ्याविना...
जा.. काडीमात्रही किंमत नाहीए आता तुझी मला... "
पण खोलवर मनात मात्र...
पुन्हा सार्या जुन्या जखमा
ताज्या झालेल्या असतात...
पुन्हा सार्या भावनांनी
एकच उच्छाद मांडलेला असतो...
केवळ त्या भूतकालाच्या झलकेनेच...
सारा सारा आयुष्याचा ताळमेळ
बिघडलेला असतो...
असा भूतकाळ येतो... आणि
शून्यातून सुरूवात करून निर्माण केलेल्या नव्या आयुष्यलाही...
पुन्हा एकदा शून्यावर नेऊन ठेवतो...
लेबल:
असेच काहीतरी,
मैत्री / नाती
सोमवार, ३० ऑगस्ट, २०१०
मी.. प्रेमात बुडालेला..
तू काळी मोगर्याची
वा झुळुक वार्याची
मी सुगंध वाहणारा....
तू वीज कडाडनारी..
वा कृष्णमेघांची दाटी....
मी कोसळत्या धारा...
तू परी स्वप्नातली..
वा राणी सत्यातली..
मी.. स्वप्न पाहणारा..
तू व्याख्या प्रेमाची
वा जाणीव अस्तित्वाची..
मी.. प्रेमात बुडालेला..
वा झुळुक वार्याची
मी सुगंध वाहणारा....
तू वीज कडाडनारी..
वा कृष्णमेघांची दाटी....
मी कोसळत्या धारा...
तू परी स्वप्नातली..
वा राणी सत्यातली..
मी.. स्वप्न पाहणारा..
तू व्याख्या प्रेमाची
वा जाणीव अस्तित्वाची..
मी.. प्रेमात बुडालेला..
शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०१०
...याच कारणे...
एकदा... भेटता विचारले तिने..
"सांग नवे काय माझ्या दिसले, आज तुला?"
सांगितले मी तिला..
"प्रिये, तशी तर रोजच भासतेस तू नवी..
खास असे काय सांगू मी तुला?"
म्हणाली.. "असे उत्तर चालायचे नाही..
नवे काय ते ओळखल्याशिवाय
माझ्याशी बोलायचे नाही.."
मग मात्र मी म्हटलो तिला..
"सखे, तू येताच समजले होते मला..
तू माळलीस मोगरी गजरा..
चाहूल तुझी लागली मज..
जेव्हा नवपैंजण तुझा वाजला.."
ऐकताच सखी मग पुन्हा बिलगली..
पुन्हा एकदा मिठीत शिरली..
काही न बोलता बोलून गेली..
"सख्या, याच कारणे प्रीत तुझ्यावर जडली..."
"सांग नवे काय माझ्या दिसले, आज तुला?"
सांगितले मी तिला..
"प्रिये, तशी तर रोजच भासतेस तू नवी..
खास असे काय सांगू मी तुला?"
म्हणाली.. "असे उत्तर चालायचे नाही..
नवे काय ते ओळखल्याशिवाय
माझ्याशी बोलायचे नाही.."
मग मात्र मी म्हटलो तिला..
"सखे, तू येताच समजले होते मला..
तू माळलीस मोगरी गजरा..
चाहूल तुझी लागली मज..
जेव्हा नवपैंजण तुझा वाजला.."
ऐकताच सखी मग पुन्हा बिलगली..
पुन्हा एकदा मिठीत शिरली..
काही न बोलता बोलून गेली..
"सख्या, याच कारणे प्रीत तुझ्यावर जडली..."
लिहायचो मी..
असेच काहीसे लिहायचो मी..
वर्णन तिचे कधी करायचो मी...
कधी सौंदर्याचे तिच्या...
तर कधी प्रेमावर तिच्या लिहायचो मी..
भेटायची मला जेव्हा ती..
केवळ पहात राहायचो मी..
एकाच तिच्या नजरेने नेहमी..
पुरता घायाळ व्हायचो मी..
आताही लिहितोच आहे..
वर्णन तिचे करतोच आहे...
पण, आता आहे सोबतीस ती माझ्या..
पुर्वी... स्वप्नातच केवळ पहायचो मी..
वर्णन तिचे कधी करायचो मी...
कधी सौंदर्याचे तिच्या...
तर कधी प्रेमावर तिच्या लिहायचो मी..
भेटायची मला जेव्हा ती..
केवळ पहात राहायचो मी..
एकाच तिच्या नजरेने नेहमी..
पुरता घायाळ व्हायचो मी..
आताही लिहितोच आहे..
वर्णन तिचे करतोच आहे...
पण, आता आहे सोबतीस ती माझ्या..
पुर्वी... स्वप्नातच केवळ पहायचो मी..
गुरुवार, २६ ऑगस्ट, २०१०
विचारांचा पाउस...
विचारच करत होतो...
की विचार काय करावा?
अन् विचार करून
त्याचा उपयोग काय करावा?
आणि तेवढ्यात अचानक
एक विचार मनी आला..
विचार.. कधी, कुठे, कसा...
विचार.. करावाच कशाला?
विचारच करायचा तर..
विचारच करायला हवा..
इतक्या सगळ्या प्रश्नाचा
विचार का असावा?
विचाराच्या इतक्या विचाराने
डोक्यात विचारांचा ढग होतो
विचार करत असतानाच अचानक..
आणखी विचारांचा पाउस पडतो...
की विचार काय करावा?
अन् विचार करून
त्याचा उपयोग काय करावा?
आणि तेवढ्यात अचानक
एक विचार मनी आला..
विचार.. कधी, कुठे, कसा...
विचार.. करावाच कशाला?
विचारच करायचा तर..
विचारच करायला हवा..
इतक्या सगळ्या प्रश्नाचा
विचार का असावा?
विचाराच्या इतक्या विचाराने
डोक्यात विचारांचा ढग होतो
विचार करत असतानाच अचानक..
आणखी विचारांचा पाउस पडतो...
रविवार, १५ ऑगस्ट, २०१०
गाव मात्र एकटं झालंय...
रस्त्यावरून दिसणारं एक गाव..
पावसात भिजून चिंब झालंय..
पावसाच्या प्रत्येक थेंबानं..
गावाचं सौंदर्य खुलू लागलंय..
गावात शिरताच दिसून येतं
गावात समस्यांचच रान माजलंय
गावात माणसं असूनसुद्धा
गाव आतून एकटं झालंय..
मागल्या सालिही पडला पाउस..
धरणात भरून वाहिलं खूप
पाणी मात्र नंतर सारं
शहरासाठी वाहून गेलंय..
पाउस गेला उन पडलं..
गावातलं सारं आटून गेलंय
गावात धरण असूनही
गावातलं ढोर तहानेन मेलंय
या सारयचा कंटाळा येऊन..
पोटा-पाण्याचा प्रश्न घेऊन
प्रत्येक पोर आता शहरात गेलंय
गाव मात्र एकटं झालंय...
पावसात भिजून चिंब झालंय..
पावसाच्या प्रत्येक थेंबानं..
गावाचं सौंदर्य खुलू लागलंय..
गावात शिरताच दिसून येतं
गावात समस्यांचच रान माजलंय
गावात माणसं असूनसुद्धा
गाव आतून एकटं झालंय..
मागल्या सालिही पडला पाउस..
धरणात भरून वाहिलं खूप
पाणी मात्र नंतर सारं
शहरासाठी वाहून गेलंय..
पाउस गेला उन पडलं..
गावातलं सारं आटून गेलंय
गावात धरण असूनही
गावातलं ढोर तहानेन मेलंय
या सारयचा कंटाळा येऊन..
पोटा-पाण्याचा प्रश्न घेऊन
प्रत्येक पोर आता शहरात गेलंय
गाव मात्र एकटं झालंय...
मंगळवार, ३ ऑगस्ट, २०१०
तिची तक्रार.. त्याचे उत्तर...
तिची तक्रार..
तू मला साधा फोन करत नाहीस..
माझी तुला कधी आठवणच येत नाही..
आलीच असती..
तर निदान एखादा मेसेज केला असतास...
नव्हताच इतका वेळ..
तर मिस्ड कॉल तरी दिला असतास...
पण यातले काही झालेच नाही..
कारण.. तुला माझी आठवनच येत नाही...
कधी माझा वाढदिवस विसरतोस..
कधी आपण भेटल्याची तारीख..
आपण एकत्र फिरायला गेलो..
ती पहिली जागाही तुझ्या लक्षात नाही..
कारण... तुला माझी आठवण येत नाही..
त्याचे उत्तर...
मेसेज करायला किती वेळ लागतो ग..
पण तो करतानाही कधी कधी
कविता मला सुचत नाही..
आणि साधा एखादा मेसेज करणे..
खरेच बरे वाटत नाही..
साधा मिस्ड कॉल द्यावा म्हटले
तरी.. बरे वाटत नाही..
तुला फक्त मिस करणे..
माझ्या मनाला तरी पटत नाही..
आठवण आली.. कॉल केला
की गप्पा मारत राहतो मी..
माझे सारे काम विसरून..
तुझ्यात गुंतत जातो मी..
म्हणूनच सखे.. आठवण येऊनही..
तसे कधी मी दाखवत नाही..
पण.. असे केल्याने तुझ्यावरचे..
माझे प्रेम कधीच कमी होत नाही..
तू मला साधा फोन करत नाहीस..
माझी तुला कधी आठवणच येत नाही..
आलीच असती..
तर निदान एखादा मेसेज केला असतास...
नव्हताच इतका वेळ..
तर मिस्ड कॉल तरी दिला असतास...
पण यातले काही झालेच नाही..
कारण.. तुला माझी आठवनच येत नाही...
कधी माझा वाढदिवस विसरतोस..
कधी आपण भेटल्याची तारीख..
आपण एकत्र फिरायला गेलो..
ती पहिली जागाही तुझ्या लक्षात नाही..
कारण... तुला माझी आठवण येत नाही..
त्याचे उत्तर...
मेसेज करायला किती वेळ लागतो ग..
पण तो करतानाही कधी कधी
कविता मला सुचत नाही..
आणि साधा एखादा मेसेज करणे..
खरेच बरे वाटत नाही..
साधा मिस्ड कॉल द्यावा म्हटले
तरी.. बरे वाटत नाही..
तुला फक्त मिस करणे..
माझ्या मनाला तरी पटत नाही..
आठवण आली.. कॉल केला
की गप्पा मारत राहतो मी..
माझे सारे काम विसरून..
तुझ्यात गुंतत जातो मी..
म्हणूनच सखे.. आठवण येऊनही..
तसे कधी मी दाखवत नाही..
पण.. असे केल्याने तुझ्यावरचे..
माझे प्रेम कधीच कमी होत नाही..
लेबल:
ती आणि तो... यांचा संवाद
मंगळवार, २७ जुलै, २०१०
पाउस अचानक येतो..
सखी येत असता भेटण्या त्याला..
पाउस अचानक येतो..
सखिला उशीर होतो..
अन् प्रियकर तिजसाठी झुरतो..
पाउस थोडा विसावतो...
सखी भेटण्या प्रियाला निघते..
सखी वाटेवरती असता..
पाउस पुन्हा बरसतो..
सखी भिजते.. तशीच निघते..
प्रियाला भेटण्या पोहोचते..
पाहताना साखिला येताना
प्रियकरही आनंदून जातो...
पाहता भिजलेल्या साखिला
प्रियकर मोहित होतो..
ती मिठीत त्याच्या शिरता
पाउस पुन्हा जोर घेतो..
प्रेमास त्यांच्या फुलवण्या
पाउस.. असाच नेहमी येतो...
लेबल:
निसर्ग...,
प्रेमकविता
मंगळवार, १३ जुलै, २०१०
कवीने जगायचे... वाचकाने.. केवळ पाहायचे..
कवीने लिहायचे असते...
स्वतःच्या अनुभवातून...
वाचकाने वाचायचे ते...
त्याच्याच चश्म्यातून
कधी साकारायचे कवीने..
नवे जग कल्पनेतून..
वाचणार्याने पाहायचे...
त्यात काही काळ राहून..
कवीने म्हणायचे...
वाचकाने ऐकायचे...
कवीने जगायचे...
वाचकाने.. केवळ पाहायचे..
कवीच्या जगात वाचकाने
कायमचे राहायचे नसते...
कारण, कवीला कवीचे...
अन् वाचकाला.. वाचकाचे...
स्वतःचे आयुष्य जगायचे असते...
स्वतःच्या अनुभवातून...
वाचकाने वाचायचे ते...
त्याच्याच चश्म्यातून
कधी साकारायचे कवीने..
नवे जग कल्पनेतून..
वाचणार्याने पाहायचे...
त्यात काही काळ राहून..
कवीने म्हणायचे...
वाचकाने ऐकायचे...
कवीने जगायचे...
वाचकाने.. केवळ पाहायचे..
कवीच्या जगात वाचकाने
कायमचे राहायचे नसते...
कारण, कवीला कवीचे...
अन् वाचकाला.. वाचकाचे...
स्वतःचे आयुष्य जगायचे असते...
लेबल:
कविता... कवितेवरची....
पाउस... असाच येतो...
पाउस... आठवायला लागत नाही..
तो अचानक कोसळतो..
कधी मेघांतून... कधी मनातून..
तो मेघांतून बरसतो...
थेंबांच्या धारा होऊन..
कधी मनातून बरसतो..
आठवणींचा वारा होऊन..
कधी येतो तो लेखणीतून..
शब्दांच्या गारा होऊन..
कधी डोळ्यांतून बरसतो..
सुख-दुःखाच्या आसवांतून...
कधी ओठांतून खुलतो..
निखळ हास्यातून...
पाउस... असाच येतो...
निरनिराळ्या रुपांतून...
तो अचानक कोसळतो..
कधी मेघांतून... कधी मनातून..
तो मेघांतून बरसतो...
थेंबांच्या धारा होऊन..
कधी मनातून बरसतो..
आठवणींचा वारा होऊन..
कधी येतो तो लेखणीतून..
शब्दांच्या गारा होऊन..
कधी डोळ्यांतून बरसतो..
सुख-दुःखाच्या आसवांतून...
कधी ओठांतून खुलतो..
निखळ हास्यातून...
पाउस... असाच येतो...
निरनिराळ्या रुपांतून...
लेबल:
निसर्ग...,
मैत्री / नाती
गोष्ट तिची अन् त्याची....
तीच रोजचीच गोष्ट... तिची अन् त्याची..
तो अन् ती.. जणू राजा अन् राणी..
वेगळी नसेलही कदाचित..
पण.. एक सुंदरशी प्रेमकहाणी...
सुरू होण्याआधीच संपणारी...
संपूनही कधीही न संपणारी..
अधुरिच खरी...
पण मनाला भावणारी..
त्या दोघांची म्हणता म्हणता...
माझी नि तुमची होणारी..
गोष्ट तिची अन् त्याची....
__________________विनायक बेलोसे
तो अन् ती.. जणू राजा अन् राणी..
वेगळी नसेलही कदाचित..
पण.. एक सुंदरशी प्रेमकहाणी...
सुरू होण्याआधीच संपणारी...
संपूनही कधीही न संपणारी..
अधुरिच खरी...
पण मनाला भावणारी..
त्या दोघांची म्हणता म्हणता...
माझी नि तुमची होणारी..
गोष्ट तिची अन् त्याची....
__________________विनायक बेलोसे
लेबल:
प्रेमकविता,
मैत्री / नाती
शुक्रवार, ९ जुलै, २०१०
"संवाद"... तो व्हायला हवाय...
तडा गेला तो गेलाच...
त्या दोघांच्यातल्या विश्वासाला...
कारण.... काहीही असो...
तडा गेला.. हे खरे....
तिचे म्हणणे एकच...
"त्याचे माझ्याकडे लक्षच नाहीए...
मीच नेहमी त्याला समजून घ्यायचे...
ही त्याचीही जाजबदारी नाहीए?"
तो इकडे कामात गुंग...
तिच्यासाठी मोठे व्हायचेय म्हणून...
जमेल तितकं कमवायचंय...
तिला त्रास होऊ नये म्हणून...
त्याला वाटे... "ती केवळ भांडत राहते..
मला समजून घेतच नाही...
कधी मला तिची गरज असते...
केवळ मन हलकं करण्यासाठी...
पण ती काही ऐकतच नाही... "
तीही तिकडे कामात मग्न...
त्याला वेळच नाही म्हणून...
दोघे बरोबर... आपापल्या जागी...
पण एकच गोष्ट दोघांत होत नाही...
"संवाद"... तो व्हायला हवाय...
मग काहीही बिघडत नाही...
त्या दोघांच्यातल्या विश्वासाला...
कारण.... काहीही असो...
तडा गेला.. हे खरे....
तिचे म्हणणे एकच...
"त्याचे माझ्याकडे लक्षच नाहीए...
मीच नेहमी त्याला समजून घ्यायचे...
ही त्याचीही जाजबदारी नाहीए?"
तो इकडे कामात गुंग...
तिच्यासाठी मोठे व्हायचेय म्हणून...
जमेल तितकं कमवायचंय...
तिला त्रास होऊ नये म्हणून...
त्याला वाटे... "ती केवळ भांडत राहते..
मला समजून घेतच नाही...
कधी मला तिची गरज असते...
केवळ मन हलकं करण्यासाठी...
पण ती काही ऐकतच नाही... "
तीही तिकडे कामात मग्न...
त्याला वेळच नाही म्हणून...
दोघे बरोबर... आपापल्या जागी...
पण एकच गोष्ट दोघांत होत नाही...
"संवाद"... तो व्हायला हवाय...
मग काहीही बिघडत नाही...
गुरुवार, ८ जुलै, २०१०
क्षणाचाच मी...
क्षणात हिरवा.. क्षणात पिवळा..
क्षणात होतो मी कधी गहिरा..
क्षणाचाच तो विलंब केवळ..
क्षणात उदास मी.. क्षणात हसरा..
क्षणाक्षणाला बदलत जातो..
क्षणात ऋतूही मागे पडतो...
क्षणात कधी मी इतका बदलतो..
क्षणातच ऋतूला पुन्हा गाठतो...
क्षणच काय तो मजसोबत पळतो..
क्षणाबरोबर मी ही पळतो..
क्षणाचाच मी... क्षणही माझा...
कधी तो क्षणही मजवर जळतो...
क्षणात होतो मी कधी गहिरा..
क्षणाचाच तो विलंब केवळ..
क्षणात उदास मी.. क्षणात हसरा..
क्षणाक्षणाला बदलत जातो..
क्षणात ऋतूही मागे पडतो...
क्षणात कधी मी इतका बदलतो..
क्षणातच ऋतूला पुन्हा गाठतो...
क्षणच काय तो मजसोबत पळतो..
क्षणाबरोबर मी ही पळतो..
क्षणाचाच मी... क्षणही माझा...
कधी तो क्षणही मजवर जळतो...
गुरुवार, १ जुलै, २०१०
गूढ.. अगम्य... केवळ सावली...
निशब्द.. शांतता...
कशाचही आवाज नाही...
आस-पास कोणी ही नाही...
केवळ... निशब्द शांतता..
त्यातून येणारा एक आवाज..
घुंगरांचा... मधुर...
अगदी काळजाला भिडणारा...
त्या निशब्द शांततेला...
मधूनच चिरणारा....
मागून येणारी सावली...
कोण्या अद्न्यात व्यक्तीची...
कोणाची? माहीत नाही...
केवळ सावलीच ती...
भविष्यात होणार्या एखाद्या
अघटीताची तर नाही?
कोण जाणे...
पण.. सावली दिसतीये खरी..
गूढ.. अगम्य... केवळ सावली...
कशाचही आवाज नाही...
आस-पास कोणी ही नाही...
केवळ... निशब्द शांतता..
त्यातून येणारा एक आवाज..
घुंगरांचा... मधुर...
अगदी काळजाला भिडणारा...
त्या निशब्द शांततेला...
मधूनच चिरणारा....
मागून येणारी सावली...
कोण्या अद्न्यात व्यक्तीची...
कोणाची? माहीत नाही...
केवळ सावलीच ती...
भविष्यात होणार्या एखाद्या
अघटीताची तर नाही?
कोण जाणे...
पण.. सावली दिसतीये खरी..
गूढ.. अगम्य... केवळ सावली...
शनिवार, १२ जून, २०१०
पाउस...
पाउस...
कधी आठवणींचा... तर कधी नाविण्याचा...
कधी रिमझिमत्या थेंबांचा,
कधी तिच्या नाजूक स्पर्शांचा...
पाउस...
कधी तिचा... कधी माझा...
कधी आम्हा दोघांचा..
कधी दोघांमधल्या मौनाचा..
तर कधी... ना संपणार्या गप्पांचा...
पाउस...
कधी शांतपणे पडणारा...
कधी धो धो येणारा...
कधी केवळ मृदसुगंध देणारा..
कधी.. अखंडपणे साथ देणारा...
पाउस...
कधी आठवणींचा... तर कधी नाविण्याचा...
कधी रिमझिमत्या थेंबांचा,
कधी तिच्या नाजूक स्पर्शांचा...
पाउस...
कधी तिचा... कधी माझा...
कधी आम्हा दोघांचा..
कधी दोघांमधल्या मौनाचा..
तर कधी... ना संपणार्या गप्पांचा...
पाउस...
कधी शांतपणे पडणारा...
कधी धो धो येणारा...
कधी केवळ मृदसुगंध देणारा..
कधी.. अखंडपणे साथ देणारा...
पाउस...
लेबल:
निसर्ग...,
प्रेमकविता
रविवार, ६ जून, २०१०
प्रेमात तिच्या मी पडलो...
असेच कधी पावसात भिजताना
तिला पाहीले होते...
तिच्या सौंदर्याच्या प्रत्येक अदेवर
मी... माझे मन वाहीले होते...
पाहताच तिला मज पटले होते..
सालसता ती हीच खरी...
तिच्या नसा-नसात भणली होती
जणू, तारुण्याची प्रीत खरी...
नजर मिळविता तिने नजरेशी
घायाळ पुन्हा मी झालो..
मला खरे कळलेच नाही
कधी प्रेमात तिच्या मी पडलो...
तिला पाहीले होते...
तिच्या सौंदर्याच्या प्रत्येक अदेवर
मी... माझे मन वाहीले होते...
पाहताच तिला मज पटले होते..
सालसता ती हीच खरी...
तिच्या नसा-नसात भणली होती
जणू, तारुण्याची प्रीत खरी...
नजर मिळविता तिने नजरेशी
घायाळ पुन्हा मी झालो..
मला खरे कळलेच नाही
कधी प्रेमात तिच्या मी पडलो...
बुधवार, २४ फेब्रुवारी, २०१०
तू.. अन् तुझी निखळ मैत्री..
रोज भेटायचो आम्ही.. अगदी आवर्जून
गर्दी असेल भेटायच्या जागी..
तर हाक मारायचो एकमेकांना... हात उंचावून..
भेटलो की बोलायचो.. माझ्याबद्दल, तिच्याबद्दल..
आणि खूप सार्या विषयांबद्दल...
रंगायच्या आमच्या गप्पा.. भरपूर..
भाणही नसायचे.. वेलेबद्दल..
इतक्या गर्दितही गप्पा मारताना..
आम्ही कोणाच्या मद्ध्यात नसायचो..
आणि कोणी त्रास देऊ गेला..
की त्याला अद्दल घडवायला मागे नसायचो..
अशीच आमची मैत्री होती,
अगदी झार्याप्रमाणे निखळ..
एकमेकांबद्दल विचारही होते.
पाण्याप्रमाणे नितळ.
पण एकदिवस ती म्हणाली..
"मला तुझ्याशी बोलायचे नाही..."
का? म्हणून विचारले तर..
"मला तुला ते सांगायचे नाही.."
खोडून विचारल्यावर कळले..
ती माझ्यात गुंतली होती..
मला थोडा धक्काच बसला.. कारण..
ही गोष्ट माझ्या मनातही नव्हती..
थोडा विचार केल्यावर वाटले..
मलाही ती आवडते..
एखाद्या दिवशी नाही भेटलो तर..
माझे ही खूपकही आडते..
पण असा विचार कराण्याइतके..
नशीब साथीला नव्हतेच कधी..
कारण माने जरी जूळली तरी..
'जोड्या' तर जुळल्या होत्याच आधी...
मग मात्र म्हटले तिला मी -
"ती आहे... नको तू बोलूस...
पण... विसरुही नकोस, कोणी मित्र आहे तुझा..
हाक दे केव्हाही.. जेव्हा मदत लागेल तुला.."
माझ्याही मनात राहशील तू..
अन् तुझी निखळ मैत्री.. तशीच..
वेगळे होऊनही एकटत्रच असु..
विसरणार नाही मी तुला.. कधीच..
गर्दी असेल भेटायच्या जागी..
तर हाक मारायचो एकमेकांना... हात उंचावून..
भेटलो की बोलायचो.. माझ्याबद्दल, तिच्याबद्दल..
आणि खूप सार्या विषयांबद्दल...
रंगायच्या आमच्या गप्पा.. भरपूर..
भाणही नसायचे.. वेलेबद्दल..
इतक्या गर्दितही गप्पा मारताना..
आम्ही कोणाच्या मद्ध्यात नसायचो..
आणि कोणी त्रास देऊ गेला..
की त्याला अद्दल घडवायला मागे नसायचो..
अशीच आमची मैत्री होती,
अगदी झार्याप्रमाणे निखळ..
एकमेकांबद्दल विचारही होते.
पाण्याप्रमाणे नितळ.
पण एकदिवस ती म्हणाली..
"मला तुझ्याशी बोलायचे नाही..."
का? म्हणून विचारले तर..
"मला तुला ते सांगायचे नाही.."
खोडून विचारल्यावर कळले..
ती माझ्यात गुंतली होती..
मला थोडा धक्काच बसला.. कारण..
ही गोष्ट माझ्या मनातही नव्हती..
थोडा विचार केल्यावर वाटले..
मलाही ती आवडते..
एखाद्या दिवशी नाही भेटलो तर..
माझे ही खूपकही आडते..
पण असा विचार कराण्याइतके..
नशीब साथीला नव्हतेच कधी..
कारण माने जरी जूळली तरी..
'जोड्या' तर जुळल्या होत्याच आधी...
मग मात्र म्हटले तिला मी -
"ती आहे... नको तू बोलूस...
पण... विसरुही नकोस, कोणी मित्र आहे तुझा..
हाक दे केव्हाही.. जेव्हा मदत लागेल तुला.."
माझ्याही मनात राहशील तू..
अन् तुझी निखळ मैत्री.. तशीच..
वेगळे होऊनही एकटत्रच असु..
विसरणार नाही मी तुला.. कधीच..
मंगळवार, २३ फेब्रुवारी, २०१०
कविता करताना जेव्हा शब्द सुचत नाहीत तिला...
करिता मी त्यावर कविता एखादी...
म्हणते माझे सारे शब्दही साथ तुला देती..
मज एकटी करून जाती..
का असे ते वागती मजपाशी
प्रयत्न करते मी किती..
त्यांना सजवन्याचे, फुलवण्याचे ..
सोबत त्यांच्या कोण्या एका स्वप्नांच्या गावी जाण्याचे..
तरीही का रे जमत नाही मज..
तुझ्या सारखी कविता..
सांगतो तिला मग
सखे, शब्द केवळ आहेत माझे..
भाव मात्र नेहमी तुझे मग..
का बोल राग तुझा कश्याकरिता?
लेबल:
ती आणि तो... यांचा संवाद
शनिवार, २० फेब्रुवारी, २०१०
सोमवार, १५ फेब्रुवारी, २०१०
ओर्कुटवर झालेली मैत्री
कधी वाढत गेली,
कळलेच नाही त्या दोघांना..
मैत्रीचे प्रेम कधी झाले
समजलेच नाही त्यांना..
प्रेमात पडले होते खरे दोघे..
भेटले मात्र नव्हते कधीच...
आयुष्यभराच्या आणा-भाका मात्र
झाल्या होत्या आधीच...
कधी स्क्रॅप, कधी ईमेल
कधी कॉल करून बोलणे..
एकमेकांना चिडवणे..
एकमेकांसाठी झूरणे...
ऑनलाइन भेट नाही झाली
तर रुसणे तर कधी भाण्डणे..
मग आला दिवस प्रेमाचा...
ठरला बेत भेटिचा..
जागा ठरली... वेळ ठरली..
दोघे अगदी आतुरतेने भेटले...
इतके दिवस प्रेमात असूनही..
आज खरे मिलन झाले..
इतके सारे होऊनसूद्धा
काहीतरी वेगळे होते..
भेटीत दोघांच्या गप्पा सोडून
बाकी सारे जमले होते..
एकमेकांना समोर पाहून
आनंद गगनात मावत नव्हता...
पण... नेमके काय बोलावे
याला विषयच मिळत नव्हता..
एकमेकांची चौकशी झाली
पुढे काहीच होत नव्हते..
एकमेकांना पाहून हसण्याखेरीज...
दोघांना काहीच जमत नव्हते...
दुसर्या दिवशी पुन्हा
दोघे ऑनलाइन भेटले...
एकमेकांची माफी मागून
पुन्हा गप्पांमध्ये गुंतले..
---------------------------------
थोडक्यात काय...
माने आलियेत जवळ...
साधने झालीयेत अफाट...
सभाषणाला मिळालाय वेगसुद्धा सुसाट..
पण इतके सारे होऊनही...
एक मात्र कमी आहे..
प्रत्यक्षात भेटनार्या माणसातले...
अंतर मात्र वाढत आहे...
कधी वाढत गेली,
कळलेच नाही त्या दोघांना..
मैत्रीचे प्रेम कधी झाले
समजलेच नाही त्यांना..
प्रेमात पडले होते खरे दोघे..
भेटले मात्र नव्हते कधीच...
आयुष्यभराच्या आणा-भाका मात्र
झाल्या होत्या आधीच...
कधी स्क्रॅप, कधी ईमेल
कधी कॉल करून बोलणे..
एकमेकांना चिडवणे..
एकमेकांसाठी झूरणे...
ऑनलाइन भेट नाही झाली
तर रुसणे तर कधी भाण्डणे..
मग आला दिवस प्रेमाचा...
ठरला बेत भेटिचा..
जागा ठरली... वेळ ठरली..
दोघे अगदी आतुरतेने भेटले...
इतके दिवस प्रेमात असूनही..
आज खरे मिलन झाले..
इतके सारे होऊनसूद्धा
काहीतरी वेगळे होते..
भेटीत दोघांच्या गप्पा सोडून
बाकी सारे जमले होते..
एकमेकांना समोर पाहून
आनंद गगनात मावत नव्हता...
पण... नेमके काय बोलावे
याला विषयच मिळत नव्हता..
एकमेकांची चौकशी झाली
पुढे काहीच होत नव्हते..
एकमेकांना पाहून हसण्याखेरीज...
दोघांना काहीच जमत नव्हते...
दुसर्या दिवशी पुन्हा
दोघे ऑनलाइन भेटले...
एकमेकांची माफी मागून
पुन्हा गप्पांमध्ये गुंतले..
---------------------------------
थोडक्यात काय...
माने आलियेत जवळ...
साधने झालीयेत अफाट...
सभाषणाला मिळालाय वेगसुद्धा सुसाट..
पण इतके सारे होऊनही...
एक मात्र कमी आहे..
प्रत्यक्षात भेटनार्या माणसातले...
अंतर मात्र वाढत आहे...
लेबल:
प्रेमकविता,
मैत्री / नाती,
सामाजिक
उद्देश... माझा.. जीवनाचा..
उद्देश... माझा.. जीवनाचा..
असा विचार केल्याला खूप काळ लोटलाय.
पण जेव्हा जेव्हा विचार केला..
तेव्हा तेव्हा त्यातून वेगवेगळा निष्कर्ष निघाला..
कधी वाटले आपल्याला देवाने पाठवलाय.. मस्तपणे हुन्दडायला...
कधी वाटले.. छे मी तर आलोय इथे काही साध्य करायला..
काहीतरी खास.. जसे देवाने पाठवले अर्जुनाला..
त्या शिवरायला.. त्या शंभुराजाला...
त्या शाहूला.. फुले आंबेडकरांना..
पण कधी कधी मी विचार करतो..
नक्की काय बरे हवे असेल देवाला..
माझ्याकडून? खरेच कोणी सांगेल मला?
माझे धेय काय? कोणी दाखवेल का वाट ??
पण मग.. अचानक वाटते..
कोण कशाला देवच सांगेल.. कसे?
त्याला जे हवे आहे ते समोर आनेल आणि काहीतरी इशारा करेल..
बस्स.. तो इशारा समजायला हवा..
बाकी सगळे होईलच.. आपोआप...
असा विचार केल्याला खूप काळ लोटलाय.
पण जेव्हा जेव्हा विचार केला..
तेव्हा तेव्हा त्यातून वेगवेगळा निष्कर्ष निघाला..
कधी वाटले आपल्याला देवाने पाठवलाय.. मस्तपणे हुन्दडायला...
कधी वाटले.. छे मी तर आलोय इथे काही साध्य करायला..
काहीतरी खास.. जसे देवाने पाठवले अर्जुनाला..
त्या शिवरायला.. त्या शंभुराजाला...
त्या शाहूला.. फुले आंबेडकरांना..
पण कधी कधी मी विचार करतो..
नक्की काय बरे हवे असेल देवाला..
माझ्याकडून? खरेच कोणी सांगेल मला?
माझे धेय काय? कोणी दाखवेल का वाट ??
पण मग.. अचानक वाटते..
कोण कशाला देवच सांगेल.. कसे?
त्याला जे हवे आहे ते समोर आनेल आणि काहीतरी इशारा करेल..
बस्स.. तो इशारा समजायला हवा..
बाकी सगळे होईलच.. आपोआप...
लेबल:
संवाद... स्वतःशीच...
रविवार, १४ फेब्रुवारी, २०१०
विचार... चौकटीच्या बाहेरचा..
कधी केलाय विचार?
चौकटीच्या बाहेरचा..
कधी पहिलाय अंधार?
नजरेच्या पलीकडचा...
कसा कोणास ठाऊक..
पण मला तो अंधार दिसला..
आणि पडला प्रश्न..
या सुवर्ण काळाच्या जगात तो काळा कोपरा .. कसला??
नीट पहिले तेव्हा दिसले..
जाणवले..
ही तर वेगळीच दुनिया..
आपल्याच दुनियेतली..
आपली भूक वरवर्चीच..
इथली भूक 'आतली'
आपल्या जगातून येणार्या
दयेच्या किरणांवर हे जगतात..
ज्या ते ही नाही मिळत..
ते त्या अंधारातच मरतात...
चौकटीच्या बाहेरचा..
कधी पहिलाय अंधार?
नजरेच्या पलीकडचा...
कसा कोणास ठाऊक..
पण मला तो अंधार दिसला..
आणि पडला प्रश्न..
या सुवर्ण काळाच्या जगात तो काळा कोपरा .. कसला??
नीट पहिले तेव्हा दिसले..
जाणवले..
ही तर वेगळीच दुनिया..
आपल्याच दुनियेतली..
आपली भूक वरवर्चीच..
इथली भूक 'आतली'
आपल्या जगातून येणार्या
दयेच्या किरणांवर हे जगतात..
ज्या ते ही नाही मिळत..
ते त्या अंधारातच मरतात...
काही ना काही घडल्यावर..
वार्याची एक झुळुक..
घामाने थबथबल्यावर..
पारावरची सावळी..
उन्हात फिरून आल्यावर..
थंडगार पाण्याचा एक घोट..
खूप घसा सुकल्यावर..
परिजातकाचा सडा...
ती अचानक दिसल्यावर..
अश्या सगळ्याच छोट्या गोष्टी..
मोठ्या होतात..
काही ना काही घडल्यावर..
अशयाच छोट्या गोष्टी शेवटी
मोठा आनंद देऊन जातात..
इतका की विशाहूनही कडू आठवणी
क्षणात विरून जातात..
घामाने थबथबल्यावर..
पारावरची सावळी..
उन्हात फिरून आल्यावर..
थंडगार पाण्याचा एक घोट..
खूप घसा सुकल्यावर..
परिजातकाचा सडा...
ती अचानक दिसल्यावर..
अश्या सगळ्याच छोट्या गोष्टी..
मोठ्या होतात..
काही ना काही घडल्यावर..
अशयाच छोट्या गोष्टी शेवटी
मोठा आनंद देऊन जातात..
इतका की विशाहूनही कडू आठवणी
क्षणात विरून जातात..
कंटाळा येतो ना..
कंटाळा येतो ना.. मला..
तेव्हा मी कविता लिहितो...
चार.. ओळींची.. नाही म्हणजे तसे मी ठरवतो..
की लिहुयात काहीतरी लांबलचक.. वेळ जाईल निघून..
मग मी लिहु लागल्यावर हलू हलू माझा उत्साह संपत संपत कविता ही संपते..
आणि मग ती राहते.. फक्त चार.. ओळींची नव्हे..
शब्दांची..
मग उगीच तिला शेपटी लावतमी तिला लांब करत नेण्याचा प्रयत्न करतो..
हनुमानाच्या शेपटीएवढी कविता लिहीण्याचा संकल्प..
त्याच शेपटी ला कापड गुंडालणार्यांच्या उठशाहासारखा कमी होतो..
आणि मी अर्ध्यातच शेपटी पेटवून देतो..
काय?
शेपटी पेटवतो? कोण?
मी.. कविता सम्पवतो..
आणि मग मला कळते.. की शेपूट कुठली..
वेळ जावा म्हणून नकळतच मी थंडीत.. (म्हणजे ए सी च्या)
शेकोटी मिळावी म्हणून कविताच पेटवून दिलेली असते..
त्या कागदाची राख गोळा करायची ही इच्छा नसते..
मग मी त्या राखेवरच दुसरी कविता लिहीत लिहीत..
कधीतरी झोपी जातो..
तेव्हा मी कविता लिहितो...
चार.. ओळींची.. नाही म्हणजे तसे मी ठरवतो..
की लिहुयात काहीतरी लांबलचक.. वेळ जाईल निघून..
मग मी लिहु लागल्यावर हलू हलू माझा उत्साह संपत संपत कविता ही संपते..
आणि मग ती राहते.. फक्त चार.. ओळींची नव्हे..
शब्दांची..
मग उगीच तिला शेपटी लावतमी तिला लांब करत नेण्याचा प्रयत्न करतो..
हनुमानाच्या शेपटीएवढी कविता लिहीण्याचा संकल्प..
त्याच शेपटी ला कापड गुंडालणार्यांच्या उठशाहासारखा कमी होतो..
आणि मी अर्ध्यातच शेपटी पेटवून देतो..
काय?
शेपटी पेटवतो? कोण?
मी.. कविता सम्पवतो..
आणि मग मला कळते.. की शेपूट कुठली..
वेळ जावा म्हणून नकळतच मी थंडीत.. (म्हणजे ए सी च्या)
शेकोटी मिळावी म्हणून कविताच पेटवून दिलेली असते..
त्या कागदाची राख गोळा करायची ही इच्छा नसते..
मग मी त्या राखेवरच दुसरी कविता लिहीत लिहीत..
कधीतरी झोपी जातो..
लेबल:
कविता... कवितेवरची....
कविता मी आणतो..
कविता मी आणतो.. त्या गावाहून..
जिथे सापडतो स्वप्नसडा... रोज रातीला..
भेटतो जिथे रवि.. किरणांना...
अन् चंद्र चांदन्यांना..
भेटती जिथे भाव मनीचे सारे...
जणू आकाशातील तारे..
नसे जिथे कल्पनेस बंध..
दर वळतो जिथे रातरानी सुगंध..
परतत असता भेटती शब्द
म्हणती येतो सोबतीला...
जाती देऊन जाता जाता..
अर्थ माझ्या कवितेला..
जिथे सापडतो स्वप्नसडा... रोज रातीला..
भेटतो जिथे रवि.. किरणांना...
अन् चंद्र चांदन्यांना..
भेटती जिथे भाव मनीचे सारे...
जणू आकाशातील तारे..
नसे जिथे कल्पनेस बंध..
दर वळतो जिथे रातरानी सुगंध..
परतत असता भेटती शब्द
म्हणती येतो सोबतीला...
जाती देऊन जाता जाता..
अर्थ माझ्या कवितेला..
लेबल:
कविता... कवितेवरची....
चंद्र गेला तरी कुठे?
एके रात्री ती सोबत असताना..
वाटले... तिला डोर कुठे न्यावे..
मस्त चांदण्यात फिरवून आणावे..
दाखवावा चंद्र नि म्हणावे..
"प्रिये, पहा... तो चंद्रसुद्धा तुझ्यासाठीच झुरतो जणू...
त्याचे झुरनेच हे सारी रात्र
चंदेरी करून जातेय..."
पण, चंद्र काही दिसत नव्हता...
चांदणे तर अगदी लख्ख...
मग, चंद्र गेला तरी कुठे?
चंद्राची वाट पहात
हळूहळू पहात झाली.. उजाडू लागले...
झोप मोडली नि समोर चंद्र दिसला...
विचारले त्याला..
"काय रे होतास कुठे?"
तो म्हटला... "अरे.. असं काय करतोस..?
तुझ्याच सोबत तर होतो रात्रभर..
अगदी तुझ्या शेजारी...
तुझ्या सखीच्या चेहर्यावरचे तेज बनून... "
वाटले... तिला डोर कुठे न्यावे..
मस्त चांदण्यात फिरवून आणावे..
दाखवावा चंद्र नि म्हणावे..
"प्रिये, पहा... तो चंद्रसुद्धा तुझ्यासाठीच झुरतो जणू...
त्याचे झुरनेच हे सारी रात्र
चंदेरी करून जातेय..."
पण, चंद्र काही दिसत नव्हता...
चांदणे तर अगदी लख्ख...
मग, चंद्र गेला तरी कुठे?
चंद्राची वाट पहात
हळूहळू पहात झाली.. उजाडू लागले...
झोप मोडली नि समोर चंद्र दिसला...
विचारले त्याला..
"काय रे होतास कुठे?"
तो म्हटला... "अरे.. असं काय करतोस..?
तुझ्याच सोबत तर होतो रात्रभर..
अगदी तुझ्या शेजारी...
तुझ्या सखीच्या चेहर्यावरचे तेज बनून... "
शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०१०
आणि पुन्हा कामाला लागतो..
कधी चांदण्या पहिल्यात....
आकाशभर पसरलेल्या..
काही लुकलुकतात.. काही हालतात..
काही फेर धरून नाचू लागतात
आणि नक्षत्र होऊन बसतात..
काही आकाशातुन खालीही पडतात..
अश्या शांदण्या पाहता पाहता
कधीतरी हळूच झोप लागते..
त्यातलीच एखादी चांदणी मग
स्वप्नविश्वात घेऊन जाते..
अगदी अनोळखी, अनोलख्या
अश्या काही ठिकाणांची सैर करवते...
म्हणे आपलेच काही लोक देवाघरि जाउन चांदणी होऊन बसतात..
त्यातली काही मंडळींची भेट ही एक चांदणी घडवून देते..
आणि मग रंगतात गप्पा...
'दूरच्या' आपल्यांशी...
अगदी खूप खूप आठवणी,
गप्पा आणि गाणी..
काही वेळाने डोळ्यासमोर एक पडता येऊ लागतो..
अंधाराचा.. छे उजेडाचा..
कारण तोवर सकाळ झालेली असते..
आणि सुर्यनारायण आपला किरणांचा रथ घेऊन
दिवसाच्या सफरीवर निघालेला असतो..
बस्स.. मग आपण त्या चांदणी सोबतच्या सहलीची मजा घेऊन
ताजे होऊन पुन्हा दिवसाची सुरूवात करतो..
कोणीतरी म्हणते आज काहीतरी खास वाटतं..
आपण उगीचच हसतो.. आणि पुन्हा कामाला लागतो..
आकाशभर पसरलेल्या..
काही लुकलुकतात.. काही हालतात..
काही फेर धरून नाचू लागतात
आणि नक्षत्र होऊन बसतात..
काही आकाशातुन खालीही पडतात..
अश्या शांदण्या पाहता पाहता
कधीतरी हळूच झोप लागते..
त्यातलीच एखादी चांदणी मग
स्वप्नविश्वात घेऊन जाते..
अगदी अनोळखी, अनोलख्या
अश्या काही ठिकाणांची सैर करवते...
म्हणे आपलेच काही लोक देवाघरि जाउन चांदणी होऊन बसतात..
त्यातली काही मंडळींची भेट ही एक चांदणी घडवून देते..
आणि मग रंगतात गप्पा...
'दूरच्या' आपल्यांशी...
अगदी खूप खूप आठवणी,
गप्पा आणि गाणी..
काही वेळाने डोळ्यासमोर एक पडता येऊ लागतो..
अंधाराचा.. छे उजेडाचा..
कारण तोवर सकाळ झालेली असते..
आणि सुर्यनारायण आपला किरणांचा रथ घेऊन
दिवसाच्या सफरीवर निघालेला असतो..
बस्स.. मग आपण त्या चांदणी सोबतच्या सहलीची मजा घेऊन
ताजे होऊन पुन्हा दिवसाची सुरूवात करतो..
कोणीतरी म्हणते आज काहीतरी खास वाटतं..
आपण उगीचच हसतो.. आणि पुन्हा कामाला लागतो..
जगावं ... कुणासारखं?
कधी वाटतं जगावं... पक्ष्यांसारखं
पंख पसरून फिरावं स्वछन्दि
राज्य करावं आकाशावर
कुठंही विचरण्यास नसावी बंदी
कधी वाटतं जगावं... माश्यासारखं
खोल खोल पोहत जावं
सागराच्या तळाशी राहावं
आणखी खोल जाताना, अडवणारं कोणी नसावं
कधी वाटतं जगावं... चंद्रासारख
रोज रात्री यावं
कधी मोठं व्हावं, कधी गायब व्हावं
कवींच्या कल्पनेत सतत रहावं
कधी वाटतं जगावं... सूर्यासारखं
सार्या जगास प्रकाश द्यावा
दिसामाजी आराम करावा
रोज सार्यांचा नमस्कार घ्यावा
कधी वाटतं जगावं... राजासारखं
आपल्याच धुंदीत राहून
प्रजेला ताब्यात ठेवून
वाटेल तसं राज्य करून
सार्या जीवनाचा घ्यावा आनंद
कधी वाटतं जगावं... योग्यासारखं
काही नसून असल्यासारखं
सारं असून नसल्यासारखन
भिकारी असूनही... राजासारखं
शेवटी वाटतं जगावं... आपल्याचसारखं
शरीर इथे.. अं मन कुठे
आपण आले राहून सुद्धा
जाउ शकतो पाहिजे तिथे..
पंख पसरून फिरावं स्वछन्दि
राज्य करावं आकाशावर
कुठंही विचरण्यास नसावी बंदी
कधी वाटतं जगावं... माश्यासारखं
खोल खोल पोहत जावं
सागराच्या तळाशी राहावं
आणखी खोल जाताना, अडवणारं कोणी नसावं
कधी वाटतं जगावं... चंद्रासारख
रोज रात्री यावं
कधी मोठं व्हावं, कधी गायब व्हावं
कवींच्या कल्पनेत सतत रहावं
कधी वाटतं जगावं... सूर्यासारखं
सार्या जगास प्रकाश द्यावा
दिसामाजी आराम करावा
रोज सार्यांचा नमस्कार घ्यावा
कधी वाटतं जगावं... राजासारखं
आपल्याच धुंदीत राहून
प्रजेला ताब्यात ठेवून
वाटेल तसं राज्य करून
सार्या जीवनाचा घ्यावा आनंद
कधी वाटतं जगावं... योग्यासारखं
काही नसून असल्यासारखं
सारं असून नसल्यासारखन
भिकारी असूनही... राजासारखं
शेवटी वाटतं जगावं... आपल्याचसारखं
शरीर इथे.. अं मन कुठे
आपण आले राहून सुद्धा
जाउ शकतो पाहिजे तिथे..
संकल्प...
आत्तापर्यंत वागलो तसं...
पुन्हा कधीही वागायचं नाही..
आत्तापर्यंत जगलो तसं...
पुढचं आयुष्य जगायचं नाही..
फक्त पुढेच चालत जायचं..
मागे वळून पाहायचं नाही...
नव्या शिखरांवर आरूढ व्हायचं
एकाच ठिकाणी रमायचं नाही..
नवी स्वप्ने नवा ध्यास...
रोज गाठायचं नवं आकाश..
उंच हवेतला मोकळा श्वास
धरतीकडे पाहताना ठिपक्याचा भास..
इतकं उंच उडत असताना
एक मात्र विसरायचं नाही...
कितीही यश मिळालं तरी..
माणूसपण सोडायचं नाही...
पुन्हा कधीही वागायचं नाही..
आत्तापर्यंत जगलो तसं...
पुढचं आयुष्य जगायचं नाही..
फक्त पुढेच चालत जायचं..
मागे वळून पाहायचं नाही...
नव्या शिखरांवर आरूढ व्हायचं
एकाच ठिकाणी रमायचं नाही..
नवी स्वप्ने नवा ध्यास...
रोज गाठायचं नवं आकाश..
उंच हवेतला मोकळा श्वास
धरतीकडे पाहताना ठिपक्याचा भास..
इतकं उंच उडत असताना
एक मात्र विसरायचं नाही...
कितीही यश मिळालं तरी..
माणूसपण सोडायचं नाही...
लेबल:
संवाद... स्वतःशीच...,
सामाजिक
स्वप्न ... मनातल्या साठवणींचे....
असाच एकांती बसलो होतो..
थोडासा विचार करत...
कसला?? ठाऊक नाही...
पण विचार करत होतो खरा...
आणि अचानक एक वार्याची झुळुक आली..
झुलुकेसोबत सुगंध आला..
भिजल्या मातीचा.. मंद सुगंध...
आणि डोळ्यासमोरचे दृष्य बघता बघता पालटले..
अचानक ढग भरून आले..
अचानक नभ काळे झाले..
त्यातून वीजा कडाडू लागल्या...
अन् पाण्याच्या धारा कोसलल्या..
अश्या.. जणू सारी धरतीच त्यांनी व्यापून टाकिली..
आणि तितक्यात अचानक कुठून तरी एक मोठी नदी वाहत आली..
अगदी माझ्या जवळ... जवळ..
आणि मी ही वाहू लागलो त्या जलधारांमध्ये..
अगदी दूर दूर जाउन पोहोचलो.. समुद्रापर्यंत..
आणि अचानक कोणी हाक मारीली.. काय रे.. असा एकटाच का बसलायेस??
तेव्हा आलो भानावर.. आणि समजले...
तो पाउस.. ती नदी.. तो समुद्र.. सारे सारे विश्व.. आठवणींचे होते..
ते सारे स्वप्न माझ्या मनातल्या साठवणींचे होते..
थोडासा विचार करत...
कसला?? ठाऊक नाही...
पण विचार करत होतो खरा...
आणि अचानक एक वार्याची झुळुक आली..
झुलुकेसोबत सुगंध आला..
भिजल्या मातीचा.. मंद सुगंध...
आणि डोळ्यासमोरचे दृष्य बघता बघता पालटले..
अचानक ढग भरून आले..
अचानक नभ काळे झाले..
त्यातून वीजा कडाडू लागल्या...
अन् पाण्याच्या धारा कोसलल्या..
अश्या.. जणू सारी धरतीच त्यांनी व्यापून टाकिली..
आणि तितक्यात अचानक कुठून तरी एक मोठी नदी वाहत आली..
अगदी माझ्या जवळ... जवळ..
आणि मी ही वाहू लागलो त्या जलधारांमध्ये..
अगदी दूर दूर जाउन पोहोचलो.. समुद्रापर्यंत..
आणि अचानक कोणी हाक मारीली.. काय रे.. असा एकटाच का बसलायेस??
तेव्हा आलो भानावर.. आणि समजले...
तो पाउस.. ती नदी.. तो समुद्र.. सारे सारे विश्व.. आठवणींचे होते..
ते सारे स्वप्न माझ्या मनातल्या साठवणींचे होते..
लेबल:
संवाद... स्वतःशीच...
आयुष्यात माझ्या परत ये...
एक सांगू?
तू जरी नाही बोललिस ना...
तरी डोळे मात्र बोलतात तुझे..
ओठी तुझ्या काहीही असलं..
तरी मनात मात्र विचार माझे..
कळतंच नाहीए मला..
तू अशी का वागतियेस..
काहीच कारण नसताना..
स्वतःलाच का त्रास देतियेस?
सारी दुनिया झूठ असेल..
तुझं प्रेम झूठ नाही..
माझ्याशिवाय तुझ्या मनात..
कोणी असणं शक्यच नाही..
मनातली गोष्ट करायला
दुनियेची भीती हवीच कशाला?
दुनियेलाच जर गरज नसेल..
तर आपल्याला त्यांची गरज कशाला?
पुन्हा पुन्हा विनवतोय मी
आयुष्यात माझ्या परत ये...
पूर्वीचं सारं विसरून जा..
आणि माझ्या कवेत ये...
(एक जुनी कविता... ती त्याला सोडून गेलेली असताना त्याने तिची केलेली विनवणी.. )
तू जरी नाही बोललिस ना...
तरी डोळे मात्र बोलतात तुझे..
ओठी तुझ्या काहीही असलं..
तरी मनात मात्र विचार माझे..
कळतंच नाहीए मला..
तू अशी का वागतियेस..
काहीच कारण नसताना..
स्वतःलाच का त्रास देतियेस?
सारी दुनिया झूठ असेल..
तुझं प्रेम झूठ नाही..
माझ्याशिवाय तुझ्या मनात..
कोणी असणं शक्यच नाही..
मनातली गोष्ट करायला
दुनियेची भीती हवीच कशाला?
दुनियेलाच जर गरज नसेल..
तर आपल्याला त्यांची गरज कशाला?
पुन्हा पुन्हा विनवतोय मी
आयुष्यात माझ्या परत ये...
पूर्वीचं सारं विसरून जा..
आणि माझ्या कवेत ये...
(एक जुनी कविता... ती त्याला सोडून गेलेली असताना त्याने तिची केलेली विनवणी.. )
मी.... केवळ.. निमित्तमात्र...
शब्दांना व्यक्त व्हायचं असतं...
कुठंतरी... कुणाच्या तरी निमित्ताने...
मग ते निघतात...
अश्याच कोण्या निमित्ताच्या शोधात..
खूप शोध घेतात सारे मिळून..
आणि खूप विचारही करतात...
व्यक्त होण्याआधी...
कारण, व्यक्त होताना
जर त्यांच्या मनीचा खरा अर्थ...
व्यक्त करणार्यालाच समजला नाही.. तर?
म्हणून मग आधी ते
एक सफर करून येतात..
आणि मग कोण्या एकाला निवडतात...
निमित्त म्हणून...
असेच काहीसे शब्द मला शोधत येतात...
मग अगदी त्यांना हवे तसे व्यक्त होतात..
कवितेतून... चारोळीतून...
किंवा आणखी वेगळ्या रूपातून...
तेव्हा... जादू आहे ती या शब्दांची...
मी.... केवळ.. निमित्तमात्र...
कुठंतरी... कुणाच्या तरी निमित्ताने...
मग ते निघतात...
अश्याच कोण्या निमित्ताच्या शोधात..
खूप शोध घेतात सारे मिळून..
आणि खूप विचारही करतात...
व्यक्त होण्याआधी...
कारण, व्यक्त होताना
जर त्यांच्या मनीचा खरा अर्थ...
व्यक्त करणार्यालाच समजला नाही.. तर?
म्हणून मग आधी ते
एक सफर करून येतात..
आणि मग कोण्या एकाला निवडतात...
निमित्त म्हणून...
असेच काहीसे शब्द मला शोधत येतात...
मग अगदी त्यांना हवे तसे व्यक्त होतात..
कवितेतून... चारोळीतून...
किंवा आणखी वेगळ्या रूपातून...
तेव्हा... जादू आहे ती या शब्दांची...
मी.... केवळ.. निमित्तमात्र...
लेबल:
कविता... कवितेवरची....
अश्याच काहीश्या प्रयत्नांनी..
सुरुवातीला होते अडचण..
शब्दरचना करताना...
खूप कष्ट घ्यावे लागतात
शब्दांचे यमक जुळवताना...
कधी कधी जमते सारे..
कधी फजितिही होते...
अश्याच काहीश्या प्रयत्नांनी..
मग कविता लिहीणे जमू लागते..
शब्दांनाही जाणवते मग
आपल्या मनी भाव आहे...
कधी आज कधी उद्या..
तर कधी.. आठवणींचा गाव आहे..
शब्दच मग येऊ लागतात
सदैव आपल्या मदतीला...
पाहता पाहता सजवून जातात
आपल्या मनीच्या कवितेला...
शब्दरचना करताना...
खूप कष्ट घ्यावे लागतात
शब्दांचे यमक जुळवताना...
कधी कधी जमते सारे..
कधी फजितिही होते...
अश्याच काहीश्या प्रयत्नांनी..
मग कविता लिहीणे जमू लागते..
शब्दांनाही जाणवते मग
आपल्या मनी भाव आहे...
कधी आज कधी उद्या..
तर कधी.. आठवणींचा गाव आहे..
शब्दच मग येऊ लागतात
सदैव आपल्या मदतीला...
पाहता पाहता सजवून जातात
आपल्या मनीच्या कवितेला...
लेबल:
कविता... कवितेवरची....
गुरुवार, ११ फेब्रुवारी, २०१०
सगळ्यांनी प्रयत्न केल्याबिगर...
आली निवडणूक पुन्ह्यांदा...
आणखी एक सुट्टी मिळणार हाय...
माझ्या लेकरा-बाळाला घेऊन
मी सहलीला जाणार हाय...
उभ्या असलेल्या उमेदवारांमधी..
कोणीच निवडायच्या लायकीचा न्हाय
आणि म्हणूनच मला यावेळी बी..
मतदानाला जायचं न्हाय...
असाच विचार करून
निम्म मतदानबी होणार न्हाय
अन्.. शंभरातल्या ७० ला नको असूनबी...
एक उमेदवार निवडून येणार हाय...
एक एक मत विकत घ्यायला
त्यानं बक्कळ पैसा खर्च केलेला हाय..
आणि म्हणूनच तो बिनपैशाची
कोणाचीच कामं करणार न्हाय...
म्हणून सांगतो मंडळी..
मतदान करणं गरजेचं हाय..
कारण, सगळ्यांनी प्रयत्न केल्याबिगर...
"INDIA"चा भारत होणार न्हाय...
आणखी एक सुट्टी मिळणार हाय...
माझ्या लेकरा-बाळाला घेऊन
मी सहलीला जाणार हाय...
उभ्या असलेल्या उमेदवारांमधी..
कोणीच निवडायच्या लायकीचा न्हाय
आणि म्हणूनच मला यावेळी बी..
मतदानाला जायचं न्हाय...
असाच विचार करून
निम्म मतदानबी होणार न्हाय
अन्.. शंभरातल्या ७० ला नको असूनबी...
एक उमेदवार निवडून येणार हाय...
एक एक मत विकत घ्यायला
त्यानं बक्कळ पैसा खर्च केलेला हाय..
आणि म्हणूनच तो बिनपैशाची
कोणाचीच कामं करणार न्हाय...
म्हणून सांगतो मंडळी..
मतदान करणं गरजेचं हाय..
कारण, सगळ्यांनी प्रयत्न केल्याबिगर...
"INDIA"चा भारत होणार न्हाय...
हे.. असेच चालायचे..
शब्दाला शब्द जोडायचा...
अन् एखादी सुंदर कविता करायची..
माझ्या मनात काही असायचे..
समोरच्यानं मात्र भलतीच समजायची...
मी म्हणायचं...
'ती आली... भेटली...
अन् माझ्या मिठीत शिरली.. '
माझा विचार इथेच थांबायचा...
ऐकनार्याचा मात्र..
नेमका इथेच सुरू व्हायचा...
म्हणूनच वाटते कधी
कविता करायलाच नको..
मी काही लिहायला नको
आणि कोणी काही समजायला नको..
पण तेवढ्यात 'तिने' म्हणायचं...
"कर ना एखादी छानशी कविता..."
अन् मी पुन्हा सुरू व्हायचे ...
लिहायला लागायचे...
हे.. असेच चालायचे...
अन् एखादी सुंदर कविता करायची..
माझ्या मनात काही असायचे..
समोरच्यानं मात्र भलतीच समजायची...
मी म्हणायचं...
'ती आली... भेटली...
अन् माझ्या मिठीत शिरली.. '
माझा विचार इथेच थांबायचा...
ऐकनार्याचा मात्र..
नेमका इथेच सुरू व्हायचा...
म्हणूनच वाटते कधी
कविता करायलाच नको..
मी काही लिहायला नको
आणि कोणी काही समजायला नको..
पण तेवढ्यात 'तिने' म्हणायचं...
"कर ना एखादी छानशी कविता..."
अन् मी पुन्हा सुरू व्हायचे ...
लिहायला लागायचे...
हे.. असेच चालायचे...
लेबल:
कविता... कवितेवरची....
गुरुवार, ४ फेब्रुवारी, २०१०
पण... राया आधी...
काल बाजारी नजर भिडवूनि
केला तुम्ही मला इशारा
मनात भरता वचन दिले मी..
देईन तुम्हा मी ताबा सारा...
आज पौर्णिमा वचनपुर्तीची
घ्या तुमचा लवाजमा
पण... राया आधी... दार जरा लावून घ्या...
विसरूनी जाल भान तुम्ही
पाहुनिया एकदा..
डेरेदार घट, नाजूक काया
काळ्याभोर केशलता
खजिना आहे किमती माझा...
जपून थोडा लुटा..
पण.. राया आधी.. दार जरा लावून घ्या...
केला तुम्ही मला इशारा
मनात भरता वचन दिले मी..
देईन तुम्हा मी ताबा सारा...
आज पौर्णिमा वचनपुर्तीची
घ्या तुमचा लवाजमा
पण... राया आधी... दार जरा लावून घ्या...
विसरूनी जाल भान तुम्ही
पाहुनिया एकदा..
डेरेदार घट, नाजूक काया
काळ्याभोर केशलता
खजिना आहे किमती माझा...
जपून थोडा लुटा..
पण.. राया आधी.. दार जरा लावून घ्या...
बुधवार, ३ फेब्रुवारी, २०१०
तिच्याच रूपाने....
तिच्या ओठांचा गोडवा असा..
की मधुही मज कटू वाटे...
तिच्या हास्याची खळखळ...
जणू अम्बरि घन साचे...
थेंब गालावरूनी जेव्हा
जातो तिच्या ओघळतो..
त्याच्या नशिबाला पाहून..
जीव माझा जळतो...
तिच्या सौंदर्याच्या कडा
अप्सरेलाही लाजविति...
पावलेही नाजूक अशी
स्पर्शाने मेघात वीज नाचविती...
पाउस येतो जेव्हा, वाटे .
सौंदर्यच जणू बरसे तिचे...
तिच्याच रूपाने जणू
खुलते रूप या धरतीचे...
की मधुही मज कटू वाटे...
तिच्या हास्याची खळखळ...
जणू अम्बरि घन साचे...
थेंब गालावरूनी जेव्हा
जातो तिच्या ओघळतो..
त्याच्या नशिबाला पाहून..
जीव माझा जळतो...
तिच्या सौंदर्याच्या कडा
अप्सरेलाही लाजविति...
पावलेही नाजूक अशी
स्पर्शाने मेघात वीज नाचविती...
पाउस येतो जेव्हा, वाटे .
सौंदर्यच जणू बरसे तिचे...
तिच्याच रूपाने जणू
खुलते रूप या धरतीचे...
मंगळवार, २ फेब्रुवारी, २०१०
अचानकच....
मला कधीच वाटलं नव्हतं...
कोणी माझ्या आयुष्यात येईल...
... अचानकच तू आलीस...
माझं सारं जग व्यापून गेलीस...
अक्षरशः माझ्यावर राज्य केलंस
आणि तशीच निघूनही गेलीस...
तू आलीस अन् सारं काही
अचानकच होऊ लागलं...
अचानकच तू माझी झालिस,
अचानकच मी बदलू लागलो..
अचानकच लोक म्हणू लागले..
अचानकच मी सुधारू लागलो..
तू आलीस तेव्हा वाटलं नव्हतं...
अशीच अचानक निघून जाशील...
उंच आभाळात नेऊन मला
अचानकच सोडून देशील..
अशा तुझ्या वागण्यानं मला
अचानकपणाची सवय झालीये...
तू अचानक परत येण्याची
पुन्हा मला ओढ लागलीये...
कोणी माझ्या आयुष्यात येईल...
... अचानकच तू आलीस...
माझं सारं जग व्यापून गेलीस...
अक्षरशः माझ्यावर राज्य केलंस
आणि तशीच निघूनही गेलीस...
तू आलीस अन् सारं काही
अचानकच होऊ लागलं...
अचानकच तू माझी झालिस,
अचानकच मी बदलू लागलो..
अचानकच लोक म्हणू लागले..
अचानकच मी सुधारू लागलो..
तू आलीस तेव्हा वाटलं नव्हतं...
अशीच अचानक निघून जाशील...
उंच आभाळात नेऊन मला
अचानकच सोडून देशील..
अशा तुझ्या वागण्यानं मला
अचानकपणाची सवय झालीये...
तू अचानक परत येण्याची
पुन्हा मला ओढ लागलीये...
शब्दांचीच कविता होते...
शब्दांचीच कविता होते..
कवितेचे गाणे होते...
आणि एकदा गाणे झाले की ..
सतत.. भावांच्या गावी..
जाणे येणे होते..
भाव मनी दाटता. .
शब्दरूपाने बरसात येतो..
स्वर लाभता तयाला..
भाव नव्याने बरसतो ..
मनास सार्या भिजवून जातो
गावी स्वप्नाच्या घेऊन जातो..
कवितेचे गाणे होते...
आणि एकदा गाणे झाले की ..
सतत.. भावांच्या गावी..
जाणे येणे होते..
भाव मनी दाटता. .
शब्दरूपाने बरसात येतो..
स्वर लाभता तयाला..
भाव नव्याने बरसतो ..
मनास सार्या भिजवून जातो
गावी स्वप्नाच्या घेऊन जातो..
लेबल:
कविता... कवितेवरची....
म्हणून लिहिली मी कविता....
रंग... कसे दिसतात? कसे दिसणार मला?
डोळे कसे.. दिपतात? कसे... ते कसे कळणार मला?
पण जाणवते मज.. हळूवार झुळुक...
ऐकू येतो मज.. थेंब.. टूपुक...
समजते मला.. वार्याची भाषा
कळतात मज कोकिलेचे सूर.. न
पावसाची आशा..
म्हणून लिहिली मी कविता जाणीवेवर..
मात करून माझ्या.. अंधारावर..
डोळे कसे.. दिपतात? कसे... ते कसे कळणार मला?
पण जाणवते मज.. हळूवार झुळुक...
ऐकू येतो मज.. थेंब.. टूपुक...
समजते मला.. वार्याची भाषा
कळतात मज कोकिलेचे सूर.. न
पावसाची आशा..
म्हणून लिहिली मी कविता जाणीवेवर..
मात करून माझ्या.. अंधारावर..
लेबल:
कविता... कवितेवरची....,
सामाजिक
सोमवार, १ फेब्रुवारी, २०१०
एक भेट.....
खूप काही विचारायचंय
खूप काही बोलायचंय...
सांग बरं कधी भेटशील?
तुला काही सांगायचंय...
माझ्याबद्दल... तुझ्यबद्दल...
एकूणच सार्या जगाबाद्दल..
माझा गुन्हा जाणून घ्यायचाय...
तुझी चुक दाखवून द्यायचीये..
आजवर तू जे जे केलंस...
त्याबद्दल तुझी हजेरी घ्यायचीये..
सांग बरं... कुठे भेटशील?
देवळात...? नको तिथे गर्दी असते...
डोंगरावर?.. नको तिथे थंडी असते..
असं कर... तू स्वप्नात ये...
मला तुझ्या सोबत ने..
तुझं म्हणणं मला सांग...
माझं म्हणणं ऐकून घे.. .
मलाही थोडे प्रश्न विचार
नि माझ्याही प्रश्नांची उत्तरे दे..
खरंच देवा.. सांग कधी येशील स्वप्नात?
एकदा यायला हरकत नाही..
तसा.. सततच आहेस की..
माझ्या मनात...
खूप काही बोलायचंय...
सांग बरं कधी भेटशील?
तुला काही सांगायचंय...
माझ्याबद्दल... तुझ्यबद्दल...
एकूणच सार्या जगाबाद्दल..
माझा गुन्हा जाणून घ्यायचाय...
तुझी चुक दाखवून द्यायचीये..
आजवर तू जे जे केलंस...
त्याबद्दल तुझी हजेरी घ्यायचीये..
सांग बरं... कुठे भेटशील?
देवळात...? नको तिथे गर्दी असते...
डोंगरावर?.. नको तिथे थंडी असते..
असं कर... तू स्वप्नात ये...
मला तुझ्या सोबत ने..
तुझं म्हणणं मला सांग...
माझं म्हणणं ऐकून घे.. .
मलाही थोडे प्रश्न विचार
नि माझ्याही प्रश्नांची उत्तरे दे..
खरंच देवा.. सांग कधी येशील स्वप्नात?
एकदा यायला हरकत नाही..
तसा.. सततच आहेस की..
माझ्या मनात...
... आणखी एक रात्र....
तिची आठवण तर येते खूप..
वाटते आत्ता जाउन भेटावे...
पण उगाच ती झोपलि असेल..
स्वप्नांच्या दुनियेत रमलि असेल.. तर?
का तिला.. उठवावे?
पण मग हळूच मी तिच्या स्वप्नात शिरतो..
उगाच..
तिची खोडी काढायला..
ती मस्त चांदण्यात फिरत असताना
मी तसाच तिला निरखत राहतो..
ती इतकी सुंदर भासु लागते..
की मी खोडीसुद्धा विसरतो..
असाच तिला बघत असताना
अचानक ती समोर येते..
म्हणते...
"ए वेड्या... उठ की आता..
सकाळ झाली बघ...
कुठल्या स्वप्नात रमलायेस असा..?"
उठून पाहतो तर...
खरेच सकाळ झालेली असते...
आणखी एक रात्र तिच्या स्वप्नात संपलेली असते...
वाटते आत्ता जाउन भेटावे...
पण उगाच ती झोपलि असेल..
स्वप्नांच्या दुनियेत रमलि असेल.. तर?
का तिला.. उठवावे?
पण मग हळूच मी तिच्या स्वप्नात शिरतो..
उगाच..
तिची खोडी काढायला..
ती मस्त चांदण्यात फिरत असताना
मी तसाच तिला निरखत राहतो..
ती इतकी सुंदर भासु लागते..
की मी खोडीसुद्धा विसरतो..
असाच तिला बघत असताना
अचानक ती समोर येते..
म्हणते...
"ए वेड्या... उठ की आता..
सकाळ झाली बघ...
कुठल्या स्वप्नात रमलायेस असा..?"
उठून पाहतो तर...
खरेच सकाळ झालेली असते...
आणखी एक रात्र तिच्या स्वप्नात संपलेली असते...
हवी आहेत माणसे...
हवी आहेत माणसे...
मन असलेली...
गर्दीच्या नि गडबडीच्या या दुनियेत...
दर्दि असलेली....
हवीयेत माणसे ज्यांना समजते
समोरच्याच्या मनातली भाषा...
ज्यांना कळते दुख नि दिसते
प्रत्येक क्षणात नवी आशा...
हवी आहेत माणसे...
ज्यांना केवळ यांत्रीक जगणे जमत नाही..
ज्यांना हवे असते काहीतरी नवे...
ज्यांना एका जागी गुंतून राहणे कधीच पटत नाही..
अशी माणसे.. मिळतील का कुठे?
असतील तर सांगा पत्ता....
आपल्या मनाचा...
तिथे बोलावून त्यांना अगदी जपून ठेवा...
कारण, अशी माणसे जेव्हा भेटतात...
तेव्हा.... जीवन खर्या अर्थाने सुरू होते...
मन असलेली...
गर्दीच्या नि गडबडीच्या या दुनियेत...
दर्दि असलेली....
हवीयेत माणसे ज्यांना समजते
समोरच्याच्या मनातली भाषा...
ज्यांना कळते दुख नि दिसते
प्रत्येक क्षणात नवी आशा...
हवी आहेत माणसे...
ज्यांना केवळ यांत्रीक जगणे जमत नाही..
ज्यांना हवे असते काहीतरी नवे...
ज्यांना एका जागी गुंतून राहणे कधीच पटत नाही..
अशी माणसे.. मिळतील का कुठे?
असतील तर सांगा पत्ता....
आपल्या मनाचा...
तिथे बोलावून त्यांना अगदी जपून ठेवा...
कारण, अशी माणसे जेव्हा भेटतात...
तेव्हा.... जीवन खर्या अर्थाने सुरू होते...
लेबल:
मैत्री / नाती,
सामाजिक
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)