शनिवार, ४ डिसेंबर, २०१०

एक ....

एक घाव...
मनावरचा..
एक धार...
रक्ताची... लाल रंगाची..
एक शब्द...
शेवटचा...
एक आरोळी...
मनातली.. मनाची
एक क्षण..
शेवटचा..
एक प्रश्न...
आयुष्याचा.. मरणाचा..

गुरुवार, १४ ऑक्टोबर, २०१०

मध्यरात्रीच्या वेळी...

मध्यरात्रीच्या वेळी अचानक
सख्यास जाग आली...
पाहिले सखिला तेव्हा सखी
झोपेतच, हसताना दिसली...
निरखून पाहता जाणवले...
कोण्या स्वप्नात गुंग होती...
तसाच होता तिला न्याहाळत तो...
जेव्हा जाग सखीसही आली...
पाहिले तिने सख्यास जेव्हा..
पुन्हा लाजुनी डोळे मिटुनी...
सखी मग, मिठीत सख्याच्या शिरली...

मंगळवार, १२ ऑक्टोबर, २०१०

निर्णय

चुकीच्या म्हटलेल्या गोष्टी
नेहमीच चुकीच्या असतात?
योग्य म्हटलेल्या गोष्टी
कधीच का चुकीच्या नसतात?

परिस्थितीच्या गरजेनुसार
प्रत्येकजण वागत असतो
त्या क्षणी, त्या परिस्थितीत
प्रत्येकजण बरोबर असतो..

मग मागाहून त्या गोष्टी
चुकीच्या म्हणण्यात काय अर्थ?
असंच जर म्हणायचं असेल
तर सारं जीवनच होईल व्यर्थ

म्हणूनच घेतलेल्या निर्णयावर
ठाम राहता यायला हवं..
पुढं येणार्‍या प्रत्येक प्रश्नाचं
उत्तर देता यायला हवं

नाहीतर जगाच्या संगण्यानुसार
आपण प्रत्येक गोष्ट करतो
आयुष्याच्या शेवतो मात्र
आपणच मूर्ख ठरतो...

शुक्रवार, ८ ऑक्टोबर, २०१०

कसूर

हम कहते गये जो ना कहना था…
वो हर लब्जपे हमारें बस रोते गये..
कसूर तो हमारा ही था..
जो ना देखा उनकी आँखों में..
बस खुद के जख्म दिखातें रहे..
हक़िक़त तो ये थी की
पुरा दिल कुरेडा था हमने..
पर उन्होने उफ्फ भी ना किया…
और हम और घाव बनातें गये..
जब पता चला के हम ही गलत थे…
देखा सनम का हाल…
उसके बाद से जिंदगी के आखरी साँस तक..
बस खुद ही से आंखें चुराते रहे..

बुधवार, ६ ऑक्टोबर, २०१०

तुझ्यासाठीच केवळ...

सखे.. तुझ्यासाठी मेळवेन
मी अवकाश धुलीला.
तुझ्यासाठी नमवेन
मी या सार्‍या जगाला..
सांगशील तू तर सूर्यास विझवेन...
तुझी उशी बनवण्या चंद्रासही आणेन...
तुझ्या हाकेवर केवळ मी
उभा जन्म वाहीन...
तुझ्यासाठीच केवळ...
पुन्हा पुन्हा जन्म घेईन...

ओढ कशाची असे मनाला...

सामोरी येता तू सखे
हरवतो डोळ्यात तुझ्या...
नसशी समोर जेव्हा तू..
आठवतो नजरेस तुझ्या...
सांग मला मग कधी बोलावे...
काय माझ्या मनात असे अन्..
कसे सांगावे सखे तुला...
नित्याचेच झाले हरवणे..
आठवणे.. केवळ तुला...
सांग सखे मी राहू कसा..
जर दिसली नाहीस तू... कधी मला...
मला ना ठावे काय असे हे..
का हे घडावे, माझ्यासवे...
ओढ कशाची असे मनाला...
प्रेम का जडले.. तुझ्यासवे?

शनिवार, २ ऑक्टोबर, २०१०

कोई इतना इश्क़ हमसे करता..
तो हम जान भी लूटा देते..
कोई प्यार से माँग लेता
तो पूरा जहाँ नज़र करते...
वो ना जाने क्यूँ दिल में लिए बैठे हैं
के हम उन्हे भूल जाएँगे...
और हम पता नही कब से
उन्ही के नाम की साँसे ले रहे हैं...

उन्हे जाने क्यूँ लगता हैं
के हम बेवफा हैं
और हम हैं के उनकी खातिर
खुदा से भी बेवफ़ाई कर लेते हैं

त्या दोघांची... चंदेरी भेट

पावसाळा नुकताच संपलेला...
संध्याकाळची वेळ....
नदीचा तीर... खळखलणारे पाणी..
आकाशी चाललेला रंगांचा खेळ...

पश्चिमेने उधळलेल्या रंगछटा
अश्याच काहीश्या सखीच्या केशलता...
तिचे मावळतीच्या खेळात मग्न होणे...
त्याचे मात्र तिच्याकडे पहाणे...

मधूनच एखादी वार्याची झुळुक..
अंगावर आणते शहारा हळूच..
कातरवेळी त्याचा तिला स्पर्श..
शृंगाराचीच जणू देई चुणूक...

मावळतीला अंधार दाटत जातो...
पूर्वेहून मग चंद्रकला उगवते..
त्या दोघांची भेट तेव्हा पूर्ण होते...
जेव्हा... चंद्राने रात्र चंदेरी होते...

गुरुवार, ९ सप्टेंबर, २०१०

श्रेय नसे माझे कसले..

"नेहमीच कसे तुझं
सांग समजते.. मनातले माझ्या..
भावना कधी मी
व्यक्त न करता..
पोहोचति कश्या मनी तुझ्या...
सांग सख्या मज...
कसे समजते...
काय हवे असे मजला..
कसे जमवसि शब्द कुठूनसे..
रचावया गझला.."
"सखे, जरी तुझं वाटे कठीण हे..
किंचितही.. नाही तसे..
शब्द शोधण्या... कुठे न जाता..
मिळती मजला...
सौंदर्यच तुझे असे...
श्रेय नसे माझे कसले..
केवळ तुला मी वर्णिले..

ती रूसते...

ती रूसते...
अन् तो तिला मनवतो...
कधी तिच्यावर कविता करतो..
तर कधी तिच्यासाठी गाणे गातो..
कधी लाडीक रागाने बोलतो..
कधी तोही रुसून बसतो...
प्रत्येकवेळी... रुसवा काढायला..
बोलावेच लागते असे नाही..
कधी एका नजरेत ती हसते...
कधी.. केवळ एक 'स्पर्श'च पुरतो...

देवाजीचे देणे...

देवाजीचे देणे...
त्यास.. आपण काय करावे?
त्याने दिले ते घ्यावे...
सर्व जगताला वाटावे...
सारे वाटून पुन्हा रिक्त व्हावे...
त्याच्या नव्या देण्यासाठी...
असेच घेऊन.. वाटत राहून...
पुन्हा पुन्हा रिक्त व्हावे...
समस्त जगाच्या भल्यासाठी..

छोटीशी.. छानशी.. कविता

छोटीशी? छानशी?
कविता तुला..
ऐकवुच कशी मी?
मनी जे दाटे.. मला जे वाटे..
भावना तुझ्यासाठीची...
मोजक्याच शब्दात...
मांडू कशी मी?
रूप तुझे जे आरसपाणी...
पाहता तुला होते
धुंद ही अवनी...
सांग तूच सखे...
इवल्याश्या काव्यात
वर्णू कशी मी.. ?
छोटीशी.. छानशी..
कविता तुला...
ऐकवुच कशी मी?

शुक्रवार, ३ सप्टेंबर, २०१०

अमावस्या?

अमावस्या असली..
तरी तिला मात्र चंद्रच हवा असायचा..
तारे कितीही लुकलुकले..
कितीही सुंदर दिसले..
अगदी संपूर्ण अवकाश जरी त्यांनी व्यापले..
तिला ते आवडले तरी म्हणायची..
"चंद्र असता तर आणखी मजा आली असती नाही?"
किंवा कधी म्हणायची..
"चंद्रप्रकाशातले जग काही निराळेच"
झाले.. छान गप्पा चालू असताना..
ते दोघे प्रेमात दंग असताना,
ती अशी काहीसे म्हणायची..
एक दिवस ना राहवून
तो तिला म्हटला..
"सखे, चंद्र हवा असतो तुला..
त्याची उणीव भासते तुला..
पण, मला नाही भासत कधी त्याची उणीव..
अन् त्या तारयांनाही नसेल वाटत असे काही..
कारण, माझ्यासाठी, त्यांच्यासाठी..
अमावस्या कधी होतच नाही..
चंद्र नसेल उगवत कदाचित त्या रात्री..
पण तुझ्या रूपाने असतोच ना तो समोर.."
सखी काय म्हणणार..
कौतुकाने पाहत राहते..
त्याला.. अन् तारयांना...

मंगळवार, ३१ ऑगस्ट, २०१०

पौर्णिमेच्या चांदण्यात

पौर्णिमेच्या चांदण्यात
ती भेटीला येते...
जणू, स्वर्गीची कोणी अप्सराच
माझ्या सामोरी येते...
सौंदर्यकडांवरून तिच्या
जेव्हा चांदणे फिरते...
अप्सरेची कल्पनाही मग..
केवळ खूजी वाटते..
ओठांवरुनी थरथरणार्‍या
माझा स्पर्श जेव्हा फिरतो...
सौंदर्य तिचे जणू मग..
परिपूर्ण वाटते...
प्रणयात तिच्या मी.
मग चांदण्यात त्या
असा धुंध होतो...
चंद्रास्त होतो, रात्रही संपते...
तरीही केवळ तिच्या
स्वप्नात मी रमतो...

शृंगार... तिचा अन् माझा

तिच्या माझ्यातले अंतर ..
जेव्हा कमी होते..
जणू, शृंगारालाही तेव्हा..
भरभरून येते..

तारुण्य तिचे नि माझे..
जेव्हा.. एकरूप होते..
चंद्रकिरणासही मधून शिरण्या...
जागा न उरते..

श्वासांतून वाहू लागता
श्वास तिचा माझा..
प्रलयालाही स्पर्धा करण्या
ताकद ना मिळते...

प्रेमास तिच्या अन् माझ्या
जेव्हा उधाण येते...
प्रेमदेवतेलाही मग
काही सुचेनासे होते...

भूतकाळ येतो... आणि ...

एक दिवस अचानक समोर येतो...
भूतकाळ..
असा भूतकाळ, ज्याने आपल्याला
वेड लावलेले होते..
ज्याच्याशिवाय.. कधीकाळी..
जगनेही मुश्कील झालेले होते..
असा भूतकाळ.. जो कधी वर्तमान होता...
भविष्य होता..
पण.. पण अचानक..
काळाच्याच कोण्या खेळाने..
आपल्यापासून दुरावला होता..
भूतकाळ... आपले प्रचंड प्रेम असलेला..
आपल्याला प्रचंड त्रास दिलेला..
आपल्या संपूर्ण भविष्यावर ज्याचे सावट कायमचे पसरले गेले...
असा एक भूतकाळ...
तो सामोरा आला की आपण भले म्हणतो..
"जा, नाही काही अडत माझे तुझ्याविना...
जा.. काडीमात्रही किंमत नाहीए आता तुझी मला... "
पण खोलवर मनात मात्र...
पुन्हा सार्‍या जुन्या जखमा
ताज्या झालेल्या असतात...
पुन्हा सार्‍या भावनांनी
एकच उच्छाद मांडलेला असतो...
केवळ त्या भूतकालाच्या झलकेनेच...
सारा सारा आयुष्याचा ताळमेळ
बिघडलेला असतो...
असा भूतकाळ येतो... आणि
शून्यातून सुरूवात करून निर्माण केलेल्या नव्या आयुष्यलाही...
पुन्हा एकदा शून्यावर नेऊन ठेवतो...

सोमवार, ३० ऑगस्ट, २०१०

मी.. प्रेमात बुडालेला..

तू काळी मोगर्‍याची
वा झुळुक वार्‍याची
मी सुगंध वाहणारा....

तू वीज कडाडनारी..
वा कृष्णमेघांची दाटी....
मी कोसळत्या धारा...

तू परी स्वप्नातली..
वा राणी सत्यातली..
मी.. स्वप्न पाहणारा..

तू व्याख्या प्रेमाची
वा जाणीव अस्तित्वाची..
मी.. प्रेमात बुडालेला..

शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०१०

...याच कारणे...

एकदा... भेटता विचारले तिने..
"सांग नवे काय माझ्या दिसले, आज तुला?"
सांगितले मी तिला..
"प्रिये, तशी तर रोजच भासतेस तू नवी..
खास असे काय सांगू मी तुला?"
म्हणाली.. "असे उत्तर चालायचे नाही..
नवे काय ते ओळखल्याशिवाय
माझ्याशी बोलायचे नाही.."
मग मात्र मी म्हटलो तिला..
"सखे, तू येताच समजले होते मला..
तू माळलीस मोगरी गजरा..
चाहूल तुझी लागली मज..
जेव्हा नवपैंजण तुझा वाजला.."
ऐकताच सखी मग पुन्हा बिलगली..
पुन्हा एकदा मिठीत शिरली..
काही न बोलता बोलून गेली..
"सख्या, याच कारणे प्रीत तुझ्यावर जडली..."

लिहायचो मी..

असेच काहीसे लिहायचो मी..
वर्णन तिचे कधी करायचो मी...
कधी सौंदर्याचे तिच्या...
तर कधी प्रेमावर तिच्या लिहायचो मी..

भेटायची मला जेव्हा ती..
केवळ पहात राहायचो मी..
एकाच तिच्या नजरेने नेहमी..
पुरता घायाळ व्हायचो मी..

आताही लिहितोच आहे..
वर्णन तिचे करतोच आहे...
पण, आता आहे सोबतीस ती माझ्या..
पुर्वी... स्वप्नातच केवळ पहायचो मी..

गुरुवार, २६ ऑगस्ट, २०१०

विचारांचा पाउस...

विचारच करत होतो...
की विचार काय करावा?
अन् विचार करून
त्याचा उपयोग काय करावा?

आणि तेवढ्यात अचानक
एक विचार मनी आला..
विचार.. कधी, कुठे, कसा...
विचार.. करावाच कशाला?

विचारच करायचा तर..
विचारच करायला हवा..
इतक्या सगळ्या प्रश्नाचा
विचार का असावा?

विचाराच्या इतक्या विचाराने
डोक्यात विचारांचा ढग होतो
विचार करत असतानाच अचानक..
आणखी विचारांचा पाउस पडतो...

रविवार, १५ ऑगस्ट, २०१०

गाव मात्र एकटं झालंय...

रस्त्यावरून दिसणारं एक गाव..
पावसात भिजून चिंब झालंय..
पावसाच्या प्रत्येक थेंबानं..
गावाचं सौंदर्य खुलू लागलंय..

गावात शिरताच दिसून येतं
गावात समस्यांचच रान माजलंय
गावात माणसं असूनसुद्धा
गाव आतून एकटं झालंय..

मागल्या सालिही पडला पाउस..
धरणात भरून वाहिलं खूप
पाणी मात्र नंतर सारं
शहरासाठी वाहून गेलंय..

पाउस गेला उन पडलं..
गावातलं सारं आटून गेलंय
गावात धरण असूनही
गावातलं ढोर तहानेन मेलंय

या सारयचा कंटाळा येऊन..
पोटा-पाण्याचा प्रश्न घेऊन
प्रत्येक पोर आता शहरात गेलंय
गाव मात्र एकटं झालंय...

मंगळवार, ३ ऑगस्ट, २०१०

तिची तक्रार.. त्याचे उत्तर...

तिची तक्रार..

तू मला साधा फोन करत नाहीस..
माझी तुला कधी आठवणच येत नाही..

आलीच असती..
तर निदान एखादा मेसेज केला असतास...
नव्हताच इतका वेळ..
तर मिस्ड कॉल तरी दिला असतास...
पण यातले काही झालेच नाही..
कारण.. तुला माझी आठवनच येत नाही...

कधी माझा वाढदिवस विसरतोस..
कधी आपण भेटल्याची तारीख..
आपण एकत्र फिरायला गेलो..
ती पहिली जागाही तुझ्या लक्षात नाही..
कारण... तुला माझी आठवण येत नाही..

त्याचे उत्तर...

मेसेज करायला किती वेळ लागतो ग..
पण तो करतानाही कधी कधी
कविता मला सुचत नाही..
आणि साधा एखादा मेसेज करणे..
खरेच बरे वाटत नाही..

साधा मिस्ड कॉल द्यावा म्हटले
तरी.. बरे वाटत नाही..
तुला फक्त मिस करणे..
माझ्या मनाला तरी पटत नाही..

आठवण आली.. कॉल केला
की गप्पा मारत राहतो मी..
माझे सारे काम विसरून..
तुझ्यात गुंतत जातो मी..


म्हणूनच सखे.. आठवण येऊनही..
तसे कधी मी दाखवत नाही..
पण.. असे केल्याने तुझ्यावरचे..
माझे प्रेम कधीच कमी होत नाही..

मंगळवार, २७ जुलै, २०१०

पाउस अचानक येतो..


सखी येत असता भेटण्या त्याला..
पाउस अचानक येतो..
सखिला उशीर होतो..
अन् प्रियकर तिजसाठी झुरतो..

पाउस थोडा विसावतो...
सखी भेटण्या प्रियाला निघते..
सखी वाटेवरती असता..
पाउस पुन्हा बरसतो..

सखी भिजते.. तशीच निघते..
प्रियाला भेटण्या पोहोचते..
पाहताना साखिला येताना
प्रियकरही आनंदून जातो...

पाहता भिजलेल्या साखिला
प्रियकर मोहित होतो..
ती मिठीत त्याच्या शिरता
पाउस पुन्हा जोर घेतो..

प्रेमास त्यांच्या फुलवण्या
पाउस.. असाच नेहमी येतो...

मंगळवार, १३ जुलै, २०१०

कवीने जगायचे... वाचकाने.. केवळ पाहायचे..

कवीने लिहायचे असते...
स्वतःच्या अनुभवातून...
वाचकाने वाचायचे ते...
त्याच्याच चश्‍म्यातून

कधी साकारायचे कवीने..
नवे जग कल्पनेतून..
वाचणार्याने पाहायचे...
त्यात काही काळ राहून..

कवीने म्हणायचे...
वाचकाने ऐकायचे...
कवीने जगायचे...
वाचकाने.. केवळ पाहायचे..

कवीच्या जगात वाचकाने
कायमचे राहायचे नसते...
कारण, कवीला कवीचे...
अन् वाचकाला.. वाचकाचे...
स्वतःचे आयुष्य जगायचे असते...

पाउस... असाच येतो...

पाउस... आठवायला लागत नाही..
तो अचानक कोसळतो..
कधी मेघांतून... कधी मनातून..

तो मेघांतून बरसतो...
थेंबांच्या धारा होऊन..
कधी मनातून बरसतो..
आठवणींचा वारा होऊन..

कधी येतो तो लेखणीतून..
शब्दांच्या गारा होऊन..

कधी डोळ्यांतून बरसतो..
सुख-दुःखाच्या आसवांतून...
कधी ओठांतून खुलतो..
निखळ हास्यातून...

पाउस... असाच येतो...
निरनिराळ्या रुपांतून...

गोष्ट तिची अन् त्याची....

तीच रोजचीच गोष्ट... तिची अन् त्याची..

तो अन् ती.. जणू राजा अन् राणी..
वेगळी नसेलही कदाचित..
पण.. एक सुंदरशी प्रेमकहाणी...

सुरू होण्याआधीच संपणारी...
संपूनही कधीही न संपणारी..
अधुरिच खरी...
पण मनाला भावणारी..

त्या दोघांची म्हणता म्हणता...
माझी नि तुमची होणारी..
गोष्ट तिची अन् त्याची....
__________________विनायक बेलोसे

शुक्रवार, ९ जुलै, २०१०

"संवाद"... तो व्हायला हवाय...

तडा गेला तो गेलाच...
त्या दोघांच्यातल्या विश्वासाला...
कारण.... काहीही असो...
तडा गेला.. हे खरे....

तिचे म्हणणे एकच... 
"त्याचे माझ्याकडे लक्षच नाहीए...
मीच नेहमी त्याला समजून घ्यायचे...
ही त्याचीही जाजबदारी नाहीए?"
तो इकडे कामात गुंग...
तिच्यासाठी मोठे व्हायचेय म्हणून...
जमेल तितकं कमवायचंय...
तिला त्रास होऊ नये म्हणून...

त्याला वाटे... "ती केवळ भांडत राहते..
मला समजून घेतच नाही...
कधी मला तिची गरज असते...
केवळ मन हलकं करण्यासाठी...
पण ती काही ऐकतच नाही... "
तीही तिकडे कामात मग्न...
त्याला वेळच नाही म्हणून...

दोघे बरोबर... आपापल्या जागी...
पण एकच गोष्ट दोघांत होत नाही...
"संवाद"... तो व्हायला हवाय...
मग काहीही बिघडत नाही...

गुरुवार, ८ जुलै, २०१०

क्षणाचाच मी...

क्षणात हिरवा.. क्षणात पिवळा..
क्षणात होतो मी कधी गहिरा..
क्षणाचाच तो विलंब केवळ..
क्षणात उदास मी.. क्षणात हसरा..

क्षणाक्षणाला बदलत जातो..
क्षणात ऋतूही मागे पडतो...
क्षणात कधी मी इतका बदलतो..
क्षणातच ऋतूला पुन्हा गाठतो...

क्षणच काय तो मजसोबत पळतो..
क्षणाबरोबर मी ही पळतो..
क्षणाचाच मी... क्षणही माझा...
कधी तो क्षणही मजवर जळतो...

गुरुवार, १ जुलै, २०१०

गूढ.. अगम्य... केवळ सावली...

निशब्द.. शांतता...
कशाचही आवाज नाही...
आस-पास कोणी ही नाही...
केवळ... निशब्द शांतता..

त्यातून येणारा एक आवाज..
घुंगरांचा... मधुर...
अगदी काळजाला भिडणारा...
त्या निशब्द शांततेला...
मधूनच चिरणारा....

मागून येणारी सावली...
कोण्या अद्न्यात व्यक्तीची...
कोणाची? माहीत नाही...
केवळ सावलीच ती...

भविष्यात होणार्‍या एखाद्या
अघटीताची तर नाही?
कोण जाणे...
पण.. सावली दिसतीये खरी..
गूढ.. अगम्य... केवळ सावली...

शनिवार, १२ जून, २०१०

पाउस...

पाउस...
कधी आठवणींचा... तर कधी नाविण्याचा...
कधी रिमझिमत्या थेंबांचा,
कधी तिच्या नाजूक स्पर्शांचा...

पाउस...
कधी तिचा... कधी माझा...
कधी आम्हा दोघांचा..
कधी दोघांमधल्या मौनाचा..
तर कधी... ना संपणार्‍या गप्पांचा...

पाउस...
कधी शांतपणे पडणारा...
कधी धो धो येणारा...
कधी केवळ मृदसुगंध देणारा..
कधी.. अखंडपणे साथ देणारा...
पाउस...

रविवार, ६ जून, २०१०

प्रेमात तिच्या मी पडलो...

असेच कधी पावसात भिजताना
तिला पाहीले होते...
तिच्या सौंदर्याच्या प्रत्येक अदेवर
मी... माझे मन वाहीले होते...

पाहताच तिला मज पटले होते..
सालसता ती हीच खरी...
तिच्या नसा-नसात भणली होती
जणू, तारुण्याची प्रीत खरी...

नजर मिळविता तिने नजरेशी
घायाळ पुन्हा मी झालो..
मला खरे कळलेच नाही
कधी प्रेमात तिच्या मी पडलो...

बुधवार, २४ फेब्रुवारी, २०१०

तू.. अन् तुझी निखळ मैत्री..

रोज भेटायचो आम्ही.. अगदी आवर्जून
गर्दी असेल भेटायच्या जागी..
तर हाक मारायचो एकमेकांना... हात उंचावून..

भेटलो की बोलायचो.. माझ्याबद्दल, तिच्याबद्दल..
आणि खूप सार्‍या विषयांबद्दल...
रंगायच्या आमच्या गप्पा.. भरपूर..
भाणही नसायचे.. वेलेबद्दल..

इतक्या गर्दितही गप्पा मारताना..
आम्ही कोणाच्या मद्ध्यात नसायचो..
आणि कोणी त्रास देऊ गेला..
की त्याला अद्दल घडवायला मागे नसायचो..

अशीच आमची मैत्री होती,
अगदी झार्याप्रमाणे निखळ..
एकमेकांबद्दल विचारही होते.
पाण्याप्रमाणे नितळ.

पण एकदिवस ती म्हणाली..
"मला तुझ्याशी बोलायचे नाही..."
का? म्हणून विचारले तर..
"मला तुला ते सांगायचे नाही.."

खोडून विचारल्यावर कळले..
ती माझ्यात गुंतली होती..
मला थोडा धक्काच बसला.. कारण..
ही गोष्ट माझ्या मनातही नव्हती..

थोडा विचार केल्यावर वाटले..
मलाही ती आवडते..
एखाद्या दिवशी नाही भेटलो तर..
माझे ही खूपकही आडते..

पण असा विचार कराण्याइतके..
नशीब साथीला नव्हतेच कधी..
कारण माने जरी जूळली तरी..
'जोड्या' तर जुळल्या होत्याच आधी...

मग मात्र म्हटले तिला मी -
"ती आहे... नको तू बोलूस...
पण... विसरुही नकोस, कोणी मित्र आहे तुझा..
हाक दे केव्हाही.. जेव्हा मदत लागेल तुला.."

माझ्याही मनात राहशील तू..
अन् तुझी निखळ मैत्री.. तशीच..
वेगळे होऊनही एकटत्रच असु..
विसरणार नाही मी तुला.. कधीच..

मंगळवार, २३ फेब्रुवारी, २०१०

शब्द असती जणू तारे ते आकाशीचे..
जोडून पाहता होते नक्षत्र कधी त्यांचे..
एकटे पाहता वाटे...
कोण असतील मित्र यांचे?
________________
पाहण्याचा ढंग आपुला
ठरवून जातो... चित्र नभाचे..
कधी दिसे ते एकट्याचे..
कधी कधी नक्षत्र ते चांदण्यांचे...

कविता करताना जेव्हा शब्द सुचत नाहीत तिला... 
करिता मी त्यावर कविता एखादी...
म्हणते माझे सारे शब्दही साथ तुला देती..
मज एकटी करून जाती..
का असे ते वागती मजपाशी
प्रयत्न करते मी किती..
त्यांना सजवन्याचे, फुलवण्याचे   ..
सोबत त्यांच्या कोण्या एका स्वप्नांच्या गावी जाण्याचे..
तरीही का रे जमत नाही मज..
तुझ्या सारखी कविता..
सांगतो तिला मग
सखे, शब्द केवळ आहेत माझे..
भाव मात्र नेहमी तुझे मग..
का बोल राग तुझा कश्याकरिता?

शनिवार, २० फेब्रुवारी, २०१०

बस पलभरभी याद ना रहा..
उनको हमारे साथ जो बिताया था..
तो प्यार क्या याद रहेगा उन्हे..
जो हमने उनसे जताया था..

सोमवार, १५ फेब्रुवारी, २०१०

ओर्कुटवर झालेली मैत्री
कधी वाढत गेली,
कळलेच नाही त्या दोघांना..
मैत्रीचे प्रेम कधी झाले
समजलेच नाही त्यांना..
प्रेमात पडले होते खरे दोघे..
भेटले मात्र नव्हते कधीच...
आयुष्यभराच्या आणा-भाका मात्र
झाल्या होत्या आधीच...
कधी स्क्रॅप, कधी ईमेल
कधी कॉल करून बोलणे..
एकमेकांना चिडवणे..
एकमेकांसाठी झूरणे...
ऑनलाइन भेट नाही झाली
तर रुसणे तर कधी भाण्डणे..
मग आला दिवस प्रेमाचा...
ठरला बेत भेटिचा..
जागा ठरली... वेळ ठरली..
दोघे अगदी आतुरतेने भेटले...
इतके दिवस प्रेमात असूनही..
आज खरे मिलन झाले..
इतके सारे होऊनसूद्धा
काहीतरी वेगळे होते..
भेटीत दोघांच्या गप्पा सोडून
बाकी सारे जमले होते..
एकमेकांना समोर पाहून
आनंद गगनात मावत नव्हता...
पण... नेमके काय बोलावे
याला विषयच मिळत नव्हता..
एकमेकांची चौकशी झाली
पुढे काहीच होत नव्हते..
एकमेकांना पाहून हसण्याखेरीज...
दोघांना काहीच जमत नव्हते...
दुसर्या दिवशी पुन्हा
दोघे ऑनलाइन भेटले...
एकमेकांची माफी मागून
पुन्हा गप्पांमध्ये गुंतले..
---------------------------------
थोडक्यात काय...
माने आलियेत जवळ...
साधने झालीयेत अफाट...
सभाषणाला मिळालाय वेगसुद्धा सुसाट..
पण इतके सारे होऊनही...
एक मात्र कमी आहे..
प्रत्यक्षात भेटनार्‍या माणसातले...
अंतर मात्र वाढत आहे...

उद्देश... माझा.. जीवनाचा..

उद्देश... माझा.. जीवनाचा..
असा विचार केल्याला खूप काळ लोटलाय.
पण जेव्हा जेव्हा विचार केला..
तेव्हा तेव्हा त्यातून वेगवेगळा निष्कर्ष निघाला..
कधी वाटले आपल्याला देवाने पाठवलाय.. मस्तपणे हुन्दडायला...
कधी वाटले.. छे मी तर आलोय इथे काही साध्य करायला..
काहीतरी खास.. जसे देवाने पाठवले अर्जुनाला..
त्या शिवरायला.. त्या शंभुराजाला...
त्या शाहूला.. फुले आंबेडकरांना..
पण कधी कधी मी विचार करतो..
नक्की काय बरे हवे असेल देवाला..
माझ्याकडून? खरेच कोणी सांगेल मला?
माझे धेय काय? कोणी दाखवेल का वाट ??
पण मग.. अचानक वाटते..
कोण कशाला देवच सांगेल.. कसे?
त्याला जे हवे आहे ते समोर आनेल आणि काहीतरी इशारा करेल..
बस्स.. तो इशारा समजायला हवा..
बाकी सगळे होईलच.. आपोआप...

रविवार, १४ फेब्रुवारी, २०१०

विचार... चौकटीच्या बाहेरचा..

कधी केलाय विचार?
चौकटीच्या बाहेरचा..
कधी पहिलाय अंधार?
नजरेच्या पलीकडचा...

कसा कोणास ठाऊक..
पण मला तो अंधार दिसला..
आणि पडला प्रश्न..
या सुवर्ण काळाच्या जगात तो काळा कोपरा .. कसला??

नीट पहिले तेव्हा दिसले..
जाणवले..
ही तर वेगळीच दुनिया..
आपल्याच दुनियेतली..
आपली भूक वरवर्चीच..
इथली भूक 'आतली'

आपल्या जगातून येणार्‍या
दयेच्या किरणांवर हे जगतात..
ज्या ते ही नाही मिळत..
ते त्या अंधारातच मरतात...

काही ना काही घडल्यावर..

वार्याची एक झुळुक..
घामाने थबथबल्यावर..
पारावरची सावळी..
उन्हात फिरून आल्यावर..
थंडगार पाण्याचा एक घोट..
खूप घसा सुकल्यावर..
परिजातकाचा सडा...
ती अचानक दिसल्यावर..

अश्या सगळ्याच छोट्या गोष्टी..
मोठ्या होतात..
काही ना काही घडल्यावर..
अशयाच छोट्या गोष्टी शेवटी
मोठा आनंद देऊन जातात..
इतका की विशाहूनही कडू आठवणी
क्षणात विरून जातात..

कंटाळा येतो ना..

कंटाळा येतो ना.. मला..
तेव्हा मी कविता लिहितो...
चार.. ओळींची.. नाही म्हणजे तसे मी ठरवतो..
की लिहुयात काहीतरी लांबलचक.. वेळ जाईल निघून..
मग मी लिहु लागल्यावर हलू हलू माझा उत्साह संपत संपत कविता ही संपते..
आणि मग ती राहते.. फक्त चार.. ओळींची नव्हे..
शब्दांची..
मग उगीच तिला शेपटी लावतमी तिला लांब करत नेण्याचा प्रयत्न करतो..
हनुमानाच्या शेपटीएवढी कविता लिहीण्याचा संकल्प..
त्याच शेपटी ला कापड गुंडालणार्‍यांच्या उठशाहासारखा कमी होतो..
आणि मी अर्ध्यातच शेपटी पेटवून देतो..
काय?
शेपटी पेटवतो? कोण?
मी.. कविता सम्पवतो..
आणि मग मला कळते.. की शेपूट कुठली..
वेळ जावा म्हणून नकळतच मी थंडीत.. (म्हणजे ए सी च्या)
शेकोटी मिळावी म्हणून कविताच पेटवून दिलेली असते..
त्या कागदाची राख गोळा करायची ही इच्छा नसते..
मग मी त्या राखेवरच दुसरी कविता लिहीत लिहीत..
कधीतरी झोपी जातो..

कविता मी आणतो..

कविता मी आणतो.. त्या गावाहून..
जिथे सापडतो स्वप्नसडा... रोज रातीला..
भेटतो जिथे रवि.. किरणांना...
अन् चंद्र चांदन्यांना..

भेटती जिथे भाव मनीचे सारे...
जणू आकाशातील तारे..
नसे जिथे कल्पनेस बंध..
दर वळतो जिथे रातरानी सुगंध..

परतत असता भेटती शब्द
म्हणती येतो सोबतीला...
जाती देऊन जाता जाता..
अर्थ माझ्या कवितेला..

चंद्र गेला तरी कुठे?

एके रात्री ती सोबत असताना..
वाटले... तिला डोर कुठे न्यावे..
मस्त चांदण्यात फिरवून आणावे..
दाखवावा चंद्र नि म्हणावे..
"प्रिये, पहा... तो चंद्रसुद्धा तुझ्यासाठीच झुरतो जणू...
त्याचे झुरनेच हे सारी रात्र
चंदेरी करून जातेय..."
पण, चंद्र काही दिसत नव्हता...
चांदणे तर अगदी लख्ख...
मग, चंद्र गेला तरी कुठे?

चंद्राची वाट पहात
हळूहळू पहात झाली.. उजाडू लागले...
झोप मोडली नि समोर चंद्र दिसला...
विचारले त्याला..
"काय रे होतास कुठे?"
तो म्हटला... "अरे.. असं काय करतोस..?
तुझ्याच सोबत तर होतो रात्रभर..
अगदी तुझ्या शेजारी...
तुझ्या सखीच्या चेहर्यावरचे तेज बनून... "

शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०१०

आणि पुन्हा कामाला लागतो..

कधी चांदण्या पहिल्यात....
आकाशभर पसरलेल्या..
काही लुकलुकतात.. काही हालतात..
काही फेर धरून नाचू लागतात
आणि नक्षत्र होऊन बसतात..
काही आकाशातुन खालीही पडतात..
अश्या शांदण्या पाहता पाहता
कधीतरी हळूच झोप लागते..
त्यातलीच एखादी चांदणी मग
स्वप्नविश्वात घेऊन जाते..
अगदी अनोळखी, अनोलख्या
अश्या काही ठिकाणांची सैर करवते...
म्हणे आपलेच काही लोक देवाघरि जाउन चांदणी होऊन बसतात..
त्यातली काही मंडळींची भेट ही एक चांदणी घडवून देते..
आणि मग रंगतात गप्पा...
'दूरच्या' आपल्यांशी...
अगदी खूप खूप आठवणी,
गप्पा आणि गाणी..
काही वेळाने डोळ्यासमोर एक पडता येऊ लागतो..
अंधाराचा.. छे उजेडाचा..
कारण तोवर सकाळ झालेली असते..
आणि सुर्यनारायण आपला किरणांचा रथ घेऊन
दिवसाच्या सफरीवर निघालेला असतो..
बस्स.. मग आपण त्या चांदणी सोबतच्या सहलीची मजा घेऊन
ताजे होऊन पुन्हा दिवसाची सुरूवात करतो..
कोणीतरी म्हणते आज काहीतरी खास वाटतं..
आपण उगीचच हसतो.. आणि पुन्हा कामाला लागतो..

जगावं ... कुणासारखं?

कधी वाटतं जगावं... पक्ष्यांसारखं
पंख पसरून फिरावं स्वछन्दि
राज्य करावं आकाशावर
कुठंही विचरण्यास नसावी बंदी

कधी वाटतं जगावं... माश्यासारखं
खोल खोल पोहत जावं
सागराच्या तळाशी राहावं
आणखी खोल जाताना, अडवणारं कोणी नसावं

कधी वाटतं जगावं... चंद्रासारख
रोज रात्री यावं
कधी मोठं व्हावं, कधी गायब व्हावं
कवींच्या कल्पनेत सतत रहावं

कधी वाटतं जगावं... सूर्यासारखं
सार्‍या जगास प्रकाश द्यावा
दिसामाजी आराम करावा
रोज सार्यांचा नमस्कार घ्यावा

कधी वाटतं जगावं... राजासारखं
आपल्याच धुंदीत राहून
प्रजेला ताब्यात ठेवून
वाटेल तसं राज्य करून
सार्‍या जीवनाचा घ्यावा आनंद

कधी वाटतं जगावं... योग्यासारखं
काही नसून असल्यासारखं
सारं असून नसल्यासारखन
भिकारी असूनही... राजासारखं

शेवटी वाटतं जगावं... आपल्याचसारखं
शरीर इथे.. अं मन कुठे
आपण आले राहून सुद्धा
जाउ शकतो पाहिजे तिथे..

संकल्प...

आत्तापर्यंत वागलो तसं...
पुन्हा कधीही वागायचं नाही..
आत्तापर्यंत जगलो तसं...
पुढचं आयुष्य जगायचं नाही..

फक्त पुढेच चालत जायचं..
मागे वळून पाहायचं नाही...
नव्या शिखरांवर आरूढ व्हायचं
एकाच ठिकाणी रमायचं नाही..

नवी स्वप्ने नवा ध्यास...
रोज गाठायचं नवं आकाश..
उंच हवेतला मोकळा श्वास
धरतीकडे पाहताना ठिपक्याचा भास..

इतकं उंच उडत असताना
एक मात्र विसरायचं नाही...
कितीही यश मिळालं तरी..
माणूसपण सोडायचं नाही...

स्वप्न ... मनातल्या साठवणींचे....

असाच एकांती बसलो होतो..
थोडासा विचार करत...
कसला?? ठाऊक नाही...
पण विचार करत होतो खरा...
आणि अचानक एक वार्याची झुळुक आली..
झुलुकेसोबत सुगंध आला..
भिजल्या मातीचा.. मंद सुगंध...
आणि डोळ्यासमोरचे दृष्य बघता बघता पालटले..
अचानक ढग भरून आले..
अचानक नभ काळे झाले..
त्यातून वीजा कडाडू लागल्या...
अन् पाण्याच्या धारा कोसलल्या..
अश्या.. जणू सारी धरतीच त्यांनी व्यापून टाकिली..
आणि तितक्यात अचानक कुठून तरी एक मोठी नदी वाहत आली..
अगदी माझ्या जवळ... जवळ..
आणि मी ही वाहू लागलो त्या जलधारांमध्ये..
अगदी दूर दूर जाउन पोहोचलो.. समुद्रापर्यंत..
आणि अचानक कोणी हाक मारीली.. काय रे.. असा एकटाच का बसलायेस??
तेव्हा आलो भानावर.. आणि समजले...
तो पाउस.. ती नदी.. तो समुद्र.. सारे सारे विश्व.. आठवणींचे होते..
ते सारे स्वप्न माझ्या मनातल्या साठवणींचे होते..

आयुष्यात माझ्या परत ये...

एक सांगू?
तू जरी नाही बोललिस ना...
तरी डोळे मात्र बोलतात तुझे..
ओठी तुझ्या काहीही असलं..
तरी मनात मात्र विचार माझे..

कळतंच नाहीए मला..
तू अशी का वागतियेस..
काहीच कारण नसताना..
स्वतःलाच का त्रास देतियेस?

सारी दुनिया झूठ असेल..
तुझं प्रेम झूठ नाही..
माझ्याशिवाय तुझ्या मनात..
कोणी असणं शक्यच नाही..

मनातली गोष्ट करायला
दुनियेची भीती हवीच कशाला?
दुनियेलाच जर गरज नसेल..
तर आपल्याला त्यांची गरज कशाला?

पुन्हा पुन्हा विनवतोय मी
आयुष्यात माझ्या परत ये...
पूर्वीचं सारं विसरून जा..
आणि माझ्या कवेत ये...

(एक जुनी कविता... ती त्याला सोडून गेलेली असताना त्याने तिची केलेली विनवणी.. )

मी.... केवळ.. निमित्तमात्र...

शब्दांना व्यक्त व्हायचं असतं...
कुठंतरी... कुणाच्या तरी निमित्ताने...
मग ते निघतात...
अश्याच कोण्या निमित्ताच्या शोधात..
खूप शोध घेतात सारे मिळून..
आणि खूप विचारही करतात...
व्यक्त होण्याआधी...
कारण, व्यक्त होताना
जर त्यांच्या मनीचा खरा अर्थ...
व्यक्त करणार्‍यालाच समजला नाही.. तर?
म्हणून मग आधी ते
एक सफर करून येतात..
आणि मग कोण्या एकाला निवडतात...
निमित्त म्हणून...
असेच काहीसे शब्द मला शोधत येतात...
मग अगदी त्यांना हवे तसे व्यक्त होतात..
कवितेतून... चारोळीतून...
किंवा आणखी वेगळ्या रूपातून...
तेव्हा... जादू आहे ती या शब्दांची...
मी.... केवळ.. निमित्तमात्र...
सुर्या उगवला.. पश्चिमेला..
नि ध्रुवाने सोडीली जागा.
आली ती जन्मानन्तर भेटीला..
जणू सापडला स्वर्गसुखाचा धागा...

अश्याच काहीश्या प्रयत्नांनी..

सुरुवातीला होते अडचण..
शब्दरचना करताना...
खूप कष्ट घ्यावे लागतात
शब्दांचे यमक जुळवताना...

कधी कधी जमते सारे..
कधी फजितिही होते...
अश्याच काहीश्या प्रयत्नांनी..
मग कविता लिहीणे जमू लागते..

शब्दांनाही जाणवते मग
आपल्या मनी भाव आहे...
कधी आज कधी उद्या..
तर कधी.. आठवणींचा गाव आहे..

शब्दच मग येऊ लागतात
सदैव आपल्या मदतीला...
पाहता पाहता सजवून जातात
आपल्या मनीच्या कवितेला...

गुरुवार, ११ फेब्रुवारी, २०१०

सगळ्यांनी प्रयत्न केल्याबिगर...

आली निवडणूक पुन्ह्यांदा...
आणखी एक सुट्टी मिळणार हाय...
माझ्या लेकरा-बाळाला घेऊन
मी सहलीला जाणार हाय...

उभ्या असलेल्या उमेदवारांमधी..
कोणीच निवडायच्या लायकीचा न्हाय
आणि म्हणूनच मला यावेळी बी..
मतदानाला जायचं न्हाय...

असाच विचार करून
निम्म मतदानबी होणार न्हाय
अन्.. शंभरातल्या ७० ला नको असूनबी...
एक उमेदवार निवडून येणार हाय...

एक एक मत विकत घ्यायला
त्यानं बक्कळ पैसा खर्च केलेला हाय..
आणि म्हणूनच तो बिनपैशाची
कोणाचीच कामं करणार न्हाय...

म्हणून सांगतो मंडळी..
मतदान करणं गरजेचं हाय..
कारण, सगळ्यांनी प्रयत्न केल्याबिगर...
"INDIA"चा भारत होणार न्हाय...

हे.. असेच चालायचे..

शब्दाला शब्द जोडायचा...
अन् एखादी सुंदर कविता करायची..
माझ्या मनात काही असायचे..
समोरच्यानं मात्र भलतीच समजायची...

मी म्हणायचं...
'ती आली... भेटली...
अन् माझ्या मिठीत शिरली.. '
माझा विचार इथेच थांबायचा...
ऐकनार्‍याचा मात्र..
नेमका इथेच सुरू व्हायचा...

म्हणूनच वाटते कधी
कविता करायलाच नको..
मी काही लिहायला नको
आणि कोणी काही समजायला नको..

पण तेवढ्यात 'तिने' म्हणायचं...
"कर ना एखादी छानशी कविता..."
अन् मी पुन्हा सुरू व्हायचे ...
लिहायला लागायचे...
हे.. असेच चालायचे...

गुरुवार, ४ फेब्रुवारी, २०१०

पण... राया आधी...

काल बाजारी नजर भिडवूनि
केला तुम्ही मला इशारा
मनात भरता वचन दिले मी..
देईन तुम्हा मी ताबा सारा...
आज पौर्णिमा वचनपुर्तीची
घ्या तुमचा लवाजमा
पण... राया आधी... दार जरा लावून घ्या...


विसरूनी जाल भान तुम्ही
पाहुनिया एकदा..
डेरेदार घट, नाजूक काया
काळ्याभोर केशलता
खजिना आहे किमती माझा...
जपून थोडा लुटा..
पण.. राया आधी.. दार जरा लावून घ्या...

बुधवार, ३ फेब्रुवारी, २०१०

तिच्याच रूपाने....

तिच्या ओठांचा गोडवा असा..
की मधुही मज कटू वाटे...
तिच्या हास्याची खळखळ...
जणू अम्बरि घन साचे...

थेंब गालावरूनी जेव्हा
जातो तिच्या ओघळतो..
त्याच्या नशिबाला पाहून..
जीव माझा जळतो...

तिच्या सौंदर्याच्या कडा
अप्सरेलाही लाजविति...
पावलेही नाजूक अशी
स्पर्शाने मेघात वीज नाचविती...

पाउस येतो जेव्हा, वाटे .
सौंदर्यच जणू बरसे तिचे...
तिच्याच रूपाने जणू
खुलते रूप या धरतीचे...
 हारे तो हम तब थे
जब पहली नजर मिली ती उनसे..
अब तो बस यहि उम्मिद लिये बैठे हैं
के उनको जीत ले हम.... जमानेसे
दिल में एक हलचल सी होती
कुछ ख्वाब लब्जोमें सिमट जाते हैं..
बस.. हम उन लब्जोको लिखते राहते हैं..
और कारवा बन जाता हैं...
उन्होने यु कह दिया के तुम बडे प्यारे हो..
के जान निकल के हाथो में आ गायी हमारी...
बस एक प्यारे लब्ज से यु घायल हुए हम
के हमने हमारी जान उन्हे नजर कर दी..
वो पुछते हैं.. बताओ आपको
हमारे दिल का हाल पता भी हैं..?
और हम के बस उनके दिल की
हर धडकन को याद रखते हैं..
यु अदाए दिखाती हैं वो
के कयामत आ जाए..
दिल चाहता हैं, देखतेही रहे उनको..
फिर चाहे पुरी दुनिया डूब जाए...

मंगळवार, २ फेब्रुवारी, २०१०

उसके होठो में वो नशा हैं
के हर जाम फिका लगता हैं..
एकबार बस उनको छुने का
हर अंजाम फिका लगता हैं..

नजरें तो यु कातील हैं उसकी...
के कत्ल-ए-आम फिका लगता हैं..
बस एक बार मिल जाए जो नजर
मार जाना भी फिका लगता हैं..
नीडरपणा केवळ बोलळ्यातच नसतो.
कधी तो डोळे भिडवण्यातही असतो..
प्रत्येकवेळी बोलायलाच हवे असे नाही..
कधी नजरेतला इशाराही ओळखायचा असतो...
सुर्या उगवला.. पश्चिमेला..
नि ध्रुवाने सोडीली जागा.
आली ती जन्मानन्तर भेटीला..
जणू सापडला स्वर्गसुखाचा धागा...

अचानकच....

मला कधीच वाटलं नव्हतं...
कोणी माझ्या आयुष्यात येईल...
... अचानकच तू आलीस...
माझं सारं जग व्यापून गेलीस...
अक्षरशः माझ्यावर राज्य केलंस
आणि तशीच निघूनही गेलीस...
तू आलीस अन् सारं काही
अचानकच होऊ लागलं...
अचानकच तू माझी झालिस,
अचानकच मी बदलू लागलो..
अचानकच लोक म्हणू लागले..
अचानकच मी सुधारू लागलो..
तू आलीस तेव्हा वाटलं नव्हतं...
अशीच अचानक निघून जाशील...
उंच आभाळात नेऊन मला
अचानकच सोडून देशील..
अशा तुझ्या वागण्यानं मला
अचानकपणाची सवय झालीये...
तू अचानक परत येण्याची
पुन्हा मला ओढ लागलीये...

शब्दांचीच कविता होते...

शब्दांचीच कविता होते..
कवितेचे गाणे होते...
आणि एकदा गाणे झाले की ..
सतत.. भावांच्या गावी..
जाणे येणे होते..

भाव मनी दाटता. .
शब्दरूपाने बरसात येतो..
स्वर लाभता तयाला..
भाव नव्याने बरसतो ..
मनास सार्‍या भिजवून जातो
गावी स्वप्नाच्या घेऊन जातो..

म्हणून लिहिली मी कविता....

रंग... कसे दिसतात? कसे दिसणार मला?
डोळे कसे.. दिपतात? कसे... ते कसे कळणार मला?
पण जाणवते मज.. हळूवार झुळुक...
ऐकू येतो मज.. थेंब.. टूपुक...
समजते मला.. वार्याची भाषा
कळतात मज कोकिलेचे सूर.. न
पावसाची आशा..
म्हणून लिहिली मी कविता जाणीवेवर..
मात करून माझ्या.. अंधारावर..

सोमवार, १ फेब्रुवारी, २०१०

एक भेट.....

खूप काही विचारायचंय
खूप काही बोलायचंय...
सांग बरं कधी भेटशील?

तुला काही सांगायचंय...
माझ्याबद्दल... तुझ्यबद्दल...
एकूणच सार्‍या जगाबाद्दल..

माझा गुन्हा जाणून घ्यायचाय...
तुझी चुक दाखवून द्यायचीये..
आजवर तू जे जे केलंस...
त्याबद्दल तुझी हजेरी घ्यायचीये..

सांग बरं... कुठे भेटशील?
देवळात...? नको तिथे गर्दी असते...
डोंगरावर?.. नको तिथे थंडी असते..
असं कर... तू स्वप्नात ये...
मला तुझ्या सोबत ने..

तुझं म्हणणं मला सांग...
माझं म्हणणं ऐकून घे.. .
मलाही थोडे प्रश्न विचार
नि माझ्याही प्रश्नांची उत्तरे दे..

खरंच देवा.. सांग कधी येशील स्वप्नात?
एकदा यायला हरकत नाही..
तसा.. सततच आहेस की..
माझ्या मनात...

... आणखी एक रात्र....

तिची आठवण तर येते खूप..
वाटते आत्ता जाउन भेटावे...
पण उगाच ती झोपलि असेल..
स्वप्नांच्या दुनियेत रमलि असेल.. तर?
का तिला.. उठवावे?
पण मग हळूच मी तिच्या स्वप्नात शिरतो..
उगाच..
तिची खोडी काढायला..
ती मस्त चांदण्यात फिरत असताना
मी तसाच तिला निरखत राहतो..
ती इतकी सुंदर भासु लागते..
की मी खोडीसुद्धा विसरतो..
असाच तिला बघत असताना
अचानक ती समोर येते..
म्हणते...
"ए वेड्या... उठ की आता..
सकाळ झाली बघ...
कुठल्या स्वप्नात रमलायेस असा..?"
उठून पाहतो तर...
खरेच सकाळ झालेली असते...
आणखी एक रात्र तिच्या स्वप्नात संपलेली असते...

हवी आहेत माणसे...

हवी आहेत माणसे...
मन असलेली...
गर्दीच्या नि गडबडीच्या या दुनियेत...
दर्दि असलेली....
हवीयेत माणसे ज्यांना समजते
समोरच्याच्या मनातली भाषा...
ज्यांना कळते दुख नि दिसते
प्रत्येक क्षणात नवी आशा...
हवी आहेत माणसे...
ज्यांना केवळ यांत्रीक जगणे जमत नाही..
ज्यांना हवे असते काहीतरी नवे...
ज्यांना एका जागी गुंतून राहणे कधीच पटत नाही..
अशी माणसे.. मिळतील का कुठे?
असतील तर सांगा पत्ता....
आपल्या मनाचा...
तिथे बोलावून त्यांना अगदी जपून ठेवा...
कारण, अशी माणसे जेव्हा भेटतात...
तेव्हा.... जीवन खर्या अर्थाने सुरू होते...

शनिवार, ३० जानेवारी, २०१०

समुद्र.... कसा?

समुद्र.... कसा?
............असा की... तसा?
समुद्र.... कधी शांत... कशी रागीट...
............कधी अस्ताव्यस्त... कधी नीट...
............कधी धीरोदत्त.... कधी उतावळा....
............कधी निळा... कधी सावळा...
............कधी उद्धट... कधी प्रेमळ...
............कधी गहिरा... कधी नितळ...
............कधी आनंदी... कधी रुसवा..
............कधी सरळ... कधी फसवा...
............कधी राजा... कधी वैरागी...
............कधी भाग्यवंत... कधी अभागी...
............कधी साधक... कधी बाधक...
............कधी ओंगळ... कधी मादक...
............कधी शहाणा... कधी वेडा...
............कधी संपूर्णच... कधी थोडा...

एकदा भेटली मला... माझीच एक कविता...

एकदा भेटली मला...
माझीच एक कविता...
म्हणाली.... किती दुष्ट आहेस रे तू?
प्रत्येकवेळी मला तिच्या हवाली करतोस...
तिचे मन जिंकतोस आणि तिलाच मिठीत घेतोस...

म्हटले.... मला नाही समजले...
कविता तिच्यासाठीच तर होती ना?
मग तिलाच देणार ना?

तर म्हणते कशी....
इतक्यावेळा तू माझ्या मदतीने
तिला खुश केलंस...
प्रत्येकवेळी मी ही जाउन..
तुझ्या मनातलं सारं...
मी तिच्यासमोर व्यक्त केलं...
आणि त्याच मनातल्या गोष्टींनी..
तिनेही तुला आपलंसं केलं...

हे सारे होण्यासाठी तू मला किती सजवलंस...
प्रत्येकवेळी मला एक नवं नि सुंदर रूप दिलंस...

पण.... प्रेम मात्र फक्त तिच्यावरच केलंस...

..... म्हणून... दुसरे काय...?

कविता वाचून ती म्हणाली..
किती किती भारी ते शब्द..
मी म्हटले..
भारी नाही.. इथलेच आहेत..
आपल्याच आसपासचे..अगदी रोजचे..
मी थोडे धुवून साफ करून घेतले..
व्यवस्थित कवितेच्या मांडणीत लावले..
म्हणून ते सुरेख दिसताहेत.. दुसरे काय...

शुक्रवार, २२ जानेवारी, २०१०

... पुन्हा एकदा पहाट होते..

थोडीशी ही रात्र वेडी
थोडासा तो चंद्र वेडा
आणि 'तिच्या' प्रेमात
थोडासा मीही वेडा

रात्रीच्या त्या चांदण्यात
नागमोडी पायवाट
चंदेरी किरणांत
न्हायलि झाडी घनदाट

नदीच्या काठावर
नक्षीदार घाटावर
राटराणीचा मंद सुगंध
झुलुकेनीशी वार्‍यावर

अशात 'तिची' आठवण येते
अन् रात्र पूर्ण चंदेरी होते
आणि 'तिच्या' आठवणीतच
पुन्हा एकदा पहाट होते...

गुरुवार, २१ जानेवारी, २०१०

असावं... कुणीतरी आपलंसं...

प्रत्येकालाच वाटतं असतं
असावं कुणीतरी आपलंसं

आपल्याला काही सांगणारं
आपलं सारं ऐकनारं
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
आपली साथ देणारं

प्रत्येकाला असं कुणी
भेटतंच असं नाही
भेटलं तरी त्याचं सारं
पटतंच असं नाही

कधी वाटतं त्याने आपला
प्रत्येक हट्ट पुरवावा
खूप काही करूनसुद्धा
मागू नये परतावा

कधी होते जाणीव
केलंय त्यानं बरंच काही
मग मात्र आपण त्ययला
देऊ पाहतो सारं काही

असं कुणी भेटलं ना
की जीवनास येतो अर्थ
कारण, प्रत्येकवेळी एकमेकांचा
विश्वास ठरतो सार्थ...

कुणालाच कसं कळत नाही..

कुणालाच कसं कळत नाही..
कुणीच कसं ऐकत नाही..
 हे असं का होतंय
हे मात्र समजत नाही..

या आधीही होतेच की सगळे..
(अन् कदाचित..)... यानंतरही असतील सगळे..
पण मग आजच काय झालय यांना?

आजच तर खरी गरज यांची
आजच तर हवीय मदत यांची..
उद्या नाही मागणार काही
यापूर्वीही मागितलं नाही..

उलट, सतत यांचे लाड पुरवले..
तेव्हा सगळ्यांनी मित्र म्हणवले..
मग स्वतःवर वेळ आल्यावर
यांना त्याची आठवण का येत नाही?

नाही तुमची मदत मिळाली
तरी.. लढू शकतो स्वतः ही
एकटाच उभा राहीन
अं सहन करेन सारं काही.

पण... आजपर्यंत ज्यांना 'आपलं' म्हटलं,
आजपर्यंत ज्यांना जवळ केलं...
त्यांच्यालेखी मी... कोणीच का नाही??

चिडली.. की ती इतकी चीडते..

चिडली.. की ती इतकी चीडते..
जणू जन्माचे नाते तुटावे..
पण.. मला मात्र माहीत असते..
हा राग लाडीक आहे..
कधी जणू ती निघूनच जाते..
कधी कधी तर मौनही धरते..
तरीही जाणीव आहे माजला..
प्रीत ती माझ्यावरतीच करते..

कविता करायला म्हणे


कविता करायला म्हणे काही खास लागते...
शब्द, भाव आणि मनात कोणाची ओढ लागते..
यमक फक्त जुळले की चालत नाही..
नुसते भाव व्यक्त करूनही चालत नाही..
त्यात असावे लागते प्रेम.. कोणावारही..
अगदी कोणावारही..
त्याच प्रेमाटून येतात भाव.. सापडतात शब्द..
जुळतात यमकं आणि मग होते त्याची कविता..
पाहता डोळ्यात तिच्या
सार विश्व दिसे मला..
नेत्रकडा तिची असे
जणू चंद्राची कला


ओठ भासती तिचे
जणू दाणे डाळिंबाचे
स्पर्शाने केवळ त्यांच्या
मज ओठी मधु साचे

गाल तिचे, जणू...
गुलाबी पाकळ्याच त्या
स्पर्शल्या त्यांना तिच्या
अंगूल्याही लाजलेल्या

अश्या रूपातून त्या
जेव्हा "इश्य्य" ऐकू येते...
रोमांच येतो अंगी
मन मोहरून जाते...

वाटे लुटावी सारी
दौलत जगिचि तिच्यावरी
तरीही राहील आणखी
काही लुटायाची इच्छा उरी..

बुधवार, २० जानेवारी, २०१०

कवितांच्या मैफलीत माझ्या

 कवितांच्या मैफलीत माझ्या
केवळ प्रेम स्वप्नेच नव्हती..
होते थोडे दुःखही विरहाचे
थोडी वास्तवताही होती...

नव्हत्या केवळ आणाभाका
किंवा  नव्हत्या केवळ राती...
होत्या मातितल्या भेगा
अन् होती काही नाती...

मैफल होती परिपूर्ण परि..
ऐकण्यास कोणी नव्हते...
मी नि कविता दोघे संपलो.. परि..
पाहण्यास कोणी नव्हते...
_____________ViNnY_____

मंगळवार, १९ जानेवारी, २०१०

तजेलदार चहा

तजेलदार चहा प्यायची तल्लफ आली आणि सकाळी सकाळी बाहेर पडलो....
बाहेर पडताच लक्षात आले, "आज थंडी वाढलीय बरं!".
एवढंच फक्त मी आमच्या हिला म्हटलो.. बाहेर पडता पडता... तर म्हटली... "थांबा जरा"...
विचारले तिला.. "काय गो अचानक थांबा म्हटलीस ते?"
तेवढ्यात आत जाउन पटकन तिने स्वेटर आणला आणि माझ्या हातात दिला...
म्हणाली, "स्वेटर घालून जा... उगाच सर्दि व्हायची नाहीतर... "
तिला म्हटले.. "अगो वेडे मी आजवर कधी स्वेटर वापरलाय का?"
तर म्हणते कशी, "अहो, पण घाला आता... आपलं वय झालंय.. पूर्वीसारखी तब्येत साथ द्यायची नाही हो..." तरीही हट्ट करून मी स्वेटर ना घेता तसाच बाहेर पडलो...
घरासमोरच असलेल्या सोसायटीच्या बागेत थोडावेळ बसून मग पुढे जऔ असे काहीसे वाटले आणि सरळ बागेत शिरलो... बागेत जाताच जाणीव झाली.. हवेतल्या धुक्याने केलेल्या जादूची...
गवताच्या प्रत्येक पानावर त्याने एक एक थेंब जणू अगदी अलगद ठेवून दिला होता...
 स्पर्श होताच ते दवबिंदू अगदी अंगाशी सलगी करून, हळूच ओघलून खालच्या गवतात पुन्हा मिसळून जात होते. आणि एक सुखद गारवा अगदी नसा-नसात भिनवत होते. मग काय.. चप्पल काढून हातात घेतली आणि तसाच अनवानि चालू लागलो.
हलू हलू गारवा वाढत होता. थोडीफार थंडी बोचू लागली. तरीही मी तसाच पुढे चालत होतो...
बागीचा संपला आणि पुढे रस्त्यावरची टपरी दिसली. परंतु, मला मात्र आता रस्थयापलीकडाची टेकडी खुणावत होती. धुक्याची चादर लपेटून अंगावरच्या हिरव्यागार वनराईमुळे सुखावलेली...
परत येताना चहा घेऊ म्हणून सरळ टेकडीवर चढून गेलो. आज वारा काय मस्त सुटला होता..
त्यातून ही मस्त धुक्याची चादर... काय सुंदर वातावरण आहे. पण आजचा वारा काही वेगळाच..
पुर्वी मी अश्या वार्यात तासन्-तास बसून राहायचो.. पण आज काही हा मला सोसवत नव्हता..
म्हणून काहीश्या अनीच्छेनेच मी घराकडे परतु लागलो.. येताना कोणत्यातरी विचारात इतका गुंग झालो..
की सरळ दारात येऊन थांबलो... बेल वाजवतच होतो, तेवढ्यात एक शिंक आली..
झाले... शिंक आली.. आणि मागून आमची ही आली... "काय हो आलात? आत्ताच झाडांना पाणी घातले.. आणि हे काय? शिन्कताय? तरी सांगितले होते तुम्हाला.. स्वेटर घेऊन जा.. पण ऐकनार नाही... चला आत... एक चहा करून देते आल्याचा... तो घ्या आणि झोपा शांत.. बरं वाटेल जरा..."
     मग काय बसलो वाट बघत चहाची... चहा घेतला आणि स्वेटर घालून गॅलेरीत येऊन बसलो...
तेवढ्यात आमचे शेजारी बागेतून येता येता म्हटले... "काय हो, आज गॅलेरी? काय करताय?"

"काही नाही... तजेलदार चहा पितोय... आमच्या हिच्या हातचा..."

अशी ती.... माझी आई...

ती...
जिने मला जन्म दिला...
जिणे या जन्मातील प्रत्येक क्षणाला
एक नवा अर्थ दिला..
या धरेवर पहिले पाउल टाकण्याचा अनुभव दिला..
आणि त्याहूनही... पुढे प्रत्येक पावलावर...
काहीतरी नवीन शिकण्याचा छन्द दिला...

ती...
जिच्याशिवाय मी अधुरा...
जिच्या केवळ उल्लेखानेही...
जगातील... प्रत्येक जन्म होतो पुरा..
जिने या आयुष्याच्या प्रत्येक क्षणात काही दिले..
आणि इतके देऊनही कधी...
काहीच न मागितले...
अशी ती....
माझी आई...

पुन्हा ती....

पुन्हा.... "ती"च...

आता तुम्ही म्हणाल ही "ती" पुन्हा कशी?
आधीच स्पष्ट करतो... ही "ती" म्हणजे मला सोडून गेलेली नाही..
ही तर "ती".. जिला माझ्या बद्दल सारे काही माहीत असताना जिणे मला स्वीकारले... मला समजून घेतले, आणि माझा भूतकाळ पूर्णपणे माहीत असूनही माझ्यासोबतच आयुष्य काढायचे ठरवले... ती....



ती...
जिने मला सावरले..
जिने मला पुन्हा एकदा आयुष्य जगायला शिकवले..
जिने पुन्हा एकदा माझ्या पंखात बळ दिले...

ती...
जिला नेमके ठाऊक होते...
माझ्या भूतकाळात नक्की काय दडलंय...
त्यातूनही तिला नेमकं काही असं सापडलंय...
ज्यामुळे मला नेमका मार्ग मिळाला..
आयुष्य पुढे नेण्यासाठी...
जिने प्रत्येक पावलावर काही असे दिले...
ज्याने मला काही क्षण दिले...
आयुष्यभर जपून ठेवण्यासाठी...

ती...
तीच तर आहे आता माझे भविष्य...
तीच तर आहे माझे सारे आयुष्य...
केवळ तिच्यासाठीच प्रत्येक गोष्ट करावीशी वाटते...
ती रूसळी.. वा समोर जरी नसली...
तरीही मनी भीती दाटते...
ती... मला सोडून जाण्याची..
अगदी खात्री असूनही... की ती जाणार नाही..
कधीच....

ती...

ती...
कधी तिच्यासाठी मी अनेक कविता केल्या..
कधी तिच्यासाठी संपूर्ण आयुष्यही देण्याची तयारी केली..
कधी तिच्यासाठी संपूर्ण जगाशी वैर घेण्याचीही उर्मि दाखवली..
ती...
अगदी माझा श्वास.. तो थांबला
तर जणू माझे जीवनच संपून जाईल
अशी भीती वाटायची .. अशी.. ती..
ती...
जिच्यामुळे आयुष्याला एक वेगळेच वळण लागले..
जिच्यामुळे एक नाइव जीवनच जणू लाभले..
जिच्या केवळ एका होकारानेच प्रत्येक गोष्टीतले सुख मिळाले..

ती...

तिने खरेच माझे जीवन संपूर्ण बदलले..
ती नाहीए आता माझ्यासोबत..
परंतु अजूनही एक जाणीव आहे खोल कुठेतरी अंतर्मनात..
की तिच्यामुळेच केवळ मी आज जीवनात खूप काही करू शकलो.
तीच खर्या अर्थाने आजच्या "मी"ची खरी शिल्पकार...
सत्ता मिळवण्यात जेव्हा
गुणवत्ता कमी पडते
त्या प्रत्येकवेळी.. लोकशाही हरते..
केवळ पैसा नि सत्तेच्या जोरावर
जेव्हा राजकारणाची दिशा ठरते..
तेव्हा ही लोकशाही
पुन्हा एकदा मरते..
अशीच असते का लोकशाही..?
हरणारी नि मरणारी?
इतकी रोज मरूनसुद्धा
कशीबशी जगणारी?
असे वाटत असतानाच
कधी लोकशाही पेटूनही उठाते
आणि तेव्हा मात्र
सार्‍या सत्ताधार्यांची बोबडी वळते..
कारण, त्यांना ठाऊक असते..
लोकशाही काय चीज आहे..
प्रलयनकारी पाउस किंवा
कदादणारी वीज आहे...
म्हणून तर या लोकशाहीला
कोणी डोके काढू देत नाही..
कारण, तसे केल्याशिवाय जनता..
राजकारण्यांना भीत नाही...
थंडी इतकी वाढलीये
की सारी शाईच गोठून गेलिये...
मनातली प्रत्येक संवेदनाही जणू...
या थंडीने गारठून गेलिये..

म्हणूंच बहुदा यायला तिला
झाला असावा उशीर...
पण काय करू.. थंडीच इतकी..
आता धरवत नाहीए धीर...

तिच्या येण्यानेच बहुदा आता
निसर्गात बहार येईल...
तिच्या येण्यानेच बहुदा आता..
मिठी माझी उबदार होईल....
प्रेमात तर असतोच माणूस आयुष्यभर...
आकांत बुडालेला..
कधी तो आईच्या पदराच्या...
कधी नवे चमचमीत मागणार्‍या आपल्याच उदराच्या..
कधी धुंध करणार्‍या मदिरेच्या
कधी क्षुब्ध होऊन रुधिराच्या...

प्रेमात पाडतोच मनुष्य..
अगदी रोज..
कोणाच्या ना कोणाच्या,
इतकेच की ते कधी टिकते क्षणापुरते..
कधी त्याला आयुष्यही न पुरते...

प्रेम करतोच प्रत्येकजण..
कधी सजीवावर... निर्जिवावर...
कधी या सार्‍याच निसर्गावर...

प्रेम कधी चुकत नाही बरे...
कोणालाच...
आणि ते मिळतही नाही सहसा.... प्रत्येकालाच...

कारण, प्रेमात पडल्यावर
त्याची जाणीव व्हायला हवी..
आणि ती व्हायला... आपण..
आपल्याच मनाला.. जरा.. मोकळीक द्यायला हवी...

प्रेम? हे काय असतं?

प्रेम? हे काय असतं?
मला नाही ठाऊक..
मला इतकाच माहीत...
की ती नसताना माझा जीव का जाणे.. व्याकुळ होतो..
तिच्या एका नजरेसाठी...
मी अगदीच अगतिक होतो...
कधी ती समोर असते, तेव्हा अगदी
हरवून जातो...
कोणास ठाऊक कोण्या आसमन्तात भटकत असतो..
तिच्या केवळ येण्यानेच जणू
सारी सृष्टी बदलून जाते...
प्रत्येकवेळी काही नवी दृष्टी देऊन जाते..
असाच मग मी काही बाही लिहीत राहतो
तिच्यासाठी...
ती नसताना आठवत राहतो.. आमच्या भेटीगाठी..

यालाच प्रेम म्हणत असतील,
तर मला ठाऊक नाही..
एक मात्र खरं...
तिच्याशिवाय माझी कल्पना...
मलातरी करवत नाही..

सोमवार, ४ जानेवारी, २०१०

एकदा का मनाला पंख फुटले
की ते उडायला लागतं...
अगदी कल्पनेच्या जगातल्या
कोणत्याही कोपर्‍यात नेऊन
आपल्याला सोडायला लागतं..
आणि मग तेथून परत येताना
तेच काही शब्द देऊन जातं...
प्रत्येक शब्द बसू शकेल अशी
एक छानशी यमकाची पेटी देऊन जातं..
आपण फक्त प्रत्येक शब्द
त्या त्या चौकटीत बसवयचा..
की त्याची होते एक सुंदरशी कविता...
जरा जग फिरवून आणतो तुला...
मग सांगतो.. तुझ्या कोणत्या अदेला नक्की भुललोय ते...
म्हणजे बघ तो ताज महालसुद्धा
तुझ्या रंगासमोर कसा सावळा दिसू लागलाय...
आणि तुझ्या चरित्र्याच्या उंचीसमोर
तो आयफेल टॉवरही कसाखुजा वाटू लागलाय...
तुझ्या हास्याच्या खळखळाटासमोर
तो नायगारा फॉलही कशा अगदीच चीडीचूप राहतो...
तुझ्या नजरेच्या तेजाने
अगदी सार्‍या जगातील तारेच जणू किलकिलु लागलेत..
तुझ्या कल्पनेच्या उडी पुढे
चीनच्या भिंतीचे अंतरही अगदी नगण्य वाटू लागले आहे..
आता तूच सांग कोणती आहे अशी तुझी अदा..
ज्यावर मी भूलू शकत नाही?
तुला तरी सापडतय का काही?
पहाटेची हूडहूड, वार्याची मंद गती...


विझलेल्या शेकोट्या नि भिजलेली माती..

दवाचे मोती... धुक्याची चादर...

चुलीची उब किंवा आईचा पदर....

हळूच उघडणारे किलकिले दार...

हौशी पहिलवानांनी भरलेला पार...

कौलातल्या झरोक्यातून येणारा

उन्हाचा इवलासा कवडसा..

घरातल्या नव्या जोडप्याने

शोधलेला आडोसा..

मध्येच येणार्‍या झुलुकेने

तिच्या सर्वांगावरचा शहारा...

त्यातून वाचण्यासाठी

त्याच्या मिठीचा पहारा...

गुलाबी थंडीत सृष्टीचा न्यारा रंग

तेवढ्याच गुलाबी प्रेमात तेही दोघे दंग....