बुधवार, १५ जून, २०११

कदाचित.. .आता प्रवाहच उल्टा झालाय...
मी समजत होतो..
की सगळे येतील माझ्यासोबत..
चांगल्या गोष्टींसाठी मिळेल चांगली नौबत..
पण असे काहीच झाले नाही..
कारण मी प्रवाहाच्या विरुद्ध जाउ पहात होतो..
कोणालाच नकोय इथे शिवरायांच्या गोष्टी..
कोणालाच नकोय शंभू-शाहूशी दोस्ती..
हवाय फक्त प्रत्येकाला वेळ..
घालवण्यासाठी...
नकोय कोणालाच तो..
काही करून दाखवण्यासाठी..
कारण, प्रत्येकाचे आयुष्य
बिज़ी होत चाललाय..
प्रत्येकाचे मन
विरंगुळ्यासाठी क्रेझी झालेय..
सांगितले कुणा जर आठव तुझा इतिहास..
तर उत्तर मिळते..
वेळ नाहीए... बंद कर बकवास..
पण इतके करूनही
प्रत्येकाला शिवबाची ओळख हवी..
का ते माहीत नाही..
असे का होतेय काहीच कळत नाही..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा