मंगळवार, १० नोव्हेंबर, २००९

आठवण आपल्या गावाची..

कधी कधी यायलाच हवी
आठवण आपल्या गावाची..
पारावरच्या हनुमंताची नि
देवळातल्या महादेवाची
शहरात करताना चाकरी...
दिसावे डोळ्यासमोर ते कौलारू घर..
जिथे मिळायची चटणी-भाकरी
विनवायची आजी जेवून घे लौकर..
कालवा, नदी, आणि कधी तलाव तो..
भरायचा संध्याकाळी सवंगड्यांनी...
दणानून जायचा परिसर
एकमेकांच्या हाका - आरोळ्यानी
आठवावी शाळा चाळवजा ती
जिथे खाल्ली होती कधी छडी
आठवावी कधी पळून जाताना
खिडकीतून घेतलेली उडी..
कधी आठवावी एखादी
सखी लहानपणीची..
आठवावी भाण्डणे ती लुटूपुटूची
अन्... आठवावी छुपी भेट आपली नि तिची..
आठवावी हाक आईची...
ताईची.. सवंगड्यांची.. गाव सोडतानाची...
अशानेच राहते ओढ कायम...
आपल्या मायभूमीची...

रविवार, १ नोव्हेंबर, २००९

ती म्हणे माझ्यावर ५० कविता कर....

ती म्हणे माझ्यावर ५० कविता कर....
आणि मस्तपैकी त्या सजवून मला भेट कर...
कवितेचा विषय काहीही असो,
मी त्याच्यात दिसायला हवी....
प्रत्येक कवितेत मात्र
उपमा मिळावी अगदी नवी..
एवढे सगळे ऐकल्यावर
मला काहीच सुचेना..
कविता सोडा....
साधी चारोळीही जुळेना..
अहो, का म्हणून काय विचारता...
तीही खूप सुंदर आहे....
शब्दही तसे खूप आहेत...
पण तिचे पुरेपूर वर्णन करायला
सगळे मिळूनही अक्षम आहेत...
यु शबनमी एह्सास था उनके आने से....
के हर साँस महक उठी....
हवाओने फिर कहा जरा रूको...
तुम्हारे सांसो में मिलने से पहले जरा...
मुझेभी मदहोश होने दो इन एहसासोमें...
कॅनव्हास वरचा एखादा रंगाचा फटकाराच
काय तो सारे चित्र बदलून जातो...
तसाच काहीसा एखादा थोडासा वेगळा विचार
मनातील भाव सजवून जातो...
धोंडा म्हणता होतो
पायवाटेवरील अडचण जो...
शेंदुर फासता त्यालाच
येणारा प्रत्येकजण
वाकून नमस्कार करून जातो...

_____________ViNnY_____________