कधी कधी यायलाच हवी
आठवण आपल्या गावाची..
पारावरच्या हनुमंताची नि
देवळातल्या महादेवाची
शहरात करताना चाकरी...
दिसावे डोळ्यासमोर ते कौलारू घर..
जिथे मिळायची चटणी-भाकरी
विनवायची आजी जेवून घे लौकर..
कालवा, नदी, आणि कधी तलाव तो..
भरायचा संध्याकाळी सवंगड्यांनी...
दणानून जायचा परिसर
एकमेकांच्या हाका - आरोळ्यानी
आठवावी शाळा चाळवजा ती
जिथे खाल्ली होती कधी छडी
आठवावी कधी पळून जाताना
खिडकीतून घेतलेली उडी..
कधी आठवावी एखादी
सखी लहानपणीची..
आठवावी भाण्डणे ती लुटूपुटूची
अन्... आठवावी छुपी भेट आपली नि तिची..
आठवावी हाक आईची...
ताईची.. सवंगड्यांची.. गाव सोडतानाची...
अशानेच राहते ओढ कायम...
आपल्या मायभूमीची...
मंगळवार, १० नोव्हेंबर, २००९
रविवार, १ नोव्हेंबर, २००९
ती म्हणे माझ्यावर ५० कविता कर....
ती म्हणे माझ्यावर ५० कविता कर....
आणि मस्तपैकी त्या सजवून मला भेट कर...
कवितेचा विषय काहीही असो,
मी त्याच्यात दिसायला हवी....
प्रत्येक कवितेत मात्र
उपमा मिळावी अगदी नवी..
एवढे सगळे ऐकल्यावर
मला काहीच सुचेना..
कविता सोडा....
साधी चारोळीही जुळेना..
अहो, का म्हणून काय विचारता...
तीही खूप सुंदर आहे....
शब्दही तसे खूप आहेत...
पण तिचे पुरेपूर वर्णन करायला
सगळे मिळूनही अक्षम आहेत...
आणि मस्तपैकी त्या सजवून मला भेट कर...
कवितेचा विषय काहीही असो,
मी त्याच्यात दिसायला हवी....
प्रत्येक कवितेत मात्र
उपमा मिळावी अगदी नवी..
एवढे सगळे ऐकल्यावर
मला काहीच सुचेना..
कविता सोडा....
साधी चारोळीही जुळेना..
अहो, का म्हणून काय विचारता...
तीही खूप सुंदर आहे....
शब्दही तसे खूप आहेत...
पण तिचे पुरेपूर वर्णन करायला
सगळे मिळूनही अक्षम आहेत...
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)