गुरुवार, २० डिसेंबर, २०१२

पुतळ्यांचे राजकारण...


देव... देणारा तो देव... पण तो मूलतः निर्गुण.. निराकार... कारण, ती एक मानसिक शक्ति वाढवणारी चेतना आहे... इतकंच...
ही शक्ति प्रथमपासूनच मानवाला खूप काही देत आलीय.... आणि मानवानेही त्याचा पुरेपूर फायदा करून मानवजातीचा विकास, प्रचार, प्रसार केलाय.. आणि याच सर्व गोष्टींसाठी त्या नैसर्गिक चेतनाशक्तीचे... पर्यायाने देवाचे आभार मानावे म्हणून म्हणून मनुष्याने त्या शक्तिला मूर्त रूप द्यायला सुरूवात केली..

हेच मूर्त रूप म्हणजे मूर्त्या देवाचे (त्या चेतनाशक्तीचे) सगुण साकार रूप मानले गेले.. मग, पुढे ज्या ज्या शक्तींमुळे मानवाला फायदा झाला त्यांचे स्वतःच्या कल्पनाशक्तीनुसार एक एक रूप तयार होऊ लागले.. याच सगुण रूपावर अभिषेक, पूजा असे काही उपचार करून मानवाने पुढे आपली देवांप्रतीची श्रद्धा व्यक्त केली..

पुराणकाळापासून ही प्रथा चालत आली आणि नंतर आपल्याला देणारा तो देव या नात्याने अनेक राजे, महाराजे, युगपुरूष यांची त्यांच्या जिवंतपाणी आणि त्यांच्या मृत्यूनंतर अशीच पूजा बांधण्याची प्रताच पडली.. राम, कृष्ण, शिव, विष्णू, खंडोबा, विट्ठल हे सारे त्याच परंपारेतून आले असावेत (असे मला वाटते).

त्याचबरोबर, संत मंडळींनीसुद्धा या पंक्तीत बर्‍याच प्रमाणात स्थान मिळविले. आणि हळूहळू प्रत्येक समाजात असे युगपुरूष देवाचे प्रातिरूप मानले जाऊ लागले. त्यांची पूजाअर्चा होऊ लागली. शिवरायांनासुद्धा याच पंक्तीत स्थान मिळाले. अर्थात, या सर्वांनी समाजासाठी केलेले कार्य महान होते आणि आहेच, यात काहीही शंका नाही.
आणि याच परंपारेतून पुढे सार्वजनिकरित्या या सर्व 'देवांना' सन्मान मिळावा, म्हणून देवळांची प्रथा पडली असावी. त्याचप्रमाणे युग-पुरुषांसाठी त्यांचे पुतळे, स्मारके बंधने सुरू झाले. आणि हेच पुतळे, स्मारके त्या त्या समाजाच्या अस्मितेची केन्द्र म्हणून उदयास येऊ लागली. याचाच परिणाम म्हणून आज प्रत्येक गावात त्या त्या गावातील मोठ्या व्यक्तिंची, युग-पुरुषांची, नेत्यांची स्मारके, पुतळे बांधले जाऊ लागले.

सुरुवातीला हे प्रमाण कमी होते, पण जसजसे गावांमध्ये 'विकासाचे' वारे वाहू लागले, गावांमध्ये पैसे येऊ लागले तसे पुतळे, स्मारके वाढु लागले आणि त्यांचे आकारसुद्धा. हे पुतळे बांधून आपल्या पूर्वजांचा, महापुरुषांचा, युग-पुरूष / स्त्रियांचा यठोचीत सन्मान होत असल्याची भावना लोकांमध्ये वाढत गेली आणि ती तशीच राहील अशी व्यवस्थाही करण्यात आली.

इथेच राजकारणी लोकांनी बाजी मारली. लोकांची श्रद्धा असलेल्या व्यक्तिंची स्मारके बांधून देणे, हे गावातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील, राज्यातील, देशातील इतर कामे करण्याहून अगदी सोपे काम असते. विकासकामे करण्यात बराच वेळ, पैसा खर्च होतो. अनेक लोकांचे हितसंबंध जपून ती कामे पूर्णत्वास नेणे खूपच जिकीरीचे काम असते. त्यापेक्षा गावाचा एकूण आवाका आणि तिथल्या समाजाचे स्वरूप पाहून एखादे स्मारक करणे सोपे.

त्यातूनही माणूस हा मुख्यतः भावनाप्रधान असतो. कोणत्याही गोष्टीवर मनुष्याची प्रथम प्रतिक्रिया ही नेहमी भावनाप्रधानच असते.
नंतर मग त्यावर विचार करून ती योग्य-अयोग्य ठरते. आणि विचार करून एखाद्या गोष्टीबद्दल बोलणे, त्यावर प्रतिक्रिया देणे, यासाठी त्या प्रत्येक गोष्टीचा, घटनेचा अभ्यास असावा लागतो. आणि तो प्रत्येकाला करणे शक्य होईलच असे नसते.. आणि म्हणूंच एकूण समाजाचा विचार करता, प्रत्येक समाज, 'समाज' म्हणून, भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेण्याचीच शक्यता जास्त असते.
म्हणूनच कोणीही कितीही नाकारले, तरीही आपल्या महापुरुषांचा, नेत्यांचा, श्रद्धास्थानांचा झालेला मान-अपमान यांवर मनुष्य आपले मत ठरवत असतो. जो आपल्या श्रद्धास्थानांना यथोचित मान-सन्मान देईल, तो आपल्या जवळचा वाटू लागतो. आणि याची परिणती जात, धर्म, समाज, श्रद्धा या भावनांवर आधारित राजकारणात होते. आणि एका समाजाने यात उडी घेतली की हळूहळू नकळतच, इच्छे-अनीच्छेने प्रत्येक समाज यात ओढला जातो. त्यातून विटंबना, दंगली, पूजा-अर्चा, उत्सव या सर्व गोष्टींतून या सर्व समाजांचे ध्रुवीकरण केले जाते. आणि त्यातूनच सर्व राजकारण खेळले जाते. अर्थात काहीवेळा या राजकारणाचा त्या त्या समाजास तातपुरता उपयोग होतोही. पण, एक संपूर्ण मानवसमाज म्हणून जर या गोष्टीकडे पाहायचे असेल, तर सर्वांचेच नुकसान होणे हेच या राजकारणाचे भवितव्य ठरलेले असते.

सध्या महाराष्ट्रात अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झालीय. (देशात ती काही वेगळी नाहीच म्हणा). प्रत्येक समाजाने एकेका महा-पुरुषाचा त्यांच्या 'दैवत्वाचा' कैवार घेतला असावा असे काहीसे चित्र आहे. आणि म्हणूनच केवळ त्यांचे पुतळे बांधून आपल्या समाजाचा काहीतरी मोठा विजय होणार आहे, असा समाज सर्वच समाजांनी करून घेतलाय. म्हणूनच, एकीकडे पाण्याविणा लोक मारत असताना, गुरांना चारा नसताना, शेतकर्यांचे, सामान्य नागरिकांचे हाल होत असताना केवळ ही स्मारकेच जणू सर्वांना तार्णार आहेत, अश्या आविर्भावात सर्वच नेते लढताना दिसत आहेत. आणि दुर्दैव असे की, दुष्काळ, गरीबी अश्या गंभीर परिस्थितीमध्ये असलेल्या भागातच सर्वात जास्त लोक या स्मारकांसाठी झटताना दिसत आहेत. आणि याच अर्थाची आश्वासने देणार्‍या लोकांना जनता मतदान करत आहे.

एक-एक स्मारक बांधण्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च करण्याची आश्वासने विविध नेत्यांकडून मिळत असताना, त्यापेक्षा आमच्या पोटा-पाण्याचे प्रश्न सोडवा, असे म्हणणारे लोक कमी आहेत. हीच मोठी शोकांतिका आहे. आणखी किती काळ लोक अश्या आश्वासानांना भूलणार आहेत याचे उत्तर काळच देईल हे निश्चित. परंतु, सध्य-परिस्थितीत महाराष्ट्रात जे चालू आहे त्यावर एकच उपाय दिसतोय, तो म्हणजे कोणीतरी जाब विचारणे. समाजाला या सर्व गोष्टी समजावून सांगणे, आणि समाजाकडून या गोष्टीला विरोध करवून घेणे. यापैकी प्रश्न विचाराने, आणि समाजाला जास्तीत जास्त समजवण्याचा प्रयत्न करणे हेच आपल्या हाती आहे. आणि हीच आजच्या काळाची खरी गरज आहे, असे मला वाटते.

- मनस्वी ((विनायक विश्वनाथ बेलोसे)
२० डिसेंबर २०१२

गुरुवार, ३० ऑगस्ट, २०१२

पावसाची गोष्ट


पावसाची गोष्ट पाउस
रात्रभर सांगत राहिला..
अन् घरामागचा डोह
दुथडी भरून वाहत राहिला.. (चं. गो.)

पाउस कधी हसत होता..
मेघांतून गडगडाट करून..
मधूनच रडू लागायचा...
मुसळधार पडून...

पावसाला भानच नव्हतं..
डोह, कधीचाच गेलाय भरून..
पावसासाठी, मेघ ठेवून...
त्याचं दुःख भरून घेतोय..

डोह मात्र दुःख घेऊनही
केवळ सुख वाटत होता..
भेगाळलेल्या धरतीवरल्या
पाटाकडे वाहत होता...
__________________-मनस्वी.. (प्रेरणा - आदरणीय चं. गो.)
१४:३५ - ३० ऑगस्ट २०१२

अचानक ती म्हटली मला..
"बरेच दिवस झाले...
तू असं छान काही लिहिलं नाहीस?
बरेच दिवस झाले...
शब्दांतून प्रेम व्यक्त केलं नाहीस?"

तिला म्हटलं...
"अगं सखे, वेळच कुठे मिळतो मला..
तुला न्याहाळत बसण्यातून?
तू समोर नसलीस,
की तुझी आठवणीत रमण्यातून...?"

तर म्हणाली...
"असं कसं?
पुर्वी तर करायचास की कविता..
अगदी माझ्या समोर बसून..
सुंदर शब्द गुंफायचास...
अन् माळायचास... त्यांचा गजरा करून.."

मी म्हटलो...
"आताही मी तेच करतोय...
पण तुलाच कळत नाहीये..
कविताच तर ऐकवतोय...
पण तुझंच लक्ष नाहीये..."

तेव्हा मात्र सखी, थोडी विचारात पडली..
अन् सारं उमगलं... तेव्हा पुन्हा गोड लाजली...

कुछ तो...


इस जहाँ में अभी कितनीही बातें
हुईही नही हैं..
और हम हैं के कहते हैं,
हमने सबकुछ सिख लिया हैं...
अभी तो न जाने
कितनी बातोंसे अंजान हैं हम
और हम कहते हैं
हमने सारा जहाँ देख लिया हैं...
अभी तो कयामत
देखीभी नही हैं हमने,
मगर, हम कहते हैं,
हमने तैरना सिख लिया हैं... .
जिस पल हम ये मानेंगे,
हम सिर्फ़ एक कतरा हैं इस जहाँका,
तब हम कह सकेंगे,
हमने कुछ तो जान लिया हैं...
________________________-मनस्वी
१२:३९ - ३० अगस्त २०१२

गुरुवार, १६ ऑगस्ट, २०१२

अंत - उगम


मावळला जरी सूर्य...
पुन्हा फिरून तो येतो ...
जरी झाली राख फिनिक्सची...
त्यातूनही जन्म तो घेतो...

गाळुन पडलेल्या फळातून
पुन्हा, नवा वृक्ष अंकुरतो..
नदीचा प्रवास कसाही होवो..
अंती, सागराशीच संगम होतो..

प्रत्येक गोष्ट जी जन्म घेते..
तिचा पुन्हा अंत होतो..
सृष्टीच्या अंतातूनही पुन्हा
नव्या सृष्टीचा उगम होतो...

सोमवार, २ जुलै, २०१२


चार पावलं मागं यावं..
कुण्यातरी आपल्यांसाठी..
अन् मग जाणीव व्हावी..
आपण एकटेच मागे पडल्याची..

अश्यावेळी आपण पुन्हा
त्यांना गाठण्याची धडपड करतो..
परंतु, कित्येकवेळा शेवटी..
आपण.. काही क्षणांनी मागेच राहतो..

समजत नाही.. उडी घ्यावी सरळ..
पुढे जाण्यासाठी..
की वाट पाहावी..
कोणीतरी.. मागे वळून पाहण्याची..

पुढे जाण्याच्या प्रयत्नात
कधी आपण पुढेच निघून जातो..
काहीच केलं नाही..
तर कायमचे मागे राहतो..

नात्यांच्या या खेळात
आपण इतके गुंतून जातो..
की हा गुंता सोडवण्याआधीच..
आपला.. वेळ संपतो..


रात्र... अंधार...
किरर्र.. घनदाट..
त्यातून जाणारी
एक नागमोडी वाट..

धुकंच धुकं सर्वत्र..
ना दिशा.. ना वेळ..
कशाचाच जमेना..
कशाशीही मेळ....

आसपास कोणाची
चाहूल तेवढी येते..
पण, सोबत केवळ..
भीतीच सोडून जाते..

अचानक एक किंकाळी..
मग पुन्हा.. शांतता...
हृदयात वाढणारी धडधड..
अन् मेंदूत सुन्नता..

पुन्हा पुन्हा एकच विचार..
पुढे नक्की होणार काय...
अन् तेवढ्यात जाणवतो..
कशात तरी अडकलेला पाय...

हाच आहे तो शेवट..
खात्री पटलेली असते..
या वेळची किंकाळी..
आपल्याच आतून आलेली असते..


एक क्षण... शेवटचा..
मृत्यू येण्याआधीचा..
प्रत्येकाच्या आयुष्यात येऊनही..
कोणालाच ठाऊक नसलेला..

कधी तो क्षण कधी येईल..
याची चिंताच कोणाही नसते
कधी केवळ.. त्याच्याच येण्याची..
वाट पाहण्याची ओढ वाटते..

कोणीही कसंही वागत राहो..
तो क्षण तर येणारच असतो..
आपल्या हाती केवळ..
त्या क्षणापर्यंतच वेळ असतो..


आजचा सूर्य मावळेल..
पुन्हा कधीही न उगवण्यासाठी..
आज रात्र होईल...
पुन्हा कधीही न संपण्यासाठी..

उगवलाच उद्याचा दिवस..
तर, तो केवळ भास असेल..
सारे काही तसेच असेल..
तरीही एक पोकळी असेल..

कोणाला बहुदा समजेलही..
पोकळी झालेली जाणवेलही..
पण त्यामागचे कारण काय..
हे शोधायचाही वेळ नसेल..

पुन्हा काही नवीन घडेल..
पोकळी नकळत भरून जाईल..
जुने मात्र पुन्हा एकदा..
नेहमीप्रमाणे.. विस्मरणात जाईल..

शब्दांना काय...
त्यांना कोणीतरी हवंच असतं...
त्यांना व्यक्त करणारं..
स्वतःच्या मनातल्या भावना..
त्यांच्या सोबतीनं मांडणारं...

आपण फक्त स्वतःहून
चार पावलं पुढं व्हावं..
शब्द निवडतातच आपल्याला..
मग आपण त्यांना घेऊन..
त्यांच्याशी खेळून...
असंच पुढे चालत जावं. .

शब्दांना मग आठवण राहते..
आपल्या सोबतीतल्या गमतीची... .
मग ते शोधत राहतात..
आपल्याला..
बनवायला.. वाट.. व्यक्त होण्याची...

मंगळवार, २६ जून, २०१२

तो आला आला म्हणून 
सगळे आनंदून गेले होते..
आता सारी दुःखे धुवून जातील
अशी अशा बाळगून होते...

तो आला खरा, पण मग 
अचानक गायब झाला कुठेसा...
त्यानेच अशी पाठ फिरवली तर
कुणावर ठेवायचा भरोसा?

तुला हवं ते देतो...
खोटं नाही अगदी खरे...
पण आता त्रास नको देऊस...
पावसा, एकदाचा आता पड रे...
________________________-मनस्व
26 jun 2012 - 21:23

मंगळवार, ५ जून, २०१२

तो आला.. अन्


तो आला..
थंडगार वार्‍यावर
मृद्गंध स्वार झाला..
भेगाळलेल्या धरेसाठी
कृष्णमेघ जलधार झाला..

तो आला.. अन्
पाणावलेल्या डोळ्यांमधले
खारे पाणी मधुर झाले..
उन्हात जळुनी कोमेजलेले
मन पुन्हा मोहरुन आले..


तो आला.. अन्
सारी सृष्टी
पुन्हा नव्याने खुलू लागली..
आनंदाच्या महापुराने
दुःखे सारी धुवून गेली..

सोमवार, ४ जून, २०१२

पाउस... वाट पहात आहे..


तिला तो आवडला होता.. 
अगदी मनापासून.. 
अडचण एकच होती.. 
तिला.. त्याच्या मनातलं
माहीत नव्हता.. 


तसे तिने बरेच प्रयत्न केले...
त्याला आपलं मन कळावं,
तिच्या त्याच्यावरचं प्रेम..
त्याला दिसावं...
पण, यश काही मिळत नव्हतं..


एक दिवस अचानक
पाउस तिच्या मदतीला आला...
दोघेच सोबत फिरत असताना..
अचानक तिचा पाय घसरला..


त्याने तिला सावरलं..
अन् दोघांची नजरानजर झाली..
तोच क्षण होता..
जेव्हा तिच्या मनातल्या प्रेमाची..
त्याला प्रचीती आली..


पाउस असाच येत असतो..
आधून मधून..
अश्याच कोण्या दोघांच्या सोबतीला..
त्यांच्या मनातलं अव्यक्त प्रेम..
एकमेकांपर्यंत पोहोचवायला..


आता पुन्हा असेच दोघे..
कुठेतरी झुरत आहेत..
पाउस कदाचित त्यांच्या
बाहेर पडण्याचीच वाट पहात आहे.. 

बुधवार, ३० मे, २०१२

सरकार


रस्त्यावरचं गरीब पोर
रोज उपाशीच झोपी जातंय
बेरोजगारीत वाढ होताना
सरकार विकासाच्या गप्पा मारतंय

पोट भरायला अन्न नाही
पाण्याविणा वासरू मरतंय
दुष्काळ सारं घेऊन गेलाय
सरकार मदतीचा प्रयत्न(?) करतंय

शहरात राहायला जागा नाही
महागाई आकाशी झेप घेतीये
सामान्याने आवाज उठवल्यावर
सरकार मात्र धमकी देतंय

अहिंसेच्या गोंडस नावाखाली
सारा विद्रोह चिरडतय
लोकशाहीच्या घोषणा फक्त
सरकार हुकुमशाही चालवतंय

मंगळवार, २९ मे, २०१२

देशहितार्थ


कोणी म्हणतो शिवराय मोठा..
कोणी म्हणे माझा भिम मोठा
कोणासाठी फुलेच महात्मा
कोणासाठी शाहूच मोठा

कोणी स्वातंत्र्यवीरास नमितो..
कोणी महात्मा गांधीस मानतो..
कोणासही मानणारा असो तो..
दुसर्‍यास मात्र तुच्छ जाणतो..

प्रत्येकाचे दैवत मोठे..
दुसरे कुणी ठावेच नाही..
अश्या परिस्थिती या भारताचे..
भाग्य उजळणे शक्यच नाही...

उपाय यावर एकच आहे..
प्रत्येकाने स्वीकारण्याचा
जात-धर्म अन् पंथ सोडूनि
देशहितार्थ विचार करण्याचा...

आता... नक्कीच येईल तो...


कैक दिवस झाले..
त्याची भेट होऊन..
आता जीव थकून गेलाय
त्याची आठवण काढून...

आता येईल तो..

त्याच्या अनुपस्थितीत
खूप काही बिघडलंय..
आता त्याचीच आस आहे..
त्याच्याविना सारं अडलंय..

आता येईल तो..

तो आला..  की सारे जग
पुन्हा प्रफुल्लित होईल...
तो आला... की सारी सृष्टी
सगळे दुःख विसरून जाईल..

आता... नक्कीच येईल तो...

शुक्रवार, २५ मे, २०१२


कधी? काय? कुठे? कसे?
प्रश्न असतात तरी किती असे?
अशी काय जादू यांची..
उत्तरातूनही नवा प्रश्न दिसे...

का कोणास ठाऊक
अचानक आकाश भरून आलं...
लख्ख ऊन पडलेलं असताना
अचानक अंधारून आलं..

जोमाचा वारा सुटला..
सारा पाचोळा उडवून गेला...
घोंघावत अवकाशी पोचला
मग अचानक शांत झाला..

मेघ जमलेले जणू चिडलेले
गडगडात मोठा झाला..
संघर्षातून त्या मेघांच्या
वीजेचा लोळ धरेवर आला..

मेघ फाडून मग जेव्हा
पाऊस बरसत उतरला
सृष्टीच्या भयाणतेतून
जणू आनंद बहरू लागला..


एक वाहता निर्झर
किरर्रता भयाण सोबती
पाचोळ्यात होई सळसळ..
अन् एक किंकाळी... अजाणती

कोणास लपवतो आडोसा
कोणाचे हास्य ते भेसूर...
वणवा लागतो कुठेसा..
आसमंती दाटला धूर...

झाकोळला तो सूर्य...
अंधार दाटूनी येतो..
उरातले चोरूनी धैर्य..
केवळ भीतीच देऊनी जातो..

बुधवार, २३ मे, २०१२

तरीही.. रात्र काळोखीच होती..


चंद्र उगवला..
बर्‍याच दिवसांनी..
तरीही रात्र काळोखीच होती..
तारे सारे खुशीत होते...
रात्र अजुनही दुःखीच होती..

एक चांदणी उतरून आली..
धरेवर काहीशी शोधू लागली..
तेव्हा तिला गमक उमजले..
रात्रीच्या दुःखाचे कारण समजले..

'त्याची' सखी अजुन आली नव्हती..
हे पाहून सृष्टी कोमेजली होती..
अन् म्हणूनच कदाचित...
चंद्र उगवला... बर्‍याच दिवसांनी..
तरीही.. रात्र काळोखीच होती..

सोमवार, २१ मे, २०१२

ओढ..


अमावस्येला चंद्र नसतो..
मी मात्र तिथेच जाउन बासतो...
पौर्णिमेचा चंद्र...
मी जिथून न्याहाळत असतो...

अंधार असतो भरून आलेला..
चांदण्या सजुन आलेल्या...
चंद्र नसतानाही माझ्या नजरा...
चंद्राकडेच लागलेल्या...

माहीत असता.. चंद्र येणार नाही..
तरीसुद्धा मला
काहीच फरक पडत नाही..
कारण, माझी चंद्राबद्दलची ओढ..
तिथीनुसार बदलत नाही...

सोमवार, १४ मे, २०१२

दुष्काळ... दोघांच्याही भाळी आहे..

दुष्काळ पडलाय..
राज्यात पाण्याचा..
अन् कवितेत शब्दांचा..

आठवताहेत निराळे रंग..
लोकांना मेघांचे..
अन् मला भावनांचे..

वाटेवर डोळे लागलेत...
बळीराजाचे पावसाच्या...
अन् माझे कवितेच्या..

गरज.. त्यांची अन् माझी..
थोडीशी निराळी आहे..
जगण्याचा प्रयत्न करणं मात्र..
दोघांच्याही भाळी आहे..

गुरुवार, ३ मे, २०१२


मन की गहराइयाँ हो समुंदर से ज़्यादा,
कल्पनाओंकी उँचाई आसमाँसे उँची||
धड़कनें हवाओंसे आगे जाती हुई,
अरमानोंसे थरक रही हैं भूमि||
ऐसी हो अगर किसी की दीवानगी,
तो मंज़िलोको पाना मुश्किल नहीं होता||
मंज़िले तो खुद सामने आ जाती हैं,
चल कर मंज़िलोंतक जाना ज़रूरी नहीं होता||

मंगळवार, २४ एप्रिल, २०१२

एक अनोखी रात..


चांदण्यांच्या चादरी खाली...
चंद्राची उशी करून..
चंदेरी प्रकाशात...
सखे, सजवुया आपली...
केवळ आपुलीच असणारी
एक अनोखी रात..

तुझ्या माझ्यात येणार्‍या
वार्‍यासही सांगू...
थोडासा लांबच राहा म्हणून...
क्षितीजापर्यंत चालत जाउ
एकमेकांचा हात धरून..

सार्‍या सृष्टीला वाटावा हेवा..
असा सजवु शृंगार...
येणार्‍या पहाटेसही
थोडी पाहायला लावू वाट...

सखे... अशी सजवुया आपली..
केवळ आपुलीच असणारी
एक अनोखी रात..

मुद्दतसे इंतज़ार किया हैं उनके आने का...
वो आए हैं और हम खामोश हैं|

सोचा था वो आएँगे तो कितनीही बातें करेंगे,
आज वो सामने हैं और हम खामोश हैं|

 लगता था वो आतेही उनको बाहों में समा लेंगे,
आज वो इंतज़ार में हैं और हम खामोश हैं|

शनिवार, २१ एप्रिल, २०१२

आपुले प्रेमगीत

अवकाश केवळ डोळे मिटण्याचा
भेटशील तू तत्क्षणी मला...
अवकाश केवळ तू आठवण्याचा
पाहशील तुझ्याच मिठीत मला..

साद देशील मनातून जेव्हा
प्रतिसाद मिळेल प्रत्येकवेळी
अस्तणार नाही सूर्य, अपुल्या
भेटी अगोदर संध्याकाळी

चंद्रही मग आतुर होईल..
एक झलक तुज पाहण्यासाठी
सृष्टी सारी सज्ज होईलही
आपुले प्रेमगीत गाण्यासाठी..

गुरुवार, १९ एप्रिल, २०१२

कविता.. चंद्र-चांदण्यांची

सखी माझी अशीच वागते..
मनात आले की कविता कर, असं म्हणते..
मला माहीत असतं..
कवितेत तिला काय हवं असतं..
पण, दरवेळी तिला हवं ते देणं
वाटतं तितकं सोपं नसतं..
कधी जमते मला कविता..
कधी नवी नक्षत्रे दिसतात
कधी पुन्हा त्याच चांदण्या दिसतात...
कधी चंद्र भासतो नवासा...
कधी जुनाच चंद्र वाटतो हवासा
पण प्रत्येकवेळी नवे शब्द
जुळून येतात असं नाही
तरीही सखी ऐकत राहते..
कवितेचं कौतुक करत राहते..
कारण, आवड आहे तिला
आकाशात बघत राहण्याची
म्हणूनच बहुदा..
तिला नेहमीच आवडते
कविता.. चंद्र-चांदण्यांची

मंगळवार, १७ एप्रिल, २०१२

अशी ही आमची पुण्याची मेट्रो..

पुण्यात मेट्रो करायचे ठरले..
पुढे मात्र रामायण घडले..
सर्वात आधी विरोध झाला..
"गरज काय?" हा सवाल आला...

आधी रस्ते करा नीट..
सुधारणा करा पीएमटीत...
रस्त्यात खड्डे झालेत फार..
त्यांचा आधी करा विचार..

या सगळ्यावर मात करत
मेट्रो थोडिसी पुढे सरकली..
मोजणी झाली, आखणी झाली..
मध्येच कुठेशी माशी शिंकली..

मेट्रो न्यायची नेमकी कुठून
यावरून चर्चा चालली आहे...
पुणेकरच काय पण या सार्‍याला
मेट्रोही आता कंटाळली आहे..
______________________मनस्वी...

सोमवार, १६ एप्रिल, २०१२

पहिलाच पाउस...

आकाशात मेघांची पहिलीच गर्दी..
येणार्‍या पावसाची पहिलीच वर्दी..

पहिलीच वीज कडाडणारी ..
पहिल्या नजरेत जिंकून घेणारी..

पहिलाच थेंब.. पहिलाच पाउस...
मनात जागली भिजण्याची हौस..

पहिलीच वार्‍याची झुळुक खास..
पहिलाच, मातीचा मंद सुवास..

पहिल्याच पावसाची पहिली गार..
पहिल्याच पावसाने भिजलेला पार...

पहिल्याच पावसाने बहरला निसर्ग
पहिल्याच पावसात गवसला स्वर्ग..

बुधवार, ४ एप्रिल, २०१२

तो... मी

तो तिकडं सीमेवर
देशासाठी लढतोय..
मी मात्र इथे बसून
मैत्रीच्या गप्पा मारतोय...

तो तिथे काळ्या मातीत
राब राब राबतोय..
मी मात्र चव नाही
म्हणून अन्न टाकतोय..

तो तिथे रस्त्यावर उतरून
व्यवस्थेविरुद्ध झगडतोय..
मी मात्र घरात बसून
प्रगतीच्या चर्चा करतोय..

तो त्याचा स्वार्थ सोडून
माझ्यासाठी मरतोय...
मी मात्र संधी मिळताच
स्वतःचा स्वार्थ साधतोय..

मंगळवार, ३ एप्रिल, २०१२

निगाहे इश्क़से भरी हैं, जबसे देखा हैं उनको,
अब तो दुनिया में बस उन्हीका दीदार होता हैं|
दिल में यूँ बस चुके है वो तब से,
अब साँस भी लेते हैं तो उनका नाम निकल आता हैं|
कोई दीवाना कहता हैं, कोई पागल समझता हैं|
इश्क़ का ये फसाना, यूँही चलता रहता हैं|
तुझ्या माझ्यातल्या अंतराला
सखी जरा सांग...
आजची एवढी रात्र
जरा बाजूलाच थांब...

सांग आज चंद्रालाही
कुठेसा फिरून जरा ये
चांदण्यातून तुझ्या या
थोडी उसंत आम्हा दे

आता सखे, थोडीशी तू
जवळी माझ्या ये...
उरलेल्या अंतरास या
मला आता संपवू दे...

मंगळवार, २७ मार्च, २०१२

मी... "मनस्वी"

मी लिहीत जातो शब्द
भाव दाटतात मनी जेव्हा
फिकीर नसते मजला
यमकांच्या जुळण्याची तेव्हा

मी मांडत जातो स्वप्ने
जी दिसती मज डोळ्यांना
मृगजळच केवळ सारी
वाटुदेत मग ती कोणा

जे मनास माझ्या वाटे
मी तसाच व्यक्त होतो
म्हणून तर मी आता
माझे नाव "मनस्वी" घेतो
नभांगणी तो चंद्र
चंद्राच्या सोबती तारे
चांदण्यात या सार्यांच्या
न्हाउन जाई जग सारे

चंद्राशी बोलणारी 'ती'
'तिच्याशी' बोलणारा चंद्र
दोघांना पाहण्यात तारे
होती क्षणार्धात धुंद

चंद्राशी बोलताना 'ती'
लाजरी होऊन जाते
अन् जाता जाता चंद्राचे
सारे तेज घेऊनी जाते.

सोमवार, २६ मार्च, २०१२

कवी ग्रेस

कवी ग्रेस गेले...
त्यांच्या जान्याने माझ्या मनीच्या भावना त्यांच्याच एका गाजलेल्या कवितेला स्मरून इथे व्यक्त करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न...

'तो' गेला सोडूनि सर्वांना
तेव्हा सूर्य तापला होता..
'त्याच्या' जाण्याच्या दुःखाने
सार्‍या दुनियेवर कोपला होता

'तो' सार्‍यांना देऊन गेला
नवदृष्टी जग पाहण्याची..
'तो' निर्माण करून गेला
पोकळी कधी न भरणारी...

'तो' बोलत होता काही
समजलेच नाही कोणी
'त्याने' इतके देऊनीसुद्धा
रिकामीच आपुली झोळी
--------------------------- विनायक बेलोसे

मोहिनी

सांजेचा वारा अन्
चंद्र नभाच्या अंगणी...
चंद्राच्या सोबतीला
चमकणारी चांदणी

चांदण्यात न्हायलेली
सारी सृष्टी चंदेरी झाली
अश्यातच कुठूनशी
सखी माझी आली...

सखीला पहिले मी
त्या चांदण्यात जेव्हा..
तिच्या सौंदर्याने मला
पुन्हा मोहिनी घातली..

मंगळवार, २० मार्च, २०१२

एक मुलगी... आपल्या भावी जीवनसख्याबद्दल असाच काहीसा विचार करत असेल... नाही का?

तुझीच स्वप्ने पाहत होते,
तुझ्याच विचारात मी गुंग होते..
मज स्वप्निच्या राजकुमारा,
वाट तुझीच मी पाहत होते..

कसा असशील तू... कसा दिसशील तू...
भेटशील तेव्हा काय बोलशील तू..
कित्येक आहेत प्रश्न मनी माझ्या...
त्यांना उत्तर काय देशील तू...

आलास तू सामोरा जेव्हा..
वाटले स्वप्न पूर्तता झाली..
इच्छा माझिया मनातलीच
मूर्ती होऊनि समोर आली..
लाजणारे हे नयन तुझे
मज घायाळ करून जाती..
अबोल असूनही ओठ तुझे
मनीचे गुज सांगून जाती...

थरथरणारा स्पर्श तुझा
मज मोहवून जातो
धडधडणारा श्वास तुझा
मज अस्वस्थता देतो..

आकाशातही चंद्र-तारयांनी
चांदणे खुलत जाते...
आपुल्या भेटीमुळेच जणू ही
सृष्टी फुलत जाते...

गुरुवार, १५ मार्च, २०१२

खरे शिवस्मारक कोणते?

सिंधुसागरातील एक भव्य पुतळा की मराठी मुलुखातील किल्ले?

२००४च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांनी मुंबईजवळ सिंधुसागरात शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक बांधण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार त्यांचे शासन आल्यावर त्यांनी कामही सुरू केले.
स्मारकाचा आराखडा तयार झालाय.
महाराजांचे हे स्मारक अगदी अमेरिकेच्या लिबर्टीच्या पुतळ्याहूनही उंच असणार आहे.
इथे महाराजांच्या जीवनावर आधारीत एक प्रदर्शन, तसेच एक खास कार्यक्रम तयार करण्यात येणार आहे.
एकूणच हे स्मारक सिंधुसागरात सुंदर दिसेल. हे निश्चित...
परंतु, या सर्वांहूनही मोठा एक प्रश्न पडतो.. तो असा की महाराजांच्या स्मृतिसाठी काही करावयाचे असेल, त्यांचा खरा सन्मान करायचा असेल, तर या स्माराकाहूनही भव्य काहीतरी करायला हवे.

त्यासाठीच काही मुद्दे खाली देत आहे...
* आता जागा निश्चिती होत असताना आणि याच स्मारकावर ३५० कोटी खर्च होतील असे सांगण्यात येत आहे.
* एकूणात आपल्याकडील विविध योजना कश्या राबवल्या जातात ते पाहता, हाच खर्च, हे स्मारक पूर्ण होईपर्यंत यावर अंदाजे १५०० कोटी रुपये खर्च होईल, हे नक्की.
* स्मारक पूर्ण झाल्यानंतर, इथे येणारे पर्यटक आणि शिवभक्त यांना महाराजांबद्दल आदर वाटेल, वाढेल हे निश्चित. परंतु, इथे किती लोकांना रोजगार मिळेल हा विचार करायला हवा.
* हे स्मारक बांधताना समुद्रातील पर्यावरणाचाही विचार करणे तितकेच महत्वाचे आहे असे मला वाटते.


शिवाजी महाराजांचे कार्य हे पुतळा, स्मारक बांधून नव्हे, तर त्यांनी ज्या क्षेत्रात, मराठी मुलुखात काम केले, ज्या किल्ल्यांवर ते राहीले, त्या सर्व जागांचे, तिथल्या विविध गोष्टींचा अनुभव घेऊन जास्त समजू शकते.
आता या सर्वांचा अनुभव लोकांना व्हावा म्हणून काही गोष्टी करणे गरजेचे आहे.

* महाराष्ट्रातील काही (साधारण ३० - ५०) महत्वाचे, मोठे, ऐतिहासिक, शिवकालीन किल्ले निवडावेत.
उदाहरणार्थ, तोरणा, राजगड, रायगड, सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, पुरंदर, पन्हाळा, प्रतापगड, सज्जनगड (हीच नावे असावित असे नाही, यात बदल असु शकतो..)
* या प्रत्येक किल्ल्यावरचा शिवकालीन इतिहास काय, त्यावेळीची एकूण परिस्थिती, वातावरण, काय होते याची माहिती जमवावी.
* त्या किल्ल्याच्या अखत्यारीतला मुलूख कोणता, प्रदेशातील इतर किल्ले कोणते याची माहिती जमवावी.
* त्या किल्ल्यावर त्या काळी साधारण काय काय इमारती अस्तित्वात होत्या, कोणत्या वाटा त्यावेळी वापरात होत्या त्या निवडाव्यात.
* या सर्व वास्तू, त्यांच्या मूळ स्वरूपला धक्का न लावता पुन्हा कश्या उभ्या राहू शकतील यासाठी प्रयत्न करावेत.
* वर जाणार्‍या वाटा चांगल्या बांधून काढाव्यात.. .(गाडीरस्ता न करता.. कारण, एकदा तिथे गाड्या पोहोचल्या की तिथल्या मूळ स्वरूपास् हानी पोहोचण्याची शक्यता खूपच वाढते.)
* पर्यटकांना राहण्याची सोय होईल अशी व्यवस्था करावी.
* त्यांना इथला इतिहास समजावून सांगण्यासाठी, किल्ला दाखवण्यासाठी काही युवकांना प्रशिक्षित करावे.
* किल्ल्यावर ठीकठिकाणी माहितीफलक लावावेत.

या सर्व गोष्टी करताना, किल्ल्याचे मूळ स्वरूप चांगले राहील याची दक्षता घेण्यात यावी, इथली स्वच्छता, पावित्र्य चांगले राहावे म्हणून प्रयत्न व्हावेत.

या सर्व गोष्टी करण्यासाठी, प्रत्येक किल्ल्यास साधारण १० कोटीचा निधी खर्च झाला तरी साधारण ३०० - ५०० कोटी रुपये खर्च करून, खूप काही साआध्य करता येईल.

* स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल.
* लोकांना शिवकालीन इतिहास अनुभवता येईल.
* शिवाजी महाराजांचे कार्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवता येईल.
* या सर्व किल्ल्यांचा विकास करण्याच्या निमित्ताने आसपासच्या काही गावांचाही विकास साध्य करता येईल.
* याच किल्ल्यांच्या आसपासच्या मुलुखातील इतर प्रेक्षणीय स्थळेही त्या योगे लोकांना दाखवता येतील.

याचप्रमाणे, आणखी काही फायदे होतीलच..

शेवटी इतकेच वाटते, हे सारे जर झाले, तर शिवाजी महाराजांच्या नीतीनुसारच जास्तीत जास्त लोकांचा, रयतेचा फायदा होऊ शकतो, हे नक्की...

कृपया आपल्या प्रतिक्रिया द्याव्यात..

बुधवार, १४ मार्च, २०१२

तिची प्रत्येक अदा

ती...
हसली की छान दिसते..
जणू चैत्राची पालवी फुटते..

ती...
रुसली तरी गोंडस दिसते..
गालांवर तिच्या गुलाब खुलते..

ती...
विचारात जेव्हा हरवून जाते..
सारे विश्व जणू थांबून राहते..

ती...
लाजते, मन मोहवून जाते..
मोगर्‍यासही नवा सुगंध देते..

तिची प्रत्येक अदा अशीच असते...
तिच्यासोबत सृष्टी छटा बदलते..

शुक्रवार, २ मार्च, २०१२

दगड लांब फेकायचा तर,
हात मागे जावाच लागतो..

बाणाला गती द्यायची तर,
धनुष्य मागे ताणावाच लागतो..

दिवस उगवायचा असेल तर
रात्र व्हावीच लागते...

मोठी उडी घायची तर...
दोन पावले मागे जावेच लागते..

जीवनात यशस्वी व्हायचे तर..
या सर्वाची जाणीव ठेवावीच लागते..
Vinny
सुर्योदयाला ग्रहण लागले
म्हणून, सूर्याची आग कमी होत नाही...

काही फांद्या तूटल्या
म्हणून, झाड वाढायचे थांबत नाही..

एखादा घोळका निघून गेला
म्हणून, जत्रा काही उठत नाही..

माणूस थोडा थकला, बसला..
म्हणून, त्याचा प्रवास काही संपत नाही..

मंगळवार, २८ फेब्रुवारी, २०१२

तिच्याबद्दल

तिच्याबद्दल बोलायला
इतका आतुर होतो मी..
कविता करायला बसलो,
की पहिला शब्द येतो.. "ती"

झोपी जाताना बाप्पानंतर
नाव तीचेच येते मनी..
झोपीगेल्यानंतरही
तीच भरून राहते स्वप्नि...

पहाट जाउन सकाळ येते
जागे होताना उन दिसते..
त्या किरणांतून तीच स्मरते..
नंतर सृष्टी दर्शन देते..

दिवसभराच्या कामातुनही
तीचाच विचार चालू असतो..
ती असली, नसली तरी. .
मी तिच्यातच बुडून गेलेला असतो..

शुक्रवार, १७ फेब्रुवारी, २०१२

कित्येक वेळा जन्मभर
उभा असतो वृक्ष...
वाट पाहतो पावसाची...
जरी होऊन जातो रूक्ष..

पाउस काही पडत नाही..
पालवी काही फुटत नाही..
शेवटी गळून पडतो धरेवर...
पण त्याची इच्छा पुरी होत नाही..

नंतर कधीतरी येतो पाउस..
मग त्या खोडात पालवी फुटते..
पण अश्या वेळी त्या वृक्षाला..
खरेच... कसले सुख मिळते?

गुरुवार, ९ फेब्रुवारी, २०१२

मी.. प्रवासी.. खिन्न रात्रीचा

काळोख्या खिन्न रात्रीचा
एक प्रवासी मी..
किर्रतेच्या सहवसातील..
एक निवासी मी...

कधी शहारुन येते एकांती
कधी उरात भीती दाटते,
अस्तित्व क्षणाचे माझे,
संपणार... कधी वाटते...

यत्न करिता पळण्याचा..
रात्र जखडूनी ठेवते...
आता सुटका केवळ मृत्यू
जाणीव होत राहते....

शून्य

विश्व एक शून्य...
शून्यातला मी एक...
शुन्यालाच अर्पिलेला..
क्षण माझा प्रत्येक...

लढत राहतो अस्तित्वाशी..
पुन्हा पुन्हा जन्म घेण्यासाठी..
झुगारूनी सृष्टीचे नियम सारे..
शून्याची वृद्धी करण्यासाठी..

शून्य पाहता वाटे नगण्य...
परि असे तो सर्वस्व अनंत...
सुरवात विश्वाची शून्याशी होते..
त्यातच होतो... विश्वाचा अंत..

पिल्लू... लौकर ये.

A poem dedicated to all Mothers...
Who are waiting for their children to be back home...
Who are expecting a baby in their lives for a long time...
for those... who want to be a mother... But, destiny is not being kind with them...

GOD... PLEASE HELP THEM... :'(

एक चिउ वाट पाहतिये,
तिच्या हरवलेल्या पिल्लाची..
आठवण आहे तिला..
पिल्लू घरट्यातच ठेवल्याची..

सकाळी गेली तेव्हा
पिल्लू झोपलेलं होतं..
रात्रभर दंगा करून
तकलेलं होतं...

उठल्यावर त्याला भूक लागेल
हे चिऊला ठाऊक होतं.
त्याला खायला काय आवडेल
हे तिला माहीत होतं..

म्हणून चिउ गेली होती..
पिल्लुचा खाऊ आणायला...
खाऊ घेऊन ती परत आली..
लाडक्या पिल्लूला बघायला..

पण पिल्लू कुठेच दिसलं नाही..
शोधूनही सापडलं नाही...
आता चिउ उदास झालीय...
पिल्लू ला शोधून निराश झालीय...

पण तिला आशा आहे...
तिचं पिल्लू परत येईल...
आई म्हणून हाका मरेल...
पटकन चिउच्या कवेत शिरून..
तिच्यावर पोट भरून प्रेम करेल..

एक चिउ वाट पाहतिये,
तिच्या हरवलेल्या पिल्लाची..

पिल्लू... लौकर ये... येशील ना..
आई वाट पाहतिये रे..

बुधवार, १ फेब्रुवारी, २०१२

रिमझिम पावसात ...

रिमझिम पावसात
वाट नागमोडी जाते..
तिला पाहताना मन
आठवणीत रमते...

याच वळणी वाटेच्या
भेट तिची झाली होती
तिला पाहताना माझी
झोप उडालेली होती..

हीच वाट होती साक्षी...
प्रेम वाढताना पहिलेली...
इथेच आम्ही एकमेकांना,
जन्माची वचने दिलेली..

आम्ही मांडीलेला खेळ
नियतीने उधळला
साता जन्माची गाठ
क्षणात तोडून गेला..

याच वाटेवर तिची
भेट शेवटची झाली..
तेव्हा अश्रूंच्या धारांनी
वाट झाली होती ओली...

भेट तुझी अन् माझी..

अस्ताला जाणारा सूर्य,
फेसाळणार्‍या लाटा...
रूपेरी वाळूचा किनारा
अन् सांजेचा मंद वारा...

अश्या सोनेरी सांजेला
भेट तुझी अन् माझी...
जणू, खलाळणार्‍या नदीचे
होते मिलन सागराशी...

विनायक बेलोसे

गुरुवार, १९ जानेवारी, २०१२

रात्रीचा रंग गहिरा,
चंद्राचा उजळणारा,
गारवा गुलाबी शिरशिरता
अन् तू, सुवर्ण जणू,

रात्र चंद्र गारवा अन् तू..
माझिया दुनियेतले
सप्तरंगी इंद्रधनू...

गुरुवार, ५ जानेवारी, २०१२

तेरी याद आने से..

हर जख्म गहराता हैं,
हर लम्हा तड़पता हैं,
हर बात रुक जाती हैं,
तेरी याद आने से...

चाँद छुप जाता हैं,
तारे गुम हो जाते हैं,
रात मुरझाती हैं,
तेरी याद आने से..

सूरज नही निकलता,
कोई फूल नही खिलता,
यह दुनिया खोसी जाती हैं,
तेरी याद आने से...

मंगळवार, ३ जानेवारी, २०१२

स्वप्नवत सृष्टी

तुझ्या रुपाची जादू ही सारी,
वाटे दुनिया मला ही न्यारी..
तुझ्या प्रेमानेच किमया केली
अन् ही रात्र चंदेरी झाली..

तुझ्या हासाच्या प्रेरणेने
ती नदीही खळाळू लागली,
तुझ्या स्पर्शाने मोहरून
रातराणी सुगंधून गेली..

तुझ्या प्रत्येक शब्दास सोबती
एक तारका चमकू लागली..
तुझ्या अस्तित्वानेचकेवळ
ही सृष्टी स्वप्नवत झाली...