पुण्यात मेट्रो करायचे ठरले..
पुढे मात्र रामायण घडले..
सर्वात आधी विरोध झाला..
"गरज काय?" हा सवाल आला...
आधी रस्ते करा नीट..
सुधारणा करा पीएमटीत...
रस्त्यात खड्डे झालेत फार..
त्यांचा आधी करा विचार..
या सगळ्यावर मात करत
मेट्रो थोडिसी पुढे सरकली..
मोजणी झाली, आखणी झाली..
मध्येच कुठेशी माशी शिंकली..
मेट्रो न्यायची नेमकी कुठून
यावरून चर्चा चालली आहे...
पुणेकरच काय पण या सार्याला
मेट्रोही आता कंटाळली आहे..
______________________मनस्वी...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा