गुरुवार, ८ ऑक्टोबर, २००९

मनावरही होते घाव माझ्या
भेसूर दिसाया लागले..
झाकले ते क्रुत्रिमतेने...
तेव्हा... आतून दुखाया लागले..
दुनियस परी वाटत होते...
घाव सारे भरून गेले..
सत्य मात्र निराळेच होते..
घाव माझे जिवंत तरीही
बाहेरून ते मरून गेले...

मंगळवार, ६ ऑक्टोबर, २००९

एक प्रश्न माझ्यातल्या कवीला..


तिच्या आठवणीत मी लिहिल्या कविता..

पण नाही जमलं ती असताना काही..
अगदी थोडं जरी जमलं असतं.. तेव्हा..
आज ती इथे असती..
मग लिहिल्या असत्या तिच्यावरच्याच कविता
अगदी तिच्या समक्ष..
अं केले असते राजी तिला अगदी विश्वंतापर्यंत साथ देण्यासाठी..
पण कदाचित नव्हते नशिबी तिचे माझ्या सोबत रहाणे..
राहिली ही असती ती कदाचित पण..
मग.. खरंच मी कवी झालो असतो??

सखे........

दिला.. .सखे.. पूर्ण जन्म दिला..
जव्हा वाटेल तेव्हा ये...
मी इथेच असेन.. अगदी इथेच..
वाट पहिन तुझी....
अगदी सूर्य जाळून खाक झाला..
चंद्र विझून काळा झाला..
पृथ्वीवर प्रलय आला..
तरी मी इथेच असेन..
तू पुन्हा येईपर्यंत..
दिला.. सखे.. पूर्ण जन्म दिला..
एक दिवशी एकटाच भटकत होतो..
काहीतरी अजानते शोधत होतो..

ठाऊक नव्हते मलाच माझे
हवे काय होते..
पण तरीही दही दिशाना जाऊन
धडकत होतो..

अचानक वाटले सापडली दिशा..
मी तसाच पुढे गेलो..
पण मृगजळ होते.. पुढेच.. थोडे..
मी तसाच परतही आलो..

कधी कळेना मिळेल दिशा मज..
कधी कळेना सापडेल ध्येय मज..
असाच कधिपर चालत राहू..
उगाच कशा कुणाची वाट पाहु?

वाटते कधी मज संपावे जग
वाटते कधी संपावे जीवन..
प्रवास हा जर संपत नाही.
जगण्यातही उरला राम नाही..

दूर देशी जाताना....

दूर देशी जाताना ती भेटली होती..
विसरणार नाही कधी तुला.. ती म्हणाली होती..
म्हणालो तिला आहे खरोखर तुझ्यावर विश्वास माझा..
जओन येतो परदेशी मग होईल तुझा राजा..
ती ही म्हणाली पाहीं मी वाट तुझी..
याच वाचनावर मी सार्‍या विश्वभर फिरलो..
तिच्यासाठी भेटी घेऊन माघारी आलो..
.... पण... परत आलो नि समजले..
मी तिचा कधीच नव्हतो.. राजा कसला,
मी तर तिच्या मनातही नव्हतो..

सोमवार, ५ ऑक्टोबर, २००९

किल्ले तोरणा... उर्फ प्रचंडगड


तोरणा... शिवरायांनी हाच किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरं बांधले असे म्हणतात... अर्थात त्याआधीही राजांकडे काही किल्ले होतेच... परंतु, स्वराज्यस्थापणेची खरी सुरूवात तोरणा किल्ल्यापासून झाली... तोरणा हे नाव पडण्याचे आणखी एक कारण म्हणजे गडावर आढळणारी तोरणा जातीची वनस्पती... गरूडाचे घरटे.. असे बिरुद मिरवणारा हा किल्ला... या किल्ल्यावर मी आजवर ३ वेळा जाउन आलोय... सर्वात आधी कॉलेजच्या मित्रांसोबत... म्हणजे जवळपास ५ - ६ वर्षांपूर्वी.. आणि त्यानंतर... ओक्टॉबर २००८ आणि मार्च २००९ मध्ये. प्रत्येकवेळी काहीतरी नवीन दाखवणारा हा किल्ला... अगदी कोणत्याही वातावरणात अतिशय थंड वारे आणि प्रचंड पसराल्याने प्रचंदगड हे नाव सार्थ करणारा... हा किल्ला आहे पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यात. तालुक्याच्या ठिकाणीच... साधारण ४००० फुट उंची असलेल्या किल्ल्यावर जायला सद्ध्या एकाच रस्ता वापरात आहे... तो म्हणजे वेल्ह्याहून... आणि हो राजगडावरून येणार्‍या डोंगररांगेहूनही या किल्ल्यावर प्रवेश करता येतो... या किल्ल्याचे मुख्यत्वे दोन भाग आहेत... एक आहे तो झुंझारमाल मचीपासून कोकण दरवाजा किंवा हत्तिमाळ बुरुजापर्यंतचा... आणि दुसरा भाग.... हत्तिमाळ उतरून खाली जाउन कोकणबाजू पर्यंत... याच भागात बुधलामाची वाघ दरवाजा, राजगडची वाट ई. ठिकाणे आहेत...

http://picasaweb.google.com/veebee009/TornaMarch09#
http://picasaweb.google.com/veebee009/Torna02#

मत तरुणाई चे... भविष्य भारताचे..

भारत… जगातील सर्वात तरुण देश. .सर्वात जास्त तरुणाई ने भरलेला देश.. जगातील सर्वात जास्त पोटेन्षियल असलेला देश… तरुणाई.. जगाच्या इतिहासात जी काही क्रांती झाली ती तरुणांनी केली.. मोघलाई, आदिलशाही उधळली एका तरुणानेच.. जग जिंकलेला सिकंदर, नेपोलियन.. हे ही तरुणच होते.. जगात क्रूरता आणि अतिरंजित राष्ट्रभक्ति गाजली ती हिट्लर मुळे.. अगदी फ्रेंच राज्यकरंती पासून क्यूबन क्रांती पर्यंत.. भारतीय स्वातंत्र्य युद्धपासून ते जपानच्या अणुस्फोटनंतरच्या प्रगतीस कारणीभूत आहे ती तरुणाई..

ओरकुत.. एक अशी जागा जिथे सर्वात जास्त तरुण लोक असतात.. जिथे कळू शकते की नक्की तरुणाई ची मते काय आहेत.. अनाई हे वर्ष 2009 आहे.. निवडणुकांचे.. राजकारण.. बरेच लोक नाके मुरडतात याच्या नावाने.. पण.. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हाच आहे द फॅक्टर.. जो ठरवतो की तुमचा देश कुठे जाणार.. आणि निवडणुका हे एक चांगले माध्यम.. सगळ्यांसाठी.. सांगायला की आपल्याला नक्की काय हवाय..

हीच वेळ आहे आपले मत मांडण्याची.. हीच वेळ आहे जगाला पुन्हा दाखवायची की होय.. आम्हीच आहोत या जगाचे शिल्पकार..

मी असे नाही म्हणत की फक्त मत द्या... मत दिले की आपली जबाबदारी संपत नाही.. उलट सुरू होते.. आणि त्यानंतर माहितीचा अधिकार आहे.. 49 ओ सारखा नाकारार्थी मताचा अधिकार आहे.. वापर करा.. पण हे करायला वेळ नाही देत आपण.. हाच तर प्रॉब्लेम आहे ना.. उदाहरण च द्यायचे तर.. माझ्या गावी कोकणात आम्ही माहितीच्या अधिकाराचा वापर सुरू केला आणि किती तरी कामे पटापट होऊ लागलियेत.. लोकप्रतिनिधी काम करतात पण.. त्यासाठी नागरिक म्हणून आपण ही जागरूक राहून त्यांची कामे नीट होतात की नाही याची काळजी घ्यायला हवी.. त्यासाठी निवडणूक लढवलीच पाहिजे असे काही नाही.. अर्थात जर तशी तयारी असेल तर उत्तमच नाही??
लोक फक्त मतदानाला जातात.. मग निवडणुका लढवणे वगैरे तर लांबची गोष्ट आहे.. हे म्हणजे आधी देवळात जायलाच लोक नको म्हणतात तर देवाची पूजा कशी होणार??? मग उगीच ओरडत राहायचे.. बडवे लुटतात म्हणून.. आणि आणखी एक.. सर्वात महत्वाचे आहे ते म्हणजे लोकांना जाणीव करून देण्याची.. त्यांचे मत किती महत्वाचर आहे याची.. त्याहून ही त्यांना शाषणाच्या विविध योजना माहीत झाल्या पाहिजेत.. जेणेकरून लोक त्यांचा जास्तीत जास्त फायदा करून घेतील..
मुद्दे काय ? बेकारी, गरीबी, आणि मूलभूत गरजा.. पाणी वगैरे.. पण मग शिक्षण पर्यावरण.. यांच्या बद्दल का नाही लोक विचारात?? सरळ आहे.. या गोष्टींसाठी तुम्ही काय करणार ते सांगा.. आम्ही तुम्हाला मत देऊ..
. पण आजची तरुणाई काय विचार करते हे जाणून घेण्याचा.. तेव्हाच कळेल की किती गरज आहे.. ब्रेन वॉश ची.. किंवा कितपत माहीत आहे लोकांना या सर्वांची..

आणि नेमके हेच महत्वाचे आहे.. नाहीतर लोक म्हणतात की तुम्ही प्रचार करताय.. प्रक़चार तर करावाच.. पण फक्त लोकशाही चा.. मतदानाच्या अधिकारांचा.. त्यातल्या काही माहीत नसलेल्या गोष्टींचा.. लोकांना विचार करायला आणि आपले मत अगदीयोग्य माणसास देण्यासाठी मदत होईल अश्याच मुद्द्यांचा..

मान्य की फक्त बोलून काही होत नाही.. पण एखाद्याला चिखलात उतरवण्यासाठी आधी त्याची मानसिक तयारी करावी लागते.. त्याशिवाय तो पुढे जातच नाही.. आणि करियर धोक्यात घालायचीच गरज आहे असे कोणी सांगितले..

वैयक्तिक च सांगतो.. मी ज्रव्हा वेळ मिळेल तेव्हा लोकांना या सगळ्या गोष्टी सांगत असतो.. आणि हो.. जितका वेळ मिळेल तितका मी गावात जओन लोकांमध्ये मिसलण्यात घालवतो.. माझे क्षेत्र आहे गड किल्ले, इतिहास.. म्हणजे मला हे आवडते.. तेव्हा मी निद्दाअन त्यानुसार लोकांना आधी एकत्र आणून अथवा त्यांच्याशी जवळीक साधून मग आपले लोकशाही मतदान वगैरे विचार ऐकवतो.. बराच फरक पडतो याने..

रूप तिचे.......

तिचे रूप मी काय वर्णू..
दिसते कशी ते कसे सांगू....
शब्द ही पडतील अपुरे..
तरीही होणार नाही तिचे कौतुक पुरे..
चन्द्रालाहि हेवा वाटेल अश्या तिच्या पापण्या..
डोळे तिचे बोलके जणू सारे भाव मनीचे काळती...
कांती लजविते सूर्यालाही...
अन् वाणी तिची मधुर अमृत्ाहुनी..
तो : मी चिडलोय..
ती : चालणार नाही...
तो : का बरं?
ती : तो हक्क फक्त मला आहे.. तुला नाही..
तो : असे कुठे लिहून ठेवलय?
ती : नासू दे.. पण मी ठरवलाय ?
तो : हे मात्र बरोबर नाही.. तू चुकलिस तर मी चिदयाचा नाही?
ती : नाही..
तो : का ?
ती : कारण मी कधी चुकताच नाही..
तो : आता हे कोणी सांगितलं ?
ती : हे सुद्धा मीच ठरवलं....
तो : सगळं बरं तूच ठरवतेस ?
ती : हक्कच आहे माझा...
तो : आयला... म्हणजे.. सगळे हक्क तुलाच??
ती : असच काही नाही... तुला हवे ते तू कर.. माझ्यावर प्रेम कर.. मला खुश कर.. असाच सतत हसत राहा.. वगैरे वगैरे..
तो : ..... (काय बोलणार?? )

शनिवार, ३ ऑक्टोबर, २००९

असंच होतं..

मी सोबत असलो की ती माझ्याकडे पाहतही नाही..
आणि दूर गेलो की म्हणते.. तुझ्याशिवाय राहावत नाही..
जेव्हा म्हणतो तू खूप सुंदर दिसातेस..
ती म्हणते तू ख्तां बोलतोस..
आणि जेव्हा काहीच म्हणत नाही तेव्हा म्हणते.. तुला माझी कदरच नाही..
मी जेव्हा जेव्हा तिला आठवू पाहतो,
ती नेहमीच वेगळी आठवते..
जेव्हा तिच्या जवळ असतो..
ती दरवेळी नवीच भासते..
तिचे सारे असेच असते..
अनपेक्षित.. अगदी.. अनपेक्षित..
तरीही तिच्यासारखी तीच..

शुक्रवार, २ ऑक्टोबर, २००९

विश्वाचे गूढ.....


प्रश्ना विचारिता उत्तरासाठी
उत्तर सापडलेलेच असते...
केवळ करिता विचार थोडा कळते
उत्तर प्रश्णाताच दडलेले होते...
हाच विचार घेऊनी जेव्हा
प्रश्न विचारला जातो
तेव्हाच खरे प्रश्नकार्त्याला
या विश्वाचे गूढ उकलते....

गुरुवार, १ ऑक्टोबर, २००९

जाणीव.....

येतो.. कधी कधी मलाही राग..
मस्तकात जाते तळपायाची आग..
पण तरीही मी थोडा स्वतःला सावरतो..
हे ही संकट जाईल असे स्वतःच समजावतो..
परष्टीतिशी झगडण्याचा..
थोडासा .. प्रयत्न ही करतो..
पण .... काहीच बदलत नाही..
म्हणून.. पुन्हा आपल्या कामाला लागतो..
हीच वृत्ती मराठी माणसाची..
त्याला घेऊन बुडाली...
तेव्हा त्याला स्वताच्या हक्काची जाणीव झाली..
मी ही तशाच साधारण की..
अगदी याच जगात वावरतो..
आता काहीतरी वेगळं सुचतं..
कारण.. हेच जग थोड्या वेगळ्या नजरेनं पाहतो..

भेट.... शेवटची..(?)...

आठवतय तुला??
त्या दिवशी काय झालं होतं ?
आपण भेटलो होतो. गावदेवीच्या देवळात...
खूप गप्पा मारल्या आपण,
खूप दिवसांनंतर..
पण.......
अचानक तू म्हटलीस -
"सांग काय करशील
जर मी नसेन आयुष्यात ?..
.. खरंच राहू शाक्शील..
माझ्याविणा.. या जगात? "
आणि मी म्हटलं होतं -
"खरं सांगू तुझ्यासाठी
नाही मी मारू शकत, पण...
आयुष्य मात्र तुझ्यासोबतच जगायाचाय.."
तू म्हटलीस -
"नाही मी येऊ शकत तुझ्यासोबत,
आणि जागूही नाही शकत, तुझ्याशिवाय...
म्हणूनच आहे आता एकाच पर्याय... मरणाचा"
माझं तर काळीजच थरथरलं,
आणि अचानक माझा हात उठला...
त्यानं तुला स्पर्श केला, पण...
तुझ्या गालावर मारण्यासाठी...
आणि... तू तशीच निघून गेलिस...
.. मागं वळूनही न पाहता.. मला सोडून गेलीस....
त्याचवेळी मी पुन्हा मेलो...
तुझ्या एका नजरेसाठी अगदीच आगतिक झालो..
... पण.. तू मात्र माझ्याकडे पुन्हा पहिलं ही नाहीस..
माझा मनात काय आहे.. ओळखलही नाहीस...
मी मात्र एकटा झालो..
कायमचा....
अगदीच.... एकटा..

संभ्रमात राहण्याची मजा........

संभ्रमात राहायची मजाच काही और असते..
कोणी खात्री पटावायची गरज नाही..
की कोणी पुरावा मागण्याची भीती नाही..
जे आहे ते सारे मनातच असते..
प्रश्न इतकाच.. की ते खरे की खोटे ??
हे मात्र माहीत नसते.. किंबहुना...
याचा विचार करण्याची ही जाणीव नसते..
म्हणूनच...
संभ्रमात राहण्याची मजाच काही और असते..

मी बी होतो.. हुसार…

मी बी होतो त्याच्यासारखाच हुसार…
अगदी उन्निस बीस चा फरक व्हता..
लाई मजा यायची.. सालंत..
मास्तुर प्रश्न इचारायचे नि आम्ही दोगांच उत्तरं द्यायचो…

मास्तर म्हणायचे..
तुमि दोग खूप पुढं जाणार..
आई बापाचं नाव मोटं करणार..
तो खूप शिकला.. लयी मोठा झाला...
आई बपाचं नाव काडलं..
आन् मास्तुरला बी खरं ठरवलं..

पण माझं मात्र आसं काईच झालं नाई..
माझ्या वाट्याला असं नशीब कधीच आलं नाई..
बा बेवडा अन् आई मोलकरीन..
बा मला मारायचा.. आई म्हणायची..
मी तुला म्होटा करीन..


एकदूम तो दिसला नि मनात इचार आला..
माजं बी आई वडील आसतं तर??
मी बी असाच मोटा झालो असतो..
आईला आराम मिळाला असता..
मी बा मग गप्प झाला असता..

आई बा च्या भांडणात एक दिस
आईचा जीव गेला..
आन् तिला मारलं म्हणून माझा बा तुरुंगात गेला..
दोघं बी गेले र्‍हायलो मी..
आता माझं बगायला होतो फक्त मीच..
आन् मी काय करायचं हे ठरवायला बी मीच..

हाती पडलं ते काम करत रायलो..
कासाची साला नि कसच काय..
दिवसभर काम करून बी..
पोट काय भरत नाय..
ह्म... हा झाला नेहमी चा प्रसंग..
तो म्हणतो : थांब ना..
ती : काही काम आहे??
तो : असायलाच पाहिजे??
ती : तसे नाही रे.. पण उशीर झालाय आता.. .
तो : ... उशीर झालाय म्हणे.. .आत्ताच तर आली होतीस...
ती : अरे पण...
तो : ठीक आहे बाई.. जा ...
ती : नको.. थांबते..
तो : जा की बाई..आता


(गंमत : भूमिका.. दोघांच्या.. क्षणात कश्या विरुद्ध झाल्या??? )