सोमवार, २ जुलै, २०१२


चार पावलं मागं यावं..
कुण्यातरी आपल्यांसाठी..
अन् मग जाणीव व्हावी..
आपण एकटेच मागे पडल्याची..

अश्यावेळी आपण पुन्हा
त्यांना गाठण्याची धडपड करतो..
परंतु, कित्येकवेळा शेवटी..
आपण.. काही क्षणांनी मागेच राहतो..

समजत नाही.. उडी घ्यावी सरळ..
पुढे जाण्यासाठी..
की वाट पाहावी..
कोणीतरी.. मागे वळून पाहण्याची..

पुढे जाण्याच्या प्रयत्नात
कधी आपण पुढेच निघून जातो..
काहीच केलं नाही..
तर कायमचे मागे राहतो..

नात्यांच्या या खेळात
आपण इतके गुंतून जातो..
की हा गुंता सोडवण्याआधीच..
आपला.. वेळ संपतो..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा