मंगळवार, १४ एप्रिल, २०१५

कारण असावं असं नाही...
कित्येकदा वाटतं कोणीतरी
असायला हवं होतं सोबत...
अगदी या क्षणापुरतं का होईना...
असं वाटायला लागतं
आणि त्याचवेळी डोळ्यासमोरुन
एक माणसांची रांग पुढे सरकते.
ती जशी पुढे जाऊ लागते,
आपण त्यातल्या प्रत्येक व्यक्तीचा विचार करु लागतो..
सोबत राहण्यासाठी..
दरवेळी कोणीतरी येतं समोर
आणि आपण त्या व्यक्तीच्या विचारात बुडून जातो...
परंतु, कधीतरी एखादी वेळ अशीही येते,
आपण शोधत राहतो ती एक व्यक्ती...
आणि ती सापडतच नाही...
अश्या वेळी आपण
स्वतःच्या आत डोकावून पाहू लागतो..
आणि तेव्हा जाणवतं...
थोडं स्वतःशीच बोलायला हवं कधीतरी..
या क्षणी आपला शोध खऱ्या अर्थाने संपलेला असतो...

#मनस्वी #VinayakVBelose

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा