उद्देश... माझा.. जीवनाचा..
असा विचार केल्याला खूप काळ लोटलाय.
पण जेव्हा जेव्हा विचार केला..
तेव्हा तेव्हा त्यातून
वेगवेगळा निष्कर्ष निघाला..
कधी वाटले आपल्याला देवाने पाठवलंय
मस्तपणे भटकायला..
हवे तसे जगायला..
कधी वाटले..
छे मी तर आलोय इथे काही साध्य करायला..
काहीतरी खास..
जसे देवाने पाठवले अर्जुनाला..
त्या शिवरायला..
त्या शंभुराजाला...
त्या शाहूला..
फुले अन् आंबेडकरांना..
पण कधी कधी मी विचार करतो..
नक्की काय बरे हवे असेल देवाला..
माझ्याकडून?
खरेच कोणी सांगेल मला?
माझे धेय काय?
कोणी दाखवेल का वाट ??
पण मग.. अचानक वाटते..
कोण कशाला देवच सांगेल..
कसे?
त्याला जे हवे आहे ते समोर आणेल
आणि काहीतरी इशारा करेल..
बस्स.. तो इशारा समजायला हवा..
बाकी सगळे होईलच.. आपोआप...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा