एकदा का मनाला पंख फुटले
की ते उडायला लागतं...
अगदी कल्पनेच्या जगातल्या
कोणत्याही कोपर्यात नेऊन
आपल्याला सोडायला लागतं..
आणि मग तेथून परत येताना
तेच काही शब्द देऊन जातं...
प्रत्येक शब्द बसू शकेल अशी
एक छानशी यमकाची पेटी देऊन जातं..
आपण फक्त प्रत्येक शब्द
त्या त्या चौकटीत बसवयचा..
की त्याची होते एक सुंदरशी कविता...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा