मंगळवार, १९ जानेवारी, २०१०

सत्ता मिळवण्यात जेव्हा
गुणवत्ता कमी पडते
त्या प्रत्येकवेळी.. लोकशाही हरते..
केवळ पैसा नि सत्तेच्या जोरावर
जेव्हा राजकारणाची दिशा ठरते..
तेव्हा ही लोकशाही
पुन्हा एकदा मरते..
अशीच असते का लोकशाही..?
हरणारी नि मरणारी?
इतकी रोज मरूनसुद्धा
कशीबशी जगणारी?
असे वाटत असतानाच
कधी लोकशाही पेटूनही उठाते
आणि तेव्हा मात्र
सार्‍या सत्ताधार्यांची बोबडी वळते..
कारण, त्यांना ठाऊक असते..
लोकशाही काय चीज आहे..
प्रलयनकारी पाउस किंवा
कदादणारी वीज आहे...
म्हणून तर या लोकशाहीला
कोणी डोके काढू देत नाही..
कारण, तसे केल्याशिवाय जनता..
राजकारण्यांना भीत नाही...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा