शब्दाला शब्द जोडायचा...
अन् एखादी सुंदर कविता करायची..
माझ्या मनात काही असायचे..
समोरच्यानं मात्र भलतीच समजायची...
मी म्हणायचं...
'ती आली... भेटली...
अन् माझ्या मिठीत शिरली.. '
माझा विचार इथेच थांबायचा...
ऐकनार्याचा मात्र..
नेमका इथेच सुरू व्हायचा...
म्हणूनच वाटते कधी
कविता करायलाच नको..
मी काही लिहायला नको
आणि कोणी काही समजायला नको..
पण तेवढ्यात 'तिने' म्हणायचं...
"कर ना एखादी छानशी कविता..."
अन् मी पुन्हा सुरू व्हायचे ...
लिहायला लागायचे...
हे.. असेच चालायचे...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा